शहरं
Join us  
Trending Stories
1
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
2
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
3
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
4
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
5
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
6
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
7
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
8
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
9
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
10
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
11
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
12
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
13
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
14
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
15
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
16
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
17
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
18
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
19
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
20
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 

१७ फुटाचे पांदण रस्ते सात फुटावर

By admin | Updated: June 14, 2014 02:36 IST

शेतशिवारांना जोडणारे पांदण रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.

उत्तम चिंचोळकर गुंज शेतशिवारांना जोडणारे पांदण रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. १७ फुटाचा असलेला पांदण रस्ता अवघ्या सात फुटावर आला आहे. साधी बैलगाडीही चालणे अवघड झाल्याने पांदण रस्त्यांवरून शेतकऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कधी अतिवृष्टी तर कोरडा दुष्काळ अशी स्थिती आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीतून शेतकरी टोकाचा मार्ग स्वीकारत आहे. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध योजना आखल्या आहेत. त्यातीलच पांदण रस्ता ही महत्वाची योजना आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वाहन गेल्यास पीक घरापर्यंत अथवा बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे सोपे होते. तसेच शेतातील इतर कामांसाठी साहित्य नेण्यासही सुलभ होते. कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात शेतशिवारात पांदण रस्ते निर्माण करण्यात आले. परंतु या पांदण रस्त्यांची शेतकऱ्यांनीच वाट लावली आहे. अलिकडे पांदण रस्ते अतिक्रमाच्या विळख्यात अडकले आहे. १७ फुटाचे पांदण रस्ते सात फुटावर आले आहे. एका शेत सर्वेमध्ये चार ते पाच शेतकरी झाले आहे. त्यामुळे पांदण रस्त्यावरून आत जाण्यासाठी रस्ता पुढचा शेतकरी ठेवत नाही. धुरासुद्धा वहितीत आणतो. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाद होतात. वाद विकोपाला जाऊन कोर्ट कचेऱ्याही होतात. पूर्वी शेतकऱ्यांजवळ मोठ्या प्रमाणात शेती होती. त्यामुळे पांदण रस्त्यावर अतिक्रमण होत नव्हते. परंतु आता शेतीचे तुकडे पडून प्रत्येकाजवळ कमीत कमी शेती झाली आहे. त्यातही काहींची शेती धरण, रस्त्याने कमी झाली. मूळ एक शेताचे पाच ते सात मालक झाले. त्यामुळे प्रत्येकाचा जोर इंचन्इंच शेती कसण्याकडे वाढला आहे. त्यातूनच सर्व प्रथम आक्रमण होते ते धुऱ्यावर नंतर पांदण रस्त्यावर.पूर्वी सारखी आता पारंपारिक शेती केली जात नाही. मजूर टंचाईने यांत्रिकी पद्धतीने शेती करावी लागते. यासाठी शेतात ट्रॅक्टर व इतर यंत्र सामुग्री नेण्यासाठी बारमाही पक्क्या रस्त्याची गरज असते. एक हेक्टर शेती असेल तरी शेतात रासायनिक खते, बी-बियाणे न्यावे लागते तर शेतात निघालेले पीक बाजारपेठेपर्यंत न्यावे लागते. परंतु योग्य रस्ता नसल्याने वाद होतात. आणि त्यातून विकास खुंटतो. शासन शेतातील उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. कृषी विभाग आणि खासगी कंपन्या विकासाचे स्वप्न दाखवितात. परंतु पांदण रस्त्याच्या अतिक्रमणाबाबत कुणीही बोलत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी पुढाकाराची गरज आहे.