शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

१७ फुटाचे पांदण रस्ते सात फुटावर

By admin | Updated: June 14, 2014 02:36 IST

शेतशिवारांना जोडणारे पांदण रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे.

उत्तम चिंचोळकर गुंज शेतशिवारांना जोडणारे पांदण रस्ते गेल्या कित्येक वर्षांपासून अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. १७ फुटाचा असलेला पांदण रस्ता अवघ्या सात फुटावर आला आहे. साधी बैलगाडीही चालणे अवघड झाल्याने पांदण रस्त्यांवरून शेतकऱ्यांमध्ये वादाचे प्रसंग उद्भवतात. निसर्गाच्या अवकृपेने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. कधी अतिवृष्टी तर कोरडा दुष्काळ अशी स्थिती आहे. कर्जबाजारीपणा आणि नापिकीतून शेतकरी टोकाचा मार्ग स्वीकारत आहे. अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने विविध योजना आखल्या आहेत. त्यातीलच पांदण रस्ता ही महत्वाची योजना आहे. शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वाहन गेल्यास पीक घरापर्यंत अथवा बाजारपेठेपर्यंत पोहोचविणे सोपे होते. तसेच शेतातील इतर कामांसाठी साहित्य नेण्यासही सुलभ होते. कोट्यवधी रुपये खर्च करून जिल्ह्यात शेतशिवारात पांदण रस्ते निर्माण करण्यात आले. परंतु या पांदण रस्त्यांची शेतकऱ्यांनीच वाट लावली आहे. अलिकडे पांदण रस्ते अतिक्रमाच्या विळख्यात अडकले आहे. १७ फुटाचे पांदण रस्ते सात फुटावर आले आहे. एका शेत सर्वेमध्ये चार ते पाच शेतकरी झाले आहे. त्यामुळे पांदण रस्त्यावरून आत जाण्यासाठी रस्ता पुढचा शेतकरी ठेवत नाही. धुरासुद्धा वहितीत आणतो. त्यामुळे ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाद होतात. वाद विकोपाला जाऊन कोर्ट कचेऱ्याही होतात. पूर्वी शेतकऱ्यांजवळ मोठ्या प्रमाणात शेती होती. त्यामुळे पांदण रस्त्यावर अतिक्रमण होत नव्हते. परंतु आता शेतीचे तुकडे पडून प्रत्येकाजवळ कमीत कमी शेती झाली आहे. त्यातही काहींची शेती धरण, रस्त्याने कमी झाली. मूळ एक शेताचे पाच ते सात मालक झाले. त्यामुळे प्रत्येकाचा जोर इंचन्इंच शेती कसण्याकडे वाढला आहे. त्यातूनच सर्व प्रथम आक्रमण होते ते धुऱ्यावर नंतर पांदण रस्त्यावर.पूर्वी सारखी आता पारंपारिक शेती केली जात नाही. मजूर टंचाईने यांत्रिकी पद्धतीने शेती करावी लागते. यासाठी शेतात ट्रॅक्टर व इतर यंत्र सामुग्री नेण्यासाठी बारमाही पक्क्या रस्त्याची गरज असते. एक हेक्टर शेती असेल तरी शेतात रासायनिक खते, बी-बियाणे न्यावे लागते तर शेतात निघालेले पीक बाजारपेठेपर्यंत न्यावे लागते. परंतु योग्य रस्ता नसल्याने वाद होतात. आणि त्यातून विकास खुंटतो. शासन शेतातील उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्नशील आहे. कृषी विभाग आणि खासगी कंपन्या विकासाचे स्वप्न दाखवितात. परंतु पांदण रस्त्याच्या अतिक्रमणाबाबत कुणीही बोलत नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत येत आहे. पांदण रस्ते मोकळे करण्यासाठी पुढाकाराची गरज आहे.