शहरं
Join us  
Trending Stories
1
संपूर्ण यादीच आली, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य ठरले, प्रत्येक टीममध्ये किती अन् कोण नेते?
2
पाकची नवी चाल! भारताच्या ‘डिप्लोमॅटिक स्ट्राइक’ला ‘शांतीदूता’ने उत्तर; जगाला सांगणार काय?
3
"विराट कोहलीला क्रिकेटमधील योगदानासाठी 'भारतरत्न' द्या"; स्टार माजी क्रिकेटपटूने केली मागणी
4
तुम्हीही एकापेक्षा जास्त क्रेडिट कार्ड वापरता? मग फायद्यासोबत हे तोटे माहिती आहे का?
5
कोण आहे पाकिस्तानी अधिकारी, ज्याच्या जाळ्यात अडकली ज्योती?; भारताने देशाबाहेर काढले होते
6
हैदराबादमधील गुलजार हाऊसजवळ भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू; अनेक जण गंभीर जखमी
7
Video: "असा धडा शिकवणार, की..."; सैन्यानं जारी केला 'ऑपरेशन सिंदूर'चा आणखी एक व्हिडिओ
8
केरळात मान्सून वाऱ्याच्या वेगाने दाखल होणारा, ढग भरभरून पाऊस देणार
9
करण जोहरच्या 'तख्त' सिनेमाचं पुढे काय झालं? पहिल्यांदाच प्रतिक्रिया देत म्हणाला, "तो सिनेमा..."
10
ज्योती मल्होत्रा पाकिस्तानी ISI अधिकाऱ्यासोबत बालीलाही गेलेली; वडील कारपेंटर, मुलीची लक्झरी लाईफ, नेमके करायची तरी काय...
11
टेरिफ वॉरची खुमखुमी अन् अमेरिकेचा तिळपापड! मूडीजने क्रेडिट रेटिंग घटविताच...
12
२५ लाख दे, नाहीतर मरून जा; पत्नीने दिली धमकी! शिक्षक पतीने उचलले दुर्दैवी पाऊल
13
सुसाइड नोटमध्ये मराठीत सही कशी?; डॉ. वळसंगकर आत्महत्या प्रकरणी वेगळाच संशय
14
"तेव्हा विराट कोहलीने मला लाथ मारली होती अन् म्हणाला होता..."; इशांत शर्माने सगळंच सांगून टाकलं
15
इस्रोचे १०१ वे मिशन अयशस्वी; तांत्रिक अडचणीमुळे रॉकेट तिसऱ्या टप्प्यावरच अडकले
16
भारत-पाकिस्तानमधील युद्धविरामाचा आज अखेरचा दिवस? पुढे काय होणार? भारतीय सेनेनं सांगूनच टाकलं!
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना पैसाच पैसा, धनसंचयात यश; पदोन्नती, गुंतवणुकीत मोठा फायदा!
18
बाळासाहेबांवर निष्ठा नसल्याने राऊतांवर पुस्तक काढण्याची वेळ : एकनाथ शिंदे
19
Ashish Ubale: 'गार्गी'चे दिग्दर्शक आशिष उबाळे यांची आत्महत्या, नागपूरमधील रामकृष्ण मठात घेतला गळफास
20
Income Tax Return : 'सहज' आणि 'सुगम' फॉर्म म्हणजे काय? आयटीआर भरण्यापूर्वी जाणून घ्या

निळोणात १५ टक्के पाणी

By admin | Updated: July 7, 2016 02:27 IST

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात केवळ १५ टक्के जलसाठा आहे.

वेळापत्रक बदलणार : पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा विचार यवतमाळ : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात केवळ १५ टक्के जलसाठा आहे. गत मे महिन्यापासून आठ दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या यवतमाळकरांना अद्यापतरी दिलासा मिळाला नाही. मात्र पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा विचार जीवन प्राधिकरण करीत आहे. यवतमाळ शहराला निळोणा आणि चापडोह प्रकल्पावरून पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी निळोणा प्रकल्प मे महिन्याच्या सुरुवातीलाच आटला. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रकल्प कोरडा पडला. त्यामुळे सर्व भिस्त चापडोह प्रकल्पावर होती. परंतु या प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूमुळे यवतमाळकरांना मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आठ दिवसआड पाणी पुरवठा करण्यात आला. जून महिन्यात मुबलक पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने व्यक्त केले होते. त्यामुळे यवतमाळकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु आता जुलै महिना उजाडला तरी दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे या धरणात केवळ १५ टक्केच जलसाठा आहे. या प्रकल्पावरून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन जीवन प्राधिकरणाने केले असले तरी अपुऱ्या पावसामुळे ते शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे आताही यवतमाळकरांना आठ दिवसाआडच पाणी मिळत आहे. पावसाळ्याच्या दिवसात वापरण्यासाठी छताच्या पाण्याचा आधार यवतमाळकरांना घ्यावा लागत आहे. मात्र लवकरच यवतमाळकरांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे संकेत जीवन प्राधिकरणाने दिले. आठवडाभरात जोरदार पाऊस झाला आणि निळोणा ओव्हरफ्लो झाला तर लवकरच एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकतो. परंतु सध्या तसे चित्र दिसत नाही. त्यामुळे चापडोह प्रकल्पातून पाणी आणून त्याचे नियोजन करून शहराला पाणी पुरवठा केल्या जात आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत यवतमाळात पाऊस अपुरा झाला आहे. धरणात पाणी नसल्याने नागरिक आठवड्यातून एकदा नळाची प्रतीक्षा करतात. पावसाळ्यातही यवतमाळकरांना टँकरची मदत घ्यावी लागत असल्याचे चित्र शहरात आहे. त्यामुळे सर्वांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. (शहर वार्ताहर)जुलै महिन्यातही चापडोहचाच आधार गतवर्षी झालेल्या पावसाने २२ जुलै रोजी निळोणा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता. यामुळे नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात आला होता. परंतु यावर्षी ६ जुलैपर्यंत या प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणी आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाची भिस्त चापडोह प्रकल्पावर आहे. या प्रकल्पातून पाणी आणून ते यवतमाळ शहरात वितरित केले जाते. नगर परिषदेत नव्याने समाविष्ठ झालेल्या परिसरात ३० हजार नळ जोडणीतून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या नवीन नळ कनेक्शन देणे बंद असून पावसाळ्यानंतर नवीन नळ कनेक्शन दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या यवतमाळकरांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून अद्यापही पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे.