शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

निळोणात १५ टक्के पाणी

By admin | Updated: July 7, 2016 02:27 IST

जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात केवळ १५ टक्के जलसाठा आहे.

वेळापत्रक बदलणार : पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा विचार यवतमाळ : जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यातही शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या निळोणा प्रकल्पात केवळ १५ टक्के जलसाठा आहे. गत मे महिन्यापासून आठ दिवसाआड पाणीपुरवठा होणाऱ्या यवतमाळकरांना अद्यापतरी दिलासा मिळाला नाही. मात्र पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा विचार जीवन प्राधिकरण करीत आहे. यवतमाळ शहराला निळोणा आणि चापडोह प्रकल्पावरून पाणी पुरवठा केला जातो. यावर्षी निळोणा प्रकल्प मे महिन्याच्या सुरुवातीलाच आटला. धरणाच्या इतिहासात पहिल्यांदाच हा प्रकल्प कोरडा पडला. त्यामुळे सर्व भिस्त चापडोह प्रकल्पावर होती. परंतु या प्रकल्पाच्या तांत्रिक बाजूमुळे यवतमाळकरांना मे महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून आठ दिवसआड पाणी पुरवठा करण्यात आला. जून महिन्यात मुबलक पाऊस होणार असल्याचे संकेत हवामान खात्याने व्यक्त केले होते. त्यामुळे यवतमाळकरांच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. परंतु आता जुलै महिना उजाडला तरी दमदार पाऊस झाला नाही. त्यामुळे या धरणात केवळ १५ टक्केच जलसाठा आहे. या प्रकल्पावरून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे नियोजन जीवन प्राधिकरणाने केले असले तरी अपुऱ्या पावसामुळे ते शक्य होताना दिसत नाही. त्यामुळे आताही यवतमाळकरांना आठ दिवसाआडच पाणी मिळत आहे. पावसाळ्याच्या दिवसात वापरण्यासाठी छताच्या पाण्याचा आधार यवतमाळकरांना घ्यावा लागत आहे. मात्र लवकरच यवतमाळकरांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचे संकेत जीवन प्राधिकरणाने दिले. आठवडाभरात जोरदार पाऊस झाला आणि निळोणा ओव्हरफ्लो झाला तर लवकरच एक दिवसाआड पाणीपुरवठा होऊ शकतो. परंतु सध्या तसे चित्र दिसत नाही. त्यामुळे चापडोह प्रकल्पातून पाणी आणून त्याचे नियोजन करून शहराला पाणी पुरवठा केल्या जात आहे. इतर तालुक्याच्या तुलनेत यवतमाळात पाऊस अपुरा झाला आहे. धरणात पाणी नसल्याने नागरिक आठवड्यातून एकदा नळाची प्रतीक्षा करतात. पावसाळ्यातही यवतमाळकरांना टँकरची मदत घ्यावी लागत असल्याचे चित्र शहरात आहे. त्यामुळे सर्वांना दमदार पावसाची प्रतीक्षा लागली आहे. (शहर वार्ताहर)जुलै महिन्यातही चापडोहचाच आधार गतवर्षी झालेल्या पावसाने २२ जुलै रोजी निळोणा प्रकल्प ओव्हर फ्लो झाला होता. यामुळे नागरिकांना सुरळीत पाणी पुरवठा करण्यात आला होता. परंतु यावर्षी ६ जुलैपर्यंत या प्रकल्पात केवळ १५ टक्के पाणी आहे. त्यामुळे जीवन प्राधिकरणाची भिस्त चापडोह प्रकल्पावर आहे. या प्रकल्पातून पाणी आणून ते यवतमाळ शहरात वितरित केले जाते. नगर परिषदेत नव्याने समाविष्ठ झालेल्या परिसरात ३० हजार नळ जोडणीतून नागरिकांना पाणीपुरवठा केला जातो. सध्या नवीन नळ कनेक्शन देणे बंद असून पावसाळ्यानंतर नवीन नळ कनेक्शन दिले जाण्याची शक्यता आहे. सध्या यवतमाळकरांना आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत असून अद्यापही पाणीटंचाईचे चटके सहन करावे लागत आहे.