शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

१० हजार हेक्टरला अवकाळीचा फटका

By admin | Updated: March 18, 2017 00:41 IST

गुरूवारी जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला. गारपीट, वादळ आणि अवकाळी पावसाने दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

८५० घरांची पडझड : ३४१ गावे सर्वाधिक बाधित, दहा तालुक्यात पिकांचे नुकसान यवतमाळ : गुरूवारी जिल्ह्याला अवकाळी पावसाने तडाखा दिला. गारपीट, वादळ आणि अवकाळी पावसाने दहा हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घाटंजी तालुक्यात ८५० घरांची पडझड झाली असून १० तालुक्यांमध्ये नुकसानीच्या सर्वेक्षणाचे आदेश कृषी विभागाने दिले. गुरूवारी जिल्ह्यात सर्वत्र वादळ, गारपीट आणि पावसाने हजेरी लावली. यात शेतीमालाला मोठा फटका बसला आहे. अवकाळी पाऊस व गारपिटीने घाटंजी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. या तालुक्यात अर्धा तास गारपीट झाली. अवेळी आलेल्या गारपिटीने गहू, हरभरा पिकाचे सर्वाधिक नुकसान झाले. हरभऱ्याच्या घाट्या गळून पडल्या, तर गहू आडवा झाला. कैऱ्याही गळून पडल्या. संत्रा आणि भाजीपाला पिकांची मोठी हानी झाली. या तालुक्यातील ८५० घरांमध्ये चूलही पेटली नाही. या वादळाचा जिल्ह्यातील जवळपास ३४१ गावांना तडाखा बसला. यवतमाळ, कळंब, नेर, दारव्हा, दिग्रस, उमरखेड, पुसद, पांढरकवडा व झरी तालुक्यातही गारपीट आणि अवकाळी पावसाने पिकांची हानी झाली. प्रत्येक तालुक्यात किमान एक हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने वर्तविला. शुक्रवारी तातडीने सर्वेक्षण करण्याचे आदेश कृषी विभागाने दिले. पर्यवेक्षकांनी गाव पातळीवर शुक्रवारी आढावा घेण्यास सुरूवात केली. नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. प्रत्यक्ष अहवालानंतर नुकसानीची आकडेवारी वाढण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. जिल्ह्यात यावर्षी दोन लाख ८० हजार हेक्टरवर रबीची लागवड झाली. यात हरभऱ्याचा पेरा सर्वाधिक आहे. सध्या काढणीला आलेला हरभरा आणि गहू गारपिटीच्या तडाख्यात सापडल्याने शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. (शहर वार्ताहर)