शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर पाकिस्तान जगाच्या नकाशावरही दिसणार नाही"; एकनाथ शिंदे यांचे सडेतोड वक्तव्य
2
Robert Prevost: काल काळा धूर, आज पांढरा बाहेर पडला; अमेरिकेचे रॉबर्ट प्रीव्होस्ट बनले नवे पोप
3
आकाश, MRSAM, Zu-23, L-70 आणि शिल्का...! होती S-400 च्या साथीला; पाकिस्तान सुदर्शन चक्र भेदू शकले नाही...
4
पाकिस्तानसाठी इकडे आड तिकडे विहीर; भारतीय सैन्यानंतर बलोच आर्मीने केले पाकवर हल्ले...
5
India Pakistan War : आयएनएस विक्रांत अ‍ॅक्शनमोडवर! पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ल्याला सुरुवात
6
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धाचा भडका? युद्धकाळात या गोष्टी टाळा, या गोष्टी करा   
7
भारताचे पाकिस्तानवर जोरदार हल्ले; लाहोर, सियालकोट, फैसलाबादमधील संरक्षण प्रणाली उद्ध्वस्त
8
India Pakistan War: पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या घरापासून २० किमी अंतरावर स्फोट
9
'मी माझ्या देशात, मला कशाची भीती...', सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकाचा व्हिडिओ व्हायरल
10
पाकिस्तानच्या हल्ल्यांना भारताकडून जोरदार प्रत्युत्तर दिले जाणार, एस जयशंकर यांचे मोठे विधान
11
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवावं, भारताच्या कारवाईदरम्यान अमेरिकेने सुनावले
12
मोदी सरकारचा पाकिस्तानवर 'सोशल मीडिया'वार! भारताकडून ८ हजार एक्स अकाऊंट बंद
13
शेवटी रशियाच कामाला आला, पाकिस्तानचा हमास स्टाईल हल्ला हवेतच थोपविला; S-400 डील झाली नसती तर...
14
JF 17 लढाऊ विमानासह हद्दीत घुसलेला पायलट भारताच्या ताब्यात
15
नियंत्रण रेषेवर गोळीबार, एकमेकांवर क्षेपणास्त्र हल्ले, भारत-पाकिस्तानमध्ये युद्धाला तोंड फुटलंय की...
16
पठाणकोट, राजौरीमध्ये दहशतवाद्यांनी खरंच आत्मघाती हल्ला केला का? भारतीय लष्कराने दिली माहिती
17
पाकिस्तानने अमेरिका, चीनचे नाक कापले! भारताने जैसलमेरमध्ये आणखी एक एफ-१६ पाडले
18
India Pakistan War: 'आताच लाहोर सोडा', अमेरिकेने पाकिस्तानात राहणाऱ्या नागरिकांना सूचना दिल्या
19
लढाऊ विमाने पाकिस्तानवर हल्ल्यासाठी झेपावली; पाकिस्तानी AWACS विमान उडविले, लाहोरकडे कूच
20
India Pakistan War : पाकिस्तानने कुपवाडा, बारामुल्लामध्ये केला हल्ला; लोकांना सुरक्षित ठिकाणी पाठवले

१० बदल्या रद्दचा प्रस्ताव

By admin | Updated: September 26, 2016 02:37 IST

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जवळपास १० कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला.

आरोग्य विभाग : सर्वसाधारण सभेतील वादावरून निर्णययवतमाळ : जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जवळपास १० कर्मचाऱ्यांच्या बदल्या रद्द करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केला. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेतील वादानंतर प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांनी हा प्रस्ताव सादर केल्याचे वृत्त आहे.सर्वसाधारण सभेत नवीन बृहत आराखड्यातील आकृतीबंधानुसार नव्याने पदस्थापना झालेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या पदस्थापनेचा व काही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सोयीच्या बदल्यांचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता. नवीन पदांना वेतन कुठून देणार, वित्त विभागाने तरतूद केली काय, असा प्रश्न सभेत उपस्थित झाला होता. २00१ च्या लोकसंख्येवर आधारित नवीन पदे १७ जानेवारी २0१३ रोजी मंजूर झाली होती. वित्त विभागाने २0१५ मध्ये आर्थिक तरतूद केली. आरोग्य संचालनालयाने तसे जिल्हा परिषदेला कळविले होते. काही सदस्यांच्या मागणीनंतर १७ जूनच्या सर्वसाधारण सभेत या पदांना मान्यता देण्यात आली होती, असे सांगण्यात येते. याच मुद्दावरून गेल्या सर्वसाधारण सभेत रणकंदन माजले होते. सोयीच्या बदल्यांवरून रान उठले होते. त्यानंतर प्रभारी आरोग्य अधिकाऱ्यांनी नवीन बृहत आराखड्यानुसार नियुक्त सात, तर तीन जुन्या कर्मचाऱ्यांच्या, अशा १0 जणांच्या बदल्या रद्द करण्याचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर केल्याची माहिती आहे. यामुळे कर्मचारी संघटना आणि प्रशासनातील वाद पुन्हा उफाळून येण्याची शक्यता आहे. या बदल्या रद्द करण्याचा प्रस्ताव सादर करणे म्हणजे त्या चुकीच्या झाल्या होत्या, यावर शिक्कामोर्तब होणार आहे. याविरूद्ध कर्मचारी संघटना वेळप्रसंगी न्यायालयात जाण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा अशोक जयसिंगपुरे यांनी दिला आहे. (शहर प्रतिनिधी)२0१३ च्या बदल्यांचा मुद्दा प्रलंबितचयापूर्वी २0१३ मध्ये काही आरोग्य कर्मचाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या होत्या. त्याला विरोध दर्शवून कर्मचाऱ्यांनी तक्रार केली होती. त्याची वाशीमच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी चौकशी केली होती. त्यांनी आपल्या अहवालात बदल्या चुकीच्या असल्याचे नमदून केले होते, अशी माहिती आहे. येथील तत्कालीन अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मात्र कारवाईस टाळाटाळ केली. त्याविरूद्ध कर्मचाऱ्यांनी आरोग्य सचिवांकडे आक्षेप घेतला. त्यांनी विभागीय आयुक्तांना पत्र दिले. आयुक्तांनी जिल्हा परिषदेला तब्बल नऊ पत्रे दिली. तरीही अद्याप या प्रकरणी कारवाई प्रलंबितच आहे.