शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्योती मल्होत्रा जिथे जिथे जाऊन आली तिथे तिथे पाकिस्तानचे ऑपरेशन सिंदूरवेळी हल्ले? गोल्डन टेंपल, पठाणकोट अन् काश्मीर...
2
कधीकाळी पाकिस्तानात राहत होते ज्योती मल्होत्राचे कुटुंब?; तपासात समोर आली नवी माहिती
3
"बिहार निवडणुकीसाठी भाजपाची खेळी..."; पहलगाम हल्ल्यावर काय म्हणाले यशवंत सिन्हा?
4
“मुंबईकर उद्धव ठाकरेंना त्यांची जागा दाखवतील, मविआच्या ५० जागाही येणार नाही”; भाजपाचा दावा
5
सुरक्षा दलांकडून नक्षलवाद्यांवर आणखी एक मोठा प्रहार, चकमकीत २६ नक्षली ठार
6
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'ची पहिली झलक समोर, 'या' दिवशी प्रदर्शित होणार चित्रपट
7
अबुझमाडमध्ये २७ नक्षल्यांना कंठस्नान; पाेलीस शहीद, १ काेटी बक्षीस असलेल्या बसवा राजूचा खात्मा
8
तुर्की अन् अझरबैजानला धक्का; भारताने आर्मेनियासोबत केला आकाश 1-एस क्षेपणास्त्र करार
9
इंग्रजी फाडफाड येत नाही, प्रश्नच मिटला! तुम्ही बोला, गुगल समोरच्याला त्याच्या भाषेत ऐकवणार...
10
पूजा खेडकर हिला मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून अटकपूर्व जामीन मंजूर
11
Jyoti Malhotra : "पाकिस्तानात माझं लग्न करुन द्या"; ज्योती मल्होत्राचं अली हसनसोबतच व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल
12
सोनिया आणि राहुल गांधी यांना झाला १४२ कोटींचा फायदा, नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीचा कोर्टात आरोप   
13
मुलांचं लग्न जमवताना एकमेकांच्या प्रेमात पडले व्याही आणि विहीण! लग्नासाठी कोर्टात पोहोचले पण... 
14
डॉक्टर की कसाई...! ५० जणांच्या हत्येनंतरही हात थरथरले नाहीत; अंगावर काटा आणणारी थरारक घटना
15
'एक नंबर तुझी कंबर' व्हायरल गाण्यावर नारकर कपलचा डान्स, व्हिएतनाममधून शेअर केला Video
16
Mumbai Rains: मुंबईत पावसाचा हाहाकार! पवईत झाड कोसळल्याने दोन जण जखमी, एकाची प्रकृती गंंभीर
17
'ऑपरेशन सिंदूर'बाबत वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या प्रा. अली खानला अंतरिम जामीन मंजूर
18
बापरे! गर्लफ्रेंड आहे की डाकू, बॉयफ्रेंडला रस्त्यात अडवला, कपडे फाटेपर्यंत चप्पलने मारले; छातीवर बसून गळा ...
19
“SCचे टॉप ५ जज सुट्ट्यांमध्ये कामावर, तरी प्रलंबित याचिकांचे खापर आमच्यावर”; CJI गवई संतापले
20
Mangal Gochar 2025: जूनमध्ये कुंजकेतू योग संघर्ष वाढवणार, 'या' पाच राशींना अधिक सतर्क राहावे लागणार!

रक्ताची नाती जोडण्यासाठी युवक सरसावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2015 01:20 IST

ऐच्छिक रक्तदानाचा ‘टक्का’ वाढत आहे

संतोष वानखडे /वाशिम: रक्ताचा एक थेंब एखाद्याचे प्राण वाचविण्यास पुरेसा ठरू शकतो. रक्ताची अशी नाती जोडण्यासाठी युवावर्ग मोठ्या संख्येने समोर येत असल्याने ऐच्छिक रक्तदानाचा ‘टक्का’ वाढत आहे. राज्यात २०१० मध्ये रक्तसंकलनाचे १०.८६ लाख यूनिटचे प्रमाण २०१४ मध्ये १४.९२ लाख यूनिटवर गेले असून, २०१५ च्या सहामाहीत ते आठ लाख युनिटच्या आसपास आहे. रक्त म्हणजे जीवन. वेळेत आणि सुरक्षित रक्त मिळाले नाही, तर प्राणांतिक प्रसंग ओढावण्याची शक्यता अधिक असते. मग तो गरीब असो अथवा श्रीमंत! रक्तदान म्हणजे जीवनदान असल्याने रक्ताचा अधिकाधिक साठा ठेवण्यासाठी आरोग्य विभागातर्फे जनजागृती केली जात आहे. रक्तदान हे श्रेष्ठदान मानले जाते; कारण आयुष्यात दानधर्म करुन जेवढे पुण्य लाभत नाही, तेवढे एखाद्याला रक्ताद्वारे जीवदान दिल्याने लाभते, असे म्हटले जाते. एखाद्याला जीवदान देण्यासाठी आता सर्व वयोगटातील नागरिक समोर येत असल्याने साहजिकच रक्तपेढीतील ऐच्छिक रक्तसंकलनात वाढ होत असल्याचे, महाराष्ट्र शासनाच्या राज्य संक्रमण परिषदेच्या आकडेवारीवरून दिसून येते.राज्यात २०१० मध्ये २७३ रक्तपेढीतून १०.८६ लाख युनिट ऐच्छिक रक्तसंकलन झाले होते. १०.८६ लाख युनिट म्हणजे १०.८६ लाख बॅग. अर्थात रक्तदातेही १०.८६ लाख! २०११ मध्ये २८२ रक्तपेढ्यांतून ११.९२ लाख युनिट, २०१२ मध्ये २९१ रक्तपेढ्यांतून १३.२९ लाख युनिट, २०१३ मध्ये ३०० रक्तपेढ्यांतून १३.९० लाख युनिट आणि २०१४ मध्ये ३१० रक्तपेढ्यांतून १४.९२ लाख युनिट रक्तसंकलन झाल्याची नोंद राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या दप्तरी आहे. २०१५ च्या सहामाहित आठ लाख युनिटच्या आसपास रक्तसंकलन झाले आहे. एकूण आणि ऐच्छिक रक्तसंकलन यावर नजर टाकली तर ऐच्छिक रक्तदानाचा ‘टक्का’ कमालिचा वाढत असल्याचे दिसून येते. २०१० मध्ये एकूण रक्तसंकलन १२.६६ लाख युनिट होते. यापैकी १०.८६ लाख युनिट रक्त संकलन ऐच्छिक रक्तदानातून झाले होते. २०१४ मध्ये १५.५९ पैकी १४.९२ लाख युनिट ऐच्छिक रक्तदानातून झालेले आहे. याचाच दुसरा अर्थ असा की, १५.५९ रक्तदात्यांपैकी १४.९२ लाख रक्तदाते ऐच्छिक या प्रकारातील आहेत.