शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफचे विघ्न, स्वदेशीचा मंत्र, अमेरिकेचे भारतावर अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ आजपासून, ४८ अब्ज डॉलर्सच्या निर्यातीला फटका
2
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
4
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
5
उच्च न्यायालयाने सुनावले, तरीही जरांगे मुंबईत आंदोलनावर ठाम! मुंबईकडे कूच करणारच, जरांगे यांचा इशारा
6
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
7
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
8
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
9
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
10
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
11
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
12
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
13
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
14
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
15
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
16
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
17
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
18
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
19
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
20
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...

दहावी, बारावीची परीक्षा तीन महिन्यांवर; अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2021 04:36 IST

कोरोनामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्र प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाचा ...

कोरोनामुळे यंदा शैक्षणिक क्षेत्र प्रभावित झाले आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ऑनलाईन शिक्षण सुरू करण्यात आले. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने २३ नोव्हेंबरपासून दहावी, बारावीचे वर्ग सुरू झाले. कोरोनामुळे यंदा अभ्यासक्रम २५ टक्के कमी करण्यात आला आहे. दरवर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: १० महिन्यांचा कालावधी दिला जात होता. यंदा कोरोनामुळे अध्ययन-अध्यापन प्रक्रिया प्रभावित झाली आहे. नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून वर्ग सुरू झाल्याने १० महिन्यांचा अभ्यासक्रम सहा महिन्यांत पूर्ण कसा होणार? असा प्रश्न विद्यार्थ्यांसह पालकांना पडला आहे.

००

दहावीचा अभ्यासक्रम

यंदा कोरोनामुळे दहावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले असले तरी गणित, विज्ञान हे विषय ऑनलाईन पद्धतीने समजून घेणे कठीणच आहे. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत शिक्षकांसह विद्यार्थ्यांना करावी लागते.

००

बारावीचा अभ्यासक्रम

यंदा कोरोनामुळे बारावीचा अभ्यासक्रम २५ टक्क्यांनी कमी केला आहे. अभ्यासक्रम पूर्ण व्हायला साधारणत: सात, आठ महिन्यांचा कालावधी लागू शकतो. नोव्हेंबर ते एप्रिल अशा सहा महिन्यांत अभ्यासक्रम पूर्ण करावा लागणार आहे. त्यामुळे शिक्षकांसह विद्यार्थ्यांची कसरत होणार आहे.

०००

कोरोनामुळे शिक्षणक्षेत्र जरी प्रभावित झाले असले तरी ऑनलाईन पद्धतीने सुरुवातीपासूनच विद्यार्थ्यांना शिकविण्यात आले आहे. २३ नोव्हेंबरपासून प्रत्यक्ष वर्गात विद्यार्थ्यांना शिकविले जात आहे. विहित कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून नियोजन करण्यात आले आहे.

- आर. बी. गरतकर,

प्राचार्य

०००

कोरोनाकाळात ऑनलाईन पद्धतीने अध्ययन-अध्यापन प्रक्रिया पार पडली आहे. यावर्षी अभ्यासक्रमात २५ टक्के कपात केली आहे. दहावी, बारावीचा अभ्यासक्रम जवळपास पूर्ण होत आला आहे. कमी वेळेत अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल.

- नेल्सन वर्गीस,

मुख्याध्यापक,

०००

यंदा कोरोनामुळे शिक्षणक्षेत्र प्रभावित झाले आहे. ऑनलाईन पद्धतीने शिकविण्यात आले. परंतु, गणित व विज्ञान हे विषय प्रत्यक्ष शिकविल्यामुळेच चांगले स्मरणात राहतात. कमी कालावधीत अभ्यासक्रम पूर्ण करण्याची कसरत आहे. -गाैरव चव्हाण, विद्यार्थी

००

तीन महिन्यांवर परीक्षा आल्या आहेत. दरवर्षी बारावीचा अभ्यासक्रम साधारणत: जून ते फेब्रुवारी या महिन्यात अभ्यासक्रम पूर्ण केला जातो. यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण व्हायला कमी कालावधी मिळाला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांची कसरत होत आहे. -मनीष जाधव, विद्यार्थी