शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंच्या मताला दिल्लीत वजन, मागणीची तत्काळ दखल; इंडिया आघाडीची होणार लवकरच बैठक
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्रामक टॅरिफ धोरणापुढे 'ड्रॅगन' फुस्स...; अमेरिकेची चांदी, झाला अब्जावधी डॉलर्सचा नफा
3
CM फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना दिलेल्या ऑफरवर संजय राऊत थेट बोलले, म्हणाले, “तुम्ही आधी...”
4
नर्स निमिषा प्रियाची फाशी तात्पुरती स्थगित, पण मृत तलालचा भाऊ ऐकेचना! आता म्हणाला...
5
"राज्यात गुटखाबंदी असल्याचे म्हणणं हास्यास्पद"; भाजप आमदाराने सरकारलाच घेरलं; म्हणाले, 'कुठेही जा...'
6
"बाळासाहेब म्हणाले, उद्या मी शिवसेना सोडली तर...?"; निष्ठेचा मुद्दा, अंबादास दानवेंनी सांगितला २००४ मधील किस्सा
7
इस्रायलचा सीरियावर हल्ला; Baba Vanga चे भाकित खरे ठरले, तिसऱ्या महायुद्धाची चाहुल..?
8
Water Cut: महत्त्वाची बातमी! मुंबईत १२ तास आणि नवी मुंबईत १८ तास पाणीपुरवठा राहणार बंद
9
एअर इंडियाच्या कॅप्टननेच इंधन स्वीच बंद केला; को-पायलटचा कापरा आवाज...; अमेरिकी रिपोर्टमध्ये मोठा दावा
10
Video - ना हेलिकॉप्टर, ना रुग्णवाहिका, विद्यार्थ्यांनी लढवली शक्कल; शिक्षिकेसाठी केलं असं काही...
11
सावधान! खोटे टॅक्स क्लेम केलेल्यांना आयकरच्या AI ने पकडले; भरावा लागेल २००% दंड आणि ७ वर्षांपर्यंत जेल!
12
माता न तू वैरिणी! प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं; ६ वर्षांच्या चिमुकलीला आईनंच संपवलं
13
Ritual: तीर्थक्षेत्री गेल्यावर अचानक पाळी आली तर दर्शन घ्यावे की नाही? प्रेमानंद महाराजांनी केला खुलासा!
14
इंदूर सलग आठव्यांदा ठरलं भारतातील सर्वात स्वच्छ शहर, महाराष्ट्रातील या शहरानं पटकावला तिसरा क्रमांक  
15
"तुझे पाय कापून टाकू, बघू तुला योगी वाचवतात की मोदी..."; छांगुर गँग द्यायची धमक्या, महिलांनी केला पर्दाफाश
16
“ST महामंडळात काय चाललेय हे मलाच माहिती नाही”; खुद्द प्रताप सरनाईक उद्विग्न, प्रकरण काय?
17
"आता हाच माझा पती"; फेसबुकवर झाली मैत्री, २० वर्षांच्या मुलासोबत २ मुलांच्या आईने थाटला संसार! पतीला कळलं अन्...
18
'पोलिसांची परवानगी घेतली नव्हती', बंगळुरू चेंगराचेंगरी प्रकरणावर कर्नाटक सरकारचा अहवाल; कोहलीचेही नाव घेतले
19
Reliance Infra Share Price: १२००% नं वधारला अनिल अंबानींच्या कंपनीचा 'हा' शेअर; आता ₹९००० कोटी उभारण्याची तयारी
20
महिलेने ९ भिक्षूंना ब्लॅकमेल करून उकळले तब्बल १०२ कोटी रुपये; घरी सापडले ८०,००० अश्लील व्हिडिओ!

महिलांच्या बोटांचे ठसे उमटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:27 IST

वाशिम : शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करण्यात अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. आधीच सर्व्हर डाउन, नेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या असताना, आता अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीचे ठसेच थम्ब मशीनवर उमटत नसल्याने शेतकरी अर्ज सादर करण्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील चित्र ऑनलाइन अर्जापासून शेतकरी राहताहेत वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करण्यात अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. आधीच सर्व्हर डाउन, नेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या असताना, आता अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीचे ठसेच थम्ब मशीनवर उमटत नसल्याने शेतकरी अर्ज सादर करण्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुक्यात पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांच्या नाकीनऊ येत आहेत. शेतकरी घरी लहान मुलांना सोडून, पत्नीसोबत सेतू केंद्रांवर ताटकळत बसत आहेत. या ठिकाणी नेट कनेक्टिव्हिटी आणि सर्व्हर डाउनची समस्या असल्याने त्यांना दिवसरात्र मुक्काम करावा लागत असून, शेतातील कामे सोडून  सतत अर्जासाठी सेतू केंद्रांच्या वार्‍या कराव्या लागत आहेत.  आता त्यात वेगळीच समस्या उद्भवली असून, अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीचे ठसेच थम्ब मशीनवर उमटत नसल्याचे प्रकार घडत आहेत. मंगरुळपीर येथील गवळीपुरा परिसरातील तीन महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. सेतू केंद्रावर या महिला अर्ज सादर करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या बोटाचे ठसे घेण्याचा प्रयत्न सेतू केंद्र संचालकाने केला; परंतु मशीनवर बोटांचे ठसेच उमटत नसल्याचे दिसले. वारंवार प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही. अखेर या महिलांना निराश होऊन घरी परतावे लागले. असाच प्रकार रविवारी मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथेही पाहायला मिळाला. जवळपास आठ ते दहा शेतकरी महिलांना या समस्येचा सामना करावा लागला.  ग्रामपंचायतमधील संगणक परिचालकाने या महिलांच्या बोटाचे ठसे अदलून बदलून तपासून पाहिले; परंतु काहीच फायदा झाला नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी एकाही पुरुषाच्या बोटाचे ठसे न उमटल्याचा प्रकार घडला नाही. सतत काम केल्याने बोटाच्या रेषा मिटल्याने असे होत नाही ना, अशी शंका या महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती कायम राहिल्यास संबंधित शेतकरी कुटुंब कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जापासून आणि पर्यायाने कर्जमाफीपासूनही वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणी शासनाने दखल घेणे आवश्यक आहे.