शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

महिलांच्या बोटांचे ठसे उमटेना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2017 01:27 IST

वाशिम : शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करण्यात अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. आधीच सर्व्हर डाउन, नेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या असताना, आता अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीचे ठसेच थम्ब मशीनवर उमटत नसल्याने शेतकरी अर्ज सादर करण्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुक्यात पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देमंगरुळपीर तालुक्यातील चित्र ऑनलाइन अर्जापासून शेतकरी राहताहेत वंचित

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : शासनाच्या कर्जमाफी योजनेसाठी अर्ज करण्यात अनेक अडचणी येत असल्याने शेतकरी मेटाकुटीस आले आहेत. आधीच सर्व्हर डाउन, नेट कनेक्टिव्हिटीच्या समस्या असताना, आता अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीचे ठसेच थम्ब मशीनवर उमटत नसल्याने शेतकरी अर्ज सादर करण्यापासून वंचित राहत असल्याचे चित्र मंगरुळपीर तालुक्यात पाहायला मिळत आहे. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेचे ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी शेतकर्‍यांच्या नाकीनऊ येत आहेत. शेतकरी घरी लहान मुलांना सोडून, पत्नीसोबत सेतू केंद्रांवर ताटकळत बसत आहेत. या ठिकाणी नेट कनेक्टिव्हिटी आणि सर्व्हर डाउनची समस्या असल्याने त्यांना दिवसरात्र मुक्काम करावा लागत असून, शेतातील कामे सोडून  सतत अर्जासाठी सेतू केंद्रांच्या वार्‍या कराव्या लागत आहेत.  आता त्यात वेगळीच समस्या उद्भवली असून, अनेक शेतकर्‍यांच्या पत्नीचे ठसेच थम्ब मशीनवर उमटत नसल्याचे प्रकार घडत आहेत. मंगरुळपीर येथील गवळीपुरा परिसरातील तीन महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागला. सेतू केंद्रावर या महिला अर्ज सादर करण्यासाठी गेल्यानंतर त्यांच्या बोटाचे ठसे घेण्याचा प्रयत्न सेतू केंद्र संचालकाने केला; परंतु मशीनवर बोटांचे ठसेच उमटत नसल्याचे दिसले. वारंवार प्रयत्न करूनही त्याला यश आले नाही. अखेर या महिलांना निराश होऊन घरी परतावे लागले. असाच प्रकार रविवारी मंगरुळपीर तालुक्यातील पार्डी ताड येथेही पाहायला मिळाला. जवळपास आठ ते दहा शेतकरी महिलांना या समस्येचा सामना करावा लागला.  ग्रामपंचायतमधील संगणक परिचालकाने या महिलांच्या बोटाचे ठसे अदलून बदलून तपासून पाहिले; परंतु काहीच फायदा झाला नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी एकाही पुरुषाच्या बोटाचे ठसे न उमटल्याचा प्रकार घडला नाही. सतत काम केल्याने बोटाच्या रेषा मिटल्याने असे होत नाही ना, अशी शंका या महिलांच्या मनात निर्माण झाली आहे. अशी परिस्थिती कायम राहिल्यास संबंधित शेतकरी कुटुंब कर्जमाफीच्या ऑनलाइन अर्जापासून आणि पर्यायाने कर्जमाफीपासूनही वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे. या प्रकरणी शासनाने दखल घेणे आवश्यक आहे.