शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
3
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
4
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
5
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
6
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
7
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
8
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
9
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
10
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
11
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला
12
२.९५ लाखांपर्यंतचा बंपर डिस्काउंट, Mahindra च्या 'या' ५ गाड्यांवर जबरदस्त ऑफर्स
13
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
14
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
15
गणेश चतुर्थी २०२५: बाप्पाला मोदक आवडतात; पण उकडीचे की तळणीचे? पद्म पुराणात सापडते उत्तर!
16
Vinod Kambli: बोलायला त्रास होतोय, चालताही येईना; विनोद कांबळींच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक माहिती
17
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
18
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
19
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
20
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार

पीक विम्याच्या परताव्यासाठी जनहित याचिका दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे आर्थिक आधार मिळतो. परंतु मागील दोन वर्षात शेतकऱ्यांवर दुबार पेरणी, ...

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे आर्थिक आधार मिळतो. परंतु मागील दोन वर्षात शेतकऱ्यांवर दुबार पेरणी, अतिवृष्टी असे दुहेरी संकट कोसळूनही कुठल्याही प्रकारची मदत पीक विमा कंपनीकडून मिळाली नाही. याबाबत वारंवार निवेदन, स्मरणपत्रे व लोकशाही मार्गाने आंदोलने करुनही राज्य व केंद्र सरकार कुठलेही पाऊल उचलताना दिसत नसल्याने आता न्यायालयात जनहित याचिका दाखल करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करणार असल्याचे मत परिवर्तन शेतकरी संघटनेचे मनोहर राठोड यांनी व्यक्त केले आहे. देशात प्रगत म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सगळ्यात अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटात सापडला असताना त्याला या संकटातून कायमस्वरूपी बाहेर काढण्याचा संकल्प कोणी करताना दिसत नाही. कर्जमाफीसाठी सोमनाथ नगर येथील शेषराव पवार व दुर्गा चव्हाण या दोन शेतकऱ्यांनी आठ महिन्याआधी अंगठा देऊनही आजपर्यंत कर्ज माफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, शेतकऱ्यांच्या याच समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मनोहर राठोड यांनी म्हटले आहे.

०००००००००००००००००

कोट: राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत असताना शासकीय व प्रशासकीय यंत्रणा या शेतकऱ्यांना मदतीला धावून येताना दिसत नाही. त्यामुळे न्यायालयाची दारे ठोठावल्या शिवाय पर्याय नसून, येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ न मिळाल्यास परिवर्तन शेतकरी संघटना जनहित याचिका दाखल करून न्याय मागणार आहे.

-मनोहर राठोड,

शेतकरी तथा सदस्य परिवर्तन शेतकरी संघटना