शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
2
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
3
तीन भाषा शिकण्यासाठी खेळाच्या तासात कपात; हिंदी शिकवण्यावरुन सुप्रिया सुळेंची CM फडणवीसांकडे मागणी
4
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
5
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
6
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
7
बुलेट ट्रेनसाठी ४० मीटरचा बॉक्स गर्डर; महाराष्ट्रात प्रथमच बसवला पूर्ण लांबीचा गर्डर 
8
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
9
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
10
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
11
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
12
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
13
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
14
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
15
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
16
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
17
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
18
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
19
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
20
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी

पीक विम्याच्या परताव्यासाठी जनहित याचिका दाखल करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2021 04:45 IST

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे आर्थिक आधार मिळतो. परंतु मागील दोन वर्षात शेतकऱ्यांवर दुबार पेरणी, ...

नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान पीक विमा योजनेमुळे आर्थिक आधार मिळतो. परंतु मागील दोन वर्षात शेतकऱ्यांवर दुबार पेरणी, अतिवृष्टी असे दुहेरी संकट कोसळूनही कुठल्याही प्रकारची मदत पीक विमा कंपनीकडून मिळाली नाही. याबाबत वारंवार निवेदन, स्मरणपत्रे व लोकशाही मार्गाने आंदोलने करुनही राज्य व केंद्र सरकार कुठलेही पाऊल उचलताना दिसत नसल्याने आता न्यायालयात जनहित याचिका दाखल करून शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी करणार असल्याचे मत परिवर्तन शेतकरी संघटनेचे मनोहर राठोड यांनी व्यक्त केले आहे. देशात प्रगत म्हणविल्या जाणाऱ्या महाराष्ट्रात सगळ्यात अधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या होतात. शेतकरी कधी अस्मानी तर कधी सुल्तानी संकटात सापडला असताना त्याला या संकटातून कायमस्वरूपी बाहेर काढण्याचा संकल्प कोणी करताना दिसत नाही. कर्जमाफीसाठी सोमनाथ नगर येथील शेषराव पवार व दुर्गा चव्हाण या दोन शेतकऱ्यांनी आठ महिन्याआधी अंगठा देऊनही आजपर्यंत कर्ज माफीची रक्कम त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही, शेतकऱ्यांच्या याच समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही मनोहर राठोड यांनी म्हटले आहे.

०००००००००००००००००

कोट: राज्यातील शेतकरी सध्या मोठ्या अडचणीत असताना शासकीय व प्रशासकीय यंत्रणा या शेतकऱ्यांना मदतीला धावून येताना दिसत नाही. त्यामुळे न्यायालयाची दारे ठोठावल्या शिवाय पर्याय नसून, येत्या ३१ ऑगस्ट पर्यंत शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ न मिळाल्यास परिवर्तन शेतकरी संघटना जनहित याचिका दाखल करून न्याय मागणार आहे.

-मनोहर राठोड,

शेतकरी तथा सदस्य परिवर्तन शेतकरी संघटना