शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
2
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
3
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
4
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
5
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
6
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
7
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...
8
आता जीवन विम्यासह आरोग्य विमा होणार स्वस्त; सरकार मोठा दिलासा देण्याच्या तयारीत
9
पावसाची डबल सेंच्युरी; २४ तासांत २०९ मिमी नाेंद; आता ‘ऑल टाइम रेकॉर्ड’ मोडण्याच्या मार्गावर
10
'मोनोरेल'कडे आपत्कालीन बचाव यंत्रणाच नाही; क्षमता फक्त गाडी ओढून स्थानकात नेण्याची!
11
भाड्याच्या जागेतील सरकारी कार्यालये पुढील वर्षी वडाळ्यात; GST भवनात करणार सगळ्यांची व्यवस्था
12
मका वाचवण्यासाठी कुंपणातून सोडलेला करंट ठरला काळ; एकाच कुटुंबातील ५ जणांचा मृत्यू
13
वादळात सहा बोटी बुडाल्या; मुंबई, गुजरातमधील सात खलाशी बेपत्ता, ११ जणांना वाचविले
14
मोनोच्या सात गाड्या दिरंगाईच्या फेऱ्यात; चाचण्या सुरू असल्याचा ‘एमएमएमओसीएल’चा दावा
15
६८२ बेकायदा बांधकामांचे पाणी, वीज तोडणार! ठाणे पालिका गुन्हेही दाखल करणार, बजावणार नोटिसा
16
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
17
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
18
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
19
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
20
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव

शेतशिवारात वन्यप्राण्यांचा धुडगुुस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:26 IST

कामरगाव : एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर असतांना कामरगाव व विळेगाव शेतशिवारात वन्यप्राण्यांनी धुडगुस घालून पेरलेले बियाणे फस्त ...

कामरगाव : एकीकडे पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतातूर असतांना कामरगाव व विळेगाव शेतशिवारात वन्यप्राण्यांनी धुडगुस घालून पेरलेले बियाणे फस्त केल्याने या शेतशिवारातील शेतकऱ्यावर दुबारपेरणीचे संकट ओढाविले आहे.

पहिल्यांदा पेरणी करतानाच बियाणे व खतांची जुळवाजुळव करतांना शेतकऱ्याच्या नाकीनऊ आले हेाते. त्यामुळे दुबार पेरणीसाठी बियाणे उपलब्ध होत नसल्याने शेतकऱ्याच्या अडचणीत वाढ झाली आहे. यंदाच्या पावसाळ्यात मृग नक्षत्रात ८ जूनला कारंजा तालुक्यात पावसाने हजेरी लावल्याने व त्यापुढे काही दिवस तालुक्यात पाऊस कायम राहिल्याने जमिनीत पेरणीयोग्य ओल झाल्याने काही शेतकऱ्यांनी पेरणी केली तर काही शेतकऱ्यांनी हवामान खात्याच्या अतिवृष्टीच्या ईशाऱ्यावर विसंबून राहून पेरणी केली नाही. त्यानंतर काहीकाळ पावसाने दडी मारल्यानंतर सदर परिसरात मागील आठवड्याभऱ्यापूर्वी पाऊस झाल्याने पेरणी न केलेल्या शेतकऱ्यांनी पेरणीस सुरुवात केली. परंतु पेरणी झाल्यानंतर सदर परिसरातील बहुतांश शेतात रानडुक्करांनी हैदोस घालून पेरलेले सोयाबीन व तुरीचे बियाणे जमिनीतून उखरून फस्त केले. त्यामुळे या शिवारातील शेतकरी हवालदिल झाले आहे. कामरगाव येथील शेतकरी किसनराव निकम यांनीसुद्धा आपले विळेगाव शेतशिवारातील सर्वे नं. ५९ मध्ये सोयाबीन व तूर या पिकांची पेरणी केली होती; परंतु रानडुक्करांनी पेरलेले संपूर्ण बियाणे उखरून खाल्ल्याने निकम यांच्यावर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. अशा परिस्थितीत वनविभागाने आर्थिक नुकसानभरपाई देण्याची व वन्यप्राण्यांचा ंबंदोबस्त करण्याची मागणी केल्या जात आहे.