शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
2
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
3
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
4
Mumbai Fire: विधान भवनाच्या प्रवेशद्वाराजवळ आग; शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याची माहिती
5
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
6
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
7
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
8
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी
9
IPL 2025: "धोनीचे फॅन्स खरे आहेत, बाकीच्यांचे..."; हरभजन सिंगने विराट कोहलीवर केला शाब्दिक हल्ला?
10
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
11
८व्या वेतन आयोगानंतर पगार आणि पेन्शन किती वाढेल? कधी लागू होईल? कोणाला मिळेल फायदा?
12
"आजाराबद्दल ऐकून काळजी वाटली, आम्ही तुमच्या सोबत..."; PM मोदींनी जो बायडेनना दिला धीर
13
एसीची सर्व्हिसिंग करण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का? अन्यथा बसेल मोठा फटका
14
मोसादचा सर्वात खतरनाक गुप्तहेर...! एली कोहेनला चौकात फाशी दिलेली, त्याला आज ६० वर्षे झाली; इस्रायलचे सिक्रेट ऑपरेशन
15
CJI साठी काय असतो प्रोटोकॉल? महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले सरन्यायाधीश गवई झाले नाराज
16
10th Pass Job: दहावी पास उमेदवारांसाठी बँकेत चांगल्या पगाराची नोकरी, लगेच करा अर्ज!
17
पाकिस्तानला माहिती देणे चूक नाही, गंभीर गुन्हा...राहुल गांधींची जयशंकर यांच्यावर घणाघाती टीका
18
India Pakistan War : मोठा खुलासा! सीमेवरील तणावाच्या काळात चीनने पाकिस्तानसाठी हेरगिरी केली
19
मीठ ते विमान... पण सुरुवात कुठून? जमशेदजी टाटांच्या पहिल्या व्यवसायाची अनोखी गोष्ट
20
ज्योती मल्होत्रा, अन् नवांकुर चौधरीसह ते 10 लोक कोण, ज्यांच्यावर देशद्रोहाचा आरोप?

पश्‍चिम व-हाड जलमय!

By admin | Updated: August 6, 2015 00:14 IST

तीस तास संततधार, महिला वाहून गेली, अनेक गावांचा संपर्क तुटला, काही राज्य मार्गही बंद !

अकोला- सोमवारपासून सलग ३0 तास सुरू असलेल्या संततधार पावसाने पश्‍चिम वर्‍हाडातील अकोला, बुलडाणा आणि वाशिम जिल्हे जलमय झाले आहेत. पुरामुळे काही राज्य मार्ग बंद झाले असून, तीनही जिल्ह्यांतील अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. अकोला जिल्ह्यात पुरामध्ये वृद्ध महिला वाहून गेली, तर बाळापूर तालुक्यात नाल्याच्या पुरामध्ये पेट्रोलचा टँकर अडकला. अकोला जिल्ह्यात बुधवारी सकाळी ८ वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासांत सरासरी १७९.४३ मि.मी. पावसाची नोंद झाली असून, सातही तालुक्यांत अतवृष्टी झाली. पूर्णा नदीला आलेल्या पुरामुळे बुधवारी दुपारी ३ पर्यंत अकोला-आकोट मार्गावरील गांधीग्रामच्या पुलावरून २५ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद होती. मोर्णा नदीला आलेल्या पुरामुळे अकोला शहरानजीकच्या चांदूर गावाचा संपर्क तुटला तसेच विद्रूपा नदीला आलेल्या पुरामुळे तेल्हारा तालुक्यात तळेगाव वडनेर, नवी उमरी, तळेगाव पातुर्डा या गावांचा संपर्क तुटला. बाळापूर तालुक्यात अंदुरा येथील पानखास नाल्याला आलेल्या पुरामुळे शेगाव-आकोट मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. अकोला-दर्यापूर मार्गही बंद होता. पानखास नाल्याला आलेल्या पुरात पेट्रोलचा टँकर अडकला असून, टँकरच्या टपावर चढलेल्या चालक व क्लीनरला पुरातून बाहेर काढण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्रयत्न सुरू होते.अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्पात बुधवारी सायंकाळपर्यंत १८.५ टक्के, तर वाण प्रकल्पात ६२.२५ टक्के जलसाठा झाला होता. बुलडाणा जिल्ह्यात सरासरी १४४.२ मि.मी. पाऊस झाला. या पावसामुळे शेगाव तालुक्यातील खिरोडा आणि नांदुरा तालुक्यातील येरळी येथील पुलावरून बुधवारी दुपारी ४ वाजेपर्यंत आठ फूट पाणी वाहत होते. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती. परिणामी जळगाव, संग्रामपूर, मलकापूर, नांदुरा तालुक्यांचा संपर्क तुटला आहे. जिल्ह्यातील लहान-मोठय़ा प्रकल्पामध्ये जलसाठा वाढला आहे. जिल्ह्यात ३ मोठे, ७ मध्यम, ७ महामंडळाचे तर ७४ लघू प्रकल्प आहेत. नळगंगा प्रकल्पात उपयुक्त साठा १५.३८ दलघमी आहे. याची टक्केवारी २२.१८ आहे. पलढग प्रकल्पाचा उपयुक्त साठा २.६८ दलघमी आहे. वाशिम जिल्हय़ात सरासरी १६४.२0 मि.मी. पाऊस पडला. नदी, नाल्यांना आलेल्या पुरामुळे प्रकल्पांच्या पाण्यात मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. कारंजा परिसरात तीन मजली इमारतीचा एक भाग कोसळला, तर काही ठिकाणी झाडेही उन्मळून पडली आहेत. जिल्हय़ात सर्वाधिक पाऊस कारंजा तालुक्यात, तर त्या पाठोपाठ मंगरुळपीर तालुक्यात झाला. जिल्ह्यातील एकबुर्जी प्रकल्पात ८ टक्के, सोनल प्रकल्पामध्ये १३ टक्के, अडाणमध्ये २४ टक्के, तर जिल्ह्यातील लघु प्रकल्पांमध्ये १४ टक्के जलसाठा होता. आता या जलसाठय़ात वाढ झाली आहे.

वृद्ध महिला वाहून गेली

       तेल्हारा तालुक्यात नागझरी नाल्याला आलेल्या पुरात वाडी अदमपूर येथील मंदिरात झोपलेली रेश्माबाई पंढरी भोजने (९0) ही वृद्ध महिला वाहून गेली. रेशमाबाईचा मृतदेह तीन किलोमीटर अंतरावर सापडला.