शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा H-1B व्हिसाबाबत निर्णय, नियम बदलावर भारताची पहिली प्रतिक्रिया; सरकार म्हणते...
2
GST कपातीनंतर Amul ची मोठी घोषणा! दूध, तूप, लोणी, आइसक्रीम स्वस्त; ग्राहकांना मोठा दिलासा, जाणून घ्या नवे दर
3
स्मृतीनं केली विक्रमांची 'बरसात'! ४१२ धावा करून ऑस्ट्रेलियाला भरलेली धडकी; एक इंज्युरी ब्रेक अन्...
4
२ लाख भारतीयांवर परिणाम, IT सेक्टर-नोकरीत फटका; ट्रम्प H-1B व्हिसा नियम बदलाने मोठे नुकसान!
5
“सरकारमधील मंत्र्यांचा बोगस दाखले देण्यासाठी यंत्रणांवर दबाव”; विजय वडेट्टीवारांचा आरोप
6
अमेरिकेने H-1B व्हिसाची घोषणा करताच शेकडो भारतीय विमानात बसलेले उतरले...; भारतात आलेले अडकले...
7
IND vs AUS : ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४०० पारची लढाई; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी
8
Mohanlal: ज्येष्ठ अभिनेते मोहनलाल यांचा दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरव, भारत सरकारची मोठी घोषणा
9
'सरकारने याबाबत माहिती द्यावी', पाकिस्तानच्या राफेल पाडल्याचा दाव्यावर काँग्रेसची प्रतिक्रिया...
10
IND vs PAK : टीम इंडियाच्या या कर्णधारानं पाक विरुद्ध Live मॅचमधून घेतलेली माघार! कारण...
11
‘वंदे भारत’ची नाचक्की, २०० जणांनीही केला नाही प्रवास; मोदींच्या बड्डेला सुरू, प्रवाशांची पाठ
12
उत्तराखंड : मुख्यमंत्री पुष्करसिंह धामींकडून चमोलीतील आपत्तीग्रस्त भागांची पाहणी, पीडितांना दिलं सर्वतोपरी मदतीचा विश्वास
13
आपटून, धोपटून...! नवरात्रीला आणायची होती ओलाची रोडस्टर; PDI तपासणीवेळी ग्राहक हादरला....
14
जीएसटीनंतर रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! पाण्याची बाटली, 'रेल नीर' स्वस्त झाले, जाणून घ्या नवे दर
15
दिशा पटानीच्या घराबाहेर झालेल्या गोळीबारावर CM योगी आदित्यानाथ यांचे रोखठोक मत, म्हणाले...
16
“राहुल गांधींनी पुरावे दिले, चौकशी करा, रामराज्याची भाषा मग अग्निपरिक्षेला का घाबरता?”: सपकाळ
17
6 एअरबॅगची सुरक्षा, 23Km चे मायलेज अन् ₹70000 + ₹1.10 लाखाचा डिस्काउंट, आताच करा बुक...
18
“संजय राऊत शरद पवारांकडे बसलेले असायचे, त्यांच्यामुळेच ठाकरे गटाचे नुकसान”; शिंदे गटाचे उत्तर
19
"जेव्हा कोणतंच काम नव्हतं तेव्हा..."; लोकप्रिय अभिनेत्याने केला ७ वर्षे खूप स्ट्रगल
20
Asia Cup 2025: जो मॅटर गाजला तोच पॅटर्न! IND vs PAK हायहोल्टेज सामन्यासंदर्भात मोठा निर्णय

रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: August 7, 2015 01:16 IST

तणनाशकाच्या वाढता वापर.

कारंजा लाड (जि. वाशिम): गतकाही वर्षांपासून शेतीपद्धतीत झालेला विघातक बदल आणि तणनाशकाच्या वाढत्या वापरामुळे गावरान वाण नष्ट झालेच शिवाय पावसाळ्याच्या दिवसांत शेताच्या बांधावर उगवणाऱ्या रानभाज्याही नामशेष झाल्याचे दिसत आहे. त्याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.विविध नैसर्गिक संकटे, शासनाचे धोरण, वाढत्या महागाईच्या तुलनेत शेतमालाला मिळणारे अत्यल्प भाव, तसेच मजुरांची वाणवा आदि कारणांमुळे भारतीय शेतीपद्धती पूर्णपणे बदलली आहे. शेतीपद्धतीत झालेल्या बदलाचे दुष्परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसत आहे. पावसाळ्यात सर्वत्र शेताच्या बांधावर व शेतामध्ये अनेक रानभाज्या निसर्गत: उगवतात. पूर्वीच्या काळी या भाज्या मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत; परंतु गत काही वर्षांमध्ये तणनाशकाच्या वापरात वाढ झाल्याने या रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रानभाज्या म्हणजे गरीब शेतमजूर, शेतकऱ्यांचा रानमेवा; परंतु हा रानमेवा आता तणनाशकाच्या अति वापरामुळे नामशेष होत असून पावसाळ्यांत या जेवणाची लज्जत वाढविणाऱ्या या भाज्याच नाहीशा होत आहेत. पूर्वी पावसाच्या आगमनाने शेतीला मातीच्या सुंगधाने मन प्रसन्न व्हायचेच. त्याचबरोबर शेताच्या बांधांवर चवळी, तरोटा, अंबाडी, चाकवत, चिवडी, लालमाठ, कटुले, अशा अनेक रानभाज्या आपोआप उगवायच्या. त्यामुळे आतासारखी महागाई तेवढी जानवत नव्हती. शेतकरी. शेतमजुरांचा अर्धा हिवाळा या भाज्यांवर निभायचा. शेतमजुर महिला घरी परत येत असताना या भाज्या तोडून आणायच्या, त्यामुळे दोन वेळेच्य भाजीची सोय व्हायची. जुन्याजाणत्या अनेकांना आजही या भाज्या आठवतात. अजच्या घडीला यातील काही भाज्या आगाऊ पैसे देवून विकत घेतल्या जातात. दशकभरापूर्वी शेती करायच्या पध्दतीत भरपूर बदल झाले आहे. शेतीच्य गरजा वाढल्या आहे. पिकासोबत येणारे तण काढून टाकण्यासाठी निंदणाची गरज असते आणि त्यासाठी मजुरांची अत्यंत निकड असते. आजच्या घडीला मजुर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे वैज्ञानिकांनी तणनाशकाचा शोध लावला. मजुरी वाढल्याने शेतकरी ना इलाजाने अशा औषधाचा वारंवार वापर करीत आहेत. त्यामुळे शेतात बांधावर उगवणाऱ्या चवळीची भाजी करडु, कोसळी, अंबाडी, तरोटा, वाघाटे, आणि रानभाज्या नामशेष होताहेत. कृषी क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनामुळे अनेक जुने गावराण वाणही नष्ट होत आहे. शेतात उगवणाऱ्या व रस्त्यावर उगवणाऱ्या तरोट्याची जागा आता गाजर गवताने घेतली आहे. तणनाशकाच्या वापराचे दुष्परिणाम समोर येत आहेत.