शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर

By admin | Updated: August 7, 2015 01:16 IST

तणनाशकाच्या वाढता वापर.

कारंजा लाड (जि. वाशिम): गतकाही वर्षांपासून शेतीपद्धतीत झालेला विघातक बदल आणि तणनाशकाच्या वाढत्या वापरामुळे गावरान वाण नष्ट झालेच शिवाय पावसाळ्याच्या दिवसांत शेताच्या बांधावर उगवणाऱ्या रानभाज्याही नामशेष झाल्याचे दिसत आहे. त्याशिवाय जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर झाला आहे.विविध नैसर्गिक संकटे, शासनाचे धोरण, वाढत्या महागाईच्या तुलनेत शेतमालाला मिळणारे अत्यल्प भाव, तसेच मजुरांची वाणवा आदि कारणांमुळे भारतीय शेतीपद्धती पूर्णपणे बदलली आहे. शेतीपद्धतीत झालेल्या बदलाचे दुष्परिणाम आता मोठ्या प्रमाणात दिसत आहे. पावसाळ्यात सर्वत्र शेताच्या बांधावर व शेतामध्ये अनेक रानभाज्या निसर्गत: उगवतात. पूर्वीच्या काळी या भाज्या मोठ्या प्रमाणात पहावयास मिळत; परंतु गत काही वर्षांमध्ये तणनाशकाच्या वापरात वाढ झाल्याने या रानभाज्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रानभाज्या म्हणजे गरीब शेतमजूर, शेतकऱ्यांचा रानमेवा; परंतु हा रानमेवा आता तणनाशकाच्या अति वापरामुळे नामशेष होत असून पावसाळ्यांत या जेवणाची लज्जत वाढविणाऱ्या या भाज्याच नाहीशा होत आहेत. पूर्वी पावसाच्या आगमनाने शेतीला मातीच्या सुंगधाने मन प्रसन्न व्हायचेच. त्याचबरोबर शेताच्या बांधांवर चवळी, तरोटा, अंबाडी, चाकवत, चिवडी, लालमाठ, कटुले, अशा अनेक रानभाज्या आपोआप उगवायच्या. त्यामुळे आतासारखी महागाई तेवढी जानवत नव्हती. शेतकरी. शेतमजुरांचा अर्धा हिवाळा या भाज्यांवर निभायचा. शेतमजुर महिला घरी परत येत असताना या भाज्या तोडून आणायच्या, त्यामुळे दोन वेळेच्य भाजीची सोय व्हायची. जुन्याजाणत्या अनेकांना आजही या भाज्या आठवतात. अजच्या घडीला यातील काही भाज्या आगाऊ पैसे देवून विकत घेतल्या जातात. दशकभरापूर्वी शेती करायच्या पध्दतीत भरपूर बदल झाले आहे. शेतीच्य गरजा वाढल्या आहे. पिकासोबत येणारे तण काढून टाकण्यासाठी निंदणाची गरज असते आणि त्यासाठी मजुरांची अत्यंत निकड असते. आजच्या घडीला मजुर मिळेनासे झाले आहेत. त्यामुळे वैज्ञानिकांनी तणनाशकाचा शोध लावला. मजुरी वाढल्याने शेतकरी ना इलाजाने अशा औषधाचा वारंवार वापर करीत आहेत. त्यामुळे शेतात बांधावर उगवणाऱ्या चवळीची भाजी करडु, कोसळी, अंबाडी, तरोटा, वाघाटे, आणि रानभाज्या नामशेष होताहेत. कृषी क्षेत्रात होत असलेल्या नवनवीन संशोधनामुळे अनेक जुने गावराण वाणही नष्ट होत आहे. शेतात उगवणाऱ्या व रस्त्यावर उगवणाऱ्या तरोट्याची जागा आता गाजर गवताने घेतली आहे. तणनाशकाच्या वापराचे दुष्परिणाम समोर येत आहेत.