शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
3
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
4
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
5
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
6
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
7
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
8
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
9
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
10
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
11
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
12
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
13
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान
14
२०७ खुनाचा आरोप, तिला पकडण्यासाठी होते २ कोटींचे इनाम ! पण तिच्या 'या' निर्णयाने तिलाच मिळतील २५ लाख
15
कमाल झाली! हसरंगाचा बॉल स्टंपला लागला, पण नशिबाच्या जोरावर बॅटर Not Out राहून चमकला (VIDEO)
16
शेअर असावा तर असा...! 5 वर्षांत लखपतींना केलं करोडपती; TV-AC अन् वॉशिंग मशीन तयार करते कंपनी
17
"होय, मतचोरी झाली !" मत चोरीतूनच भाजप सत्तेत; काँग्रेसच्या आरोपाला नक्षल्यांचे समर्थन
18
Women's Asia Cup 2025 Final : भारताची फायनलमध्ये धडक! चीनचा हिशोब चुकता करुन इतिहास रचण्याची संधी
19
IND vs PAK Head To Head Record : पाकचा नवा डाव; पण टीम इंडियाविरुद्ध फिकी ठरेल त्यांची ही चाल, कारण...
20
लाईफबॉय साबण ८, डव शाम्पू ५५, टूथपेस्ट १६ रुपयांनी स्वस्त झाली; हिंदुस्तान युनिलिव्हरची यादी आली...   

पाणी बचतीसाठी ठिबक, तुषार सिंचन पद्धत काळाची गरज  - प्रशांत बोरसे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 15:47 IST

सिंचनासाठी ठीबक, तुषार संचाचा वापर व्हायला हवा, पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. तरच पाणी बचत शक्य होईल.

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : गतवर्षीच्या पावसाळ्यात तुलनेने चांगले पर्जन्यमान झाले. यामुळे मध्यम व लघू अशी सर्वच धरणे काठोकाठ पाण्याने भरली होती. असे असताना दरवर्षीप्रमाणे यंदाही मे महिन्याच्या सुरूवातीलाच सर्वच धरणांची पाणीपातळी कमालीची खालावली आहे. अन्य जलस्त्रोतही कोरडे पडल्याने पुन्हा एकवेळ भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. त्यास कारणीभूत असलेल्या बाबी आणि त्यावर नियंत्रण मिळविणे शक्य की अशक्य, आदिंबाबत जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत बोरसे यांच्याशी साधलेला संवाद... 

वाशिम जिल्ह्यात एकूण सिंचन प्रकल्प किती आणि सद्य:स्थिती काय? वाशिम जिल्ह्यात १३१ लघू आणि ३ मध्यम अशी एकंदरित १३४ सिंचन प्रकल्प आहेत. त्यातील काही धरणांमधून पिण्याचे पाणी देखील आरक्षित केले जाते. गतवर्षी सर्वच प्रकल्प पाण्याने तुंडूब भरली होती; मात्र चुकीच्या पद्धतीने होणारा पाण्याचा अवाजवी वापर, यंदा तीव्र उन्हामुळे बाष्पीभवनाचे वाढलेले प्रमाण यासह तत्सम कारणांमुळे ९ मे २०१९ अखेर धरणांमध्ये केवळ ७ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिलेला आहे.

पाणी बचतीसाठी काय करता येणे शक्य आहे?  भौतीकदृष्ट्या जिल्ह्यात आता सिंचन प्रकल्प उभारणे अशक्य आहे. त्यामुळे आपल्या गावात झालेले धरण हे आपल्याच मालकीचे आहे, अशी खूनगाठ मनाशी बांधून प्रत्येकाने त्यातील पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. सिंचनासाठी ठीबक, तुषार संचाचा वापर व्हायला हवा, पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण होणे आवश्यक आहे. तरच पाणी बचत शक्य होईल.

सिंचन शाखांची सद्य:स्थिती काय? जिल्ह्यात १६ सिंचन शाखा कार्यान्वित आहेत; परंतु त्यात उपलब्ध मनुष्यबळ तुलनेने फारच कमी आहे. ही बाब लक्षात घेवून पाणीवापर संस्थांचे बळकटीकरण करण्यावर विशेष भर दिला जात आहे. 

जुन्या प्रकल्प परिसरातील कालवे दुरूस्तीबाबत काय सांगाल? धरणांमधील पाणी उपसा पद्धतीने घेण्यावर शेतकºयांचा अधिक कल असतो. यामुळे खालच्या गावांमधील शेतकºयांना कालव्याव्दारे पाणी मिळत नाही. भविष्यात मोठा संघर्ष निर्माण करणारी ही स्थिती बदलण्यासाठी गावागावात पाणीवापर संस्था पूर्ण ताकदीने सक्षम होणे आवश्यक आहे. नादुरूस्त कालव्यांच्या दुरूस्तीकरिता अंदाजपत्रके तयार करून शासनाची मान्यता घेण्यासाठी प्रस्ताव सादर केले जात आहेत.

टॅग्स :washimवाशिमwater scarcityपाणी टंचाई