शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
4
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
5
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
6
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
7
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
9
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
10
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
11
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
12
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
13
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
14
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान
15
कॉमेडीचं गँगवॉर गाजणार! 'चला हवा येऊ द्या' च्या नवीन पर्वाला 'या' दिवशीपासून सुरुवात होणार
16
शुभांशू शुक्ला यांच्या प्रयोगामुळे हाडांच्या विकारांवर होणार परिणामकारक उपचार
17
नीरज चोप्रा बनला ‘एनसी क्लासिक चॅम्पियन’
18
राज-उद्धव २० वर्षांनंतर एकत्र, बाळासाहेबांना जमले नाही, ते फडणवीसांनी आम्हाला एकत्र करून दाखवले: राज ठाकरे
19
शर्मिला ठाकरे अश्रू पुसत सर्वांना भेटल्या, आदित्य-अमित यांच्याही डोळ्यात आनंद
20
टेरिफ वादळात भारतीय शेतीचे काय होणार?

साखरावासींचा पाण्याचा ताळेबंद

By admin | Updated: June 28, 2014 01:42 IST

साखरावासीं पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या ताळेबंदानुसार करणार पिकांचे नियोजन.

वाशिम : आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कार्यक्रमांतर्गत ग्राम साखरा येथे कृषी मित्र बहुउद्देशीय संस्था बोराळाच्यावतीने पाण्याचा ताळेबंद जाहीर करण्यात आला आहे. या गावाचे शेतकरी पाण्याच्या ताळेबंदानुसार पिकांचे नियोजन करणार आहेत. या गावाचा उपलब्ध पाणी साठा ८८.५७ कोटी लिटर आहे; परंतु अनाठायी वापरामुळे ३८.४७ कोटी लिटर पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे या गावाला दरवर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी पाणी अडवा आणि पाणी जिरवा, मोहीम राबविणे व पिकांचे व्यवस्थित नियोजन करण्याचा उपाय योग्य असल्याचे कृषी मित्र संस्थेने ताळेबंदावरुन सुचविले आहे. त्यामुळे साखरा गावचे शेतकरी यंदा पाण्याच्या ताळेबंदानुसार पिकांचे नियोजन करीत आहेत.कृषी मित्र संस्थेचे अध्यक्ष आर.आर.वानखेडे व सचिव नारायण महाले यांनी साखरा गावाचा पाण्याच्या ताळेबंद घोषित केला आहे. त्यानुसार साखरा गावाचे भौगोलिक क्षेत्र ७२१.६४ हेक्टर असून, गावठाणचे क्षेत्र १.२0 हेक्टर आहे. गावातील लोकसंख्या १00३ आहे. जनावरांची संख्या ३३४ व सरासरी पर्जन्यमान ७५0 मि.मि. आहे. गावठाणात पडणारा पाऊस १ कोटी लिटर आहे तर गावशिवारात ३९२.१३ कोटी लिटर पाणी पडते. लघुसिंचन तलावपाझर तलाव, नाला, सिमेंट बंधारे आदी स्त्रोतांद्वारे भूजलात रुपांतरीत होणारा साठा १.९८ कोटी लिटर आहे. गावाच्या लोकांच्या पिण्यासाठी व वापरण्यासाठी १.८३ कोटी लिटर वापरले जाते. जनावरांसाठी २.११ कोटी लिटर पाणी वापरले जाते. शेती वर्गवारीनुसार शेतीसाठी ११.८१ कोटी तर २२ कोटी लिटर पाणी बिगर शेती कामांसाठी वापरले जाते.पाणी ३५ टक्के १0६.६६ कोटी लिटर अर्थात ३५ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते तर जमिनीवर शेवटपर्यंत साठून राहणारे पाणी पाच टक्के अर्थात २९.५२ कोटी लिटर आहे. गावातील नळपाणी पुरवठा, विहिरी, हातपंप, विद्युत पंप, सार्वजनिक विहिरी अशा स्त्रोतांपासून १.९७ कोटी लिटर पाणी उपलब्ध होते. अशा प्रकारे एकूण ८८.४७ कोटी लिटर पाणी उपलब्ध होत असताना त्याचा अनाठायी वापर केला जात असल्याने ३८.४७ कोटी लिटर पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे गावाची पाणीटंचाई दूर करण्यासाठी यावर्षी पावसाळय़ात कमी पाण्यावर वाढणारी पिके घेऊन तुषार व सूक्ष्म सिंचनाचा वापर करुन व विहिरींचे पुनर्भरण करण्याचा निर्धार साखराच्या ग्रामस्थांनी व शेतकर्‍यांनी केला आहे.