शहरं
Join us  
Trending Stories
1
PM मोदींच्या मणिपूर दौऱ्यापूर्वी मोठे यश; राज्य आणि केंद्राने कुकी समूहाशी केला शांतता करार
2
"विकास हा संतुलितपणे हवा"; व्हायरल व्हिडीओनंतर सर्वोच्च न्यायालयाने टोचले कान, केंद्राला नोटीस
3
खराब सर्व्हिस, समस्या...! बजाज चेतक पाचव्या नंबरवर फेकली गेली! ऑगस्टमध्ये स्कूटर खपविताना आले नाकीनऊ...
4
१८ तास असेल राम मंदिर बंद, ‘या’ दिवशी अयोध्येत अजिबात जाऊ नका; रामलला विश्रांती घेणार?
5
US Open 2025: अमेरिकन ओपन स्पर्धेत भारतीयाचा जलवा! जेतेपदाच्या अगदी जवळ पोहचलाय; आता फक्त...
6
पीएम किसानचा २१ वा हप्ता अडकणार? 'ही' चूक तात्काळ दुरुस्त करा, अन्यथा २००० रुपये मिळणार नाहीत!
7
हुंड्याने घेतला आणखी एक बळी! २८ वर्षांच्या पूजाश्रीने संपवलं जीवन, पतीला अटक, काय-काय घडलं?
8
पतीचा पगार वाढला तर पत्नीची पोटगीची रक्कमही वाढणार?; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल
9
'आठ दिवसात गुन्हा दाखल करा, अजित पवारांनी राजीनामा द्यावा'; महिला आयपीएस अधिकाऱ्याला तंबी प्रकरणी या नेत्याने उपमुख्यमंत्र्यांना फटकारले
10
पाकिस्तानात अंतर्गत धुसफूस! असीम मुनीरचा 'भाव' वाढल्याने संरक्षण मंत्री देणार राजीनामा?
11
जय श्रीराम! राम दर्शनासाठी आता लाइन लावावी लागणार नाही, पासही नको; अयोध्येत नवीन व्यवस्था
12
झाले उलटेच...! मर्सिडीज, बीएमडब्ल्यू, जेएलआर आणि ऑडी कार स्वस्त होणार; धनाढ्यांनाही GST पावला
13
Video: 'बिग बॉस १९' विशेष टास्कमध्ये प्रणित मोरेची तुफान कॉमेडी, सदस्य हसून हसून लोटपोट
14
Jio Recharge Plan: दररोज २GB डेटासह हवीये दीर्घ वैधता; 'हे' रिचार्ज प्लान्स आहेत बेस्ट
15
दिल्ली-मुंबईसह अनेक शहरांत उद्या बँका बंद राहणार का, पाहा काय म्हटलंय RBI नं?
16
'युक्रेनमधील शांततेसाठी भारतावर कर लावणे आवश्यक', ट्रम्प प्रशासनाचा न्यायालयात युक्तिवाद
17
मुंबई, उपनगरामध्ये मध्ये ईद ए मिलादच्या सुट्टीत बदल, राज्य सरकारने काढले आदेश
18
“छगन भुजबळांच्या मनातील शंका आम्ही दूर करू, ओबीसींवर अन्याय होणार नाही”: CM फडणवीस
19
Income Tax रिटर्न फाईल करण्याची अंतिम मुदत १५ सप्टेंबर; तारीख चुकवल्यास काय होईल? जाणून घ्या
20
Video: बंगाल विधानसभेत जोरदार राडा; BJP-TMC आमदारांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी, कारण...

साखरावासींचा पाण्याचा ताळेबंद

By admin | Updated: June 28, 2014 01:42 IST

साखरावासीं पाणीटंचाईवर मात करण्यासाठी पाण्याच्या ताळेबंदानुसार करणार पिकांचे नियोजन.

वाशिम : आदर्श गाव संकल्प व प्रकल्प कार्यक्रमांतर्गत ग्राम साखरा येथे कृषी मित्र बहुउद्देशीय संस्था बोराळाच्यावतीने पाण्याचा ताळेबंद जाहीर करण्यात आला आहे. या गावाचे शेतकरी पाण्याच्या ताळेबंदानुसार पिकांचे नियोजन करणार आहेत. या गावाचा उपलब्ध पाणी साठा ८८.५७ कोटी लिटर आहे; परंतु अनाठायी वापरामुळे ३८.४७ कोटी लिटर पाण्याचा तुटवडा जाणवतो. त्यामुळे या गावाला दरवर्षी पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. या समस्येवर मात करण्यासाठी पाणी अडवा आणि पाणी जिरवा, मोहीम राबविणे व पिकांचे व्यवस्थित नियोजन करण्याचा उपाय योग्य असल्याचे कृषी मित्र संस्थेने ताळेबंदावरुन सुचविले आहे. त्यामुळे साखरा गावचे शेतकरी यंदा पाण्याच्या ताळेबंदानुसार पिकांचे नियोजन करीत आहेत.कृषी मित्र संस्थेचे अध्यक्ष आर.आर.वानखेडे व सचिव नारायण महाले यांनी साखरा गावाचा पाण्याच्या ताळेबंद घोषित केला आहे. त्यानुसार साखरा गावाचे भौगोलिक क्षेत्र ७२१.६४ हेक्टर असून, गावठाणचे क्षेत्र १.२0 हेक्टर आहे. गावातील लोकसंख्या १00३ आहे. जनावरांची संख्या ३३४ व सरासरी पर्जन्यमान ७५0 मि.मि. आहे. गावठाणात पडणारा पाऊस १ कोटी लिटर आहे तर गावशिवारात ३९२.१३ कोटी लिटर पाणी पडते. लघुसिंचन तलावपाझर तलाव, नाला, सिमेंट बंधारे आदी स्त्रोतांद्वारे भूजलात रुपांतरीत होणारा साठा १.९८ कोटी लिटर आहे. गावाच्या लोकांच्या पिण्यासाठी व वापरण्यासाठी १.८३ कोटी लिटर वापरले जाते. जनावरांसाठी २.११ कोटी लिटर पाणी वापरले जाते. शेती वर्गवारीनुसार शेतीसाठी ११.८१ कोटी तर २२ कोटी लिटर पाणी बिगर शेती कामांसाठी वापरले जाते.पाणी ३५ टक्के १0६.६६ कोटी लिटर अर्थात ३५ टक्के पाण्याचे बाष्पीभवन होते तर जमिनीवर शेवटपर्यंत साठून राहणारे पाणी पाच टक्के अर्थात २९.५२ कोटी लिटर आहे. गावातील नळपाणी पुरवठा, विहिरी, हातपंप, विद्युत पंप, सार्वजनिक विहिरी अशा स्त्रोतांपासून १.९७ कोटी लिटर पाणी उपलब्ध होते. अशा प्रकारे एकूण ८८.४७ कोटी लिटर पाणी उपलब्ध होत असताना त्याचा अनाठायी वापर केला जात असल्याने ३८.४७ कोटी लिटर पाण्याचा तुटवडा निर्माण होतो. त्यामुळे गावाची पाणीटंचाई दूर करण्यासाठी यावर्षी पावसाळय़ात कमी पाण्यावर वाढणारी पिके घेऊन तुषार व सूक्ष्म सिंचनाचा वापर करुन व विहिरींचे पुनर्भरण करण्याचा निर्धार साखराच्या ग्रामस्थांनी व शेतकर्‍यांनी केला आहे.