शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात वाशिम अव्वल!

By admin | Updated: May 31, 2017 01:10 IST

वाशिम जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा ९१.३१ टक्के निकाल : रिसोड तालुका आघाडीवर, तर मानोरा तालुका माघारला!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ९१.३१ टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे. मागील वर्षी वाशिम जिल्हा ८५.०२ टक्के निकालासह विभागात चौथ्या क्रमांकावर होता.जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १७ हजार ७४३ नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९१.३१ अशी आहे. उत्तीर्ण १६ हजार १९३ विद्यार्थ्यांमध्ये ९५२८ मुले व ६६६५ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.९० तर मुलींची टक्केवारी ९३.४१ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल रिसोड तालुक्याचा ९४.१९ टक्के लागला आहे. त्याखालोखाल वाशिम तालुका ९२.५१ टक्के, कारंजा तालुका ९२.३० टक्के, मंगरूळपीर तालुका ९१.२१ टक्के, मालेगाव तालुका ८८.३८ टक्के तर मानोरा तालुक्याचा सर्वात कमी अर्थात ८४.९० टक्के निकाल लागला आहे.वाशिम तालुक्यात २४०६ मुले व १६६६ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २१८१ मुले व १६८६ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.६५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.२० अशी आहे. मालेगाव तालुक्यात १५०३ मुले व ८३७ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १३०७ मुले व ७६१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८६.९६ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.९२ अशी आहे. रिसोड तालुक्यात २६७५ मुले व १६०९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २५०६ मुले व १५२९ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९३.६८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.०३ अशी आहे. कारंजा तालुक्यात १४६० मुले व ११७८ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १३१८ मुले व १११७ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.२७ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.८२ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यात १३४७ मुले व १०६६ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १२१० मुले व ९९१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८९.८३ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९२.९६ अशी आहे. मानोरा तालुक्यात १२०८ मुले व ७७९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १००६ मुले व ६८१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८३.२८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८७.४२ अशी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के, कला शाखेचा ८६.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा ९४.९४ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८९.३७ टक्के निकाल लागला आहे. ११ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावर्षी इयत्ता बारावीच्या पुनर्परीक्षार्थींचा निकाल ४३.६९ टक्के लागला आहे. रिसोड तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावरमागील वर्षी जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिसोड तालुक्याने यंदा प्रथम क्रमांकावर येण्याचा मान पटकावला आहे. गतवर्षी क्रमांक एकवर असलेला मंगरूळपीर तालुका यंदा चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. गतवर्षी पाचव्या स्थानावर असलेला मानोरा तालुका यावर्षी सहाव्या स्थानावर गेला आहे. गतवर्षी चौथ्या स्थानावर असलेला मालेगाव तालुका यावर्षी पाचव्या स्थानावर गेला आहे. गतवर्षी तिसऱ्या स्थानावर असलेल्या वाशिम तालुक्याने यावर्षी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. गतवर्षी सहाव्या स्थानावर असलेला कारंजा तालुका यावर्षी तिसऱ्या स्थानावर आला आहे.गतवर्षीप्रमाणेच मुलींनी मारली बाजी! गतवर्षीच्या बारावीच्या निकालात टक्केवारीच्या दृष्टीने मुलींनीच बाजी मारली होती. यावर्षीही टक्केवारीत अव्वल राहण्याची परंपरा कायम ठेवत मुलींनी चारच्या आसपास अधिक टक्केवारी मिळविली आहे. यावर्षी मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.४१ अशी आहे तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.९० अशी आहे. गतवर्षी मुलांची उत्तीर्णची टक्केवारी ८२.९९ तर मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ८७.९१ अशी आहे. २०१५ मध्ये मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.३१ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.२६ अशी होती.प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ! जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा निकालाच्या टक्केवारीत समाधानकारक वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे यंदा जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येतदेखील वाढ झाली असल्याचे दिसून येते. गतवर्षी जिल्ह्यात प्राविण्य श्रेणीत ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा प्राविण्य श्रेणीत तब्बल ११३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी प्रथमश्रेणीत ५२७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा ८९४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी द्वितीय श्रेणीत ५२४४ तर उत्तीर्ण श्रेणीत २१४ विद्यार्थी उर्त्तीर्ण झाले होते. यावर्षी द्वितीय श्रेणीत ५९२१ विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणीत १९० विद्यार्थी आहेत.