शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

अमरावती विभागात वाशिम अव्वल!

By admin | Updated: May 31, 2017 01:10 IST

वाशिम जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा ९१.३१ टक्के निकाल : रिसोड तालुका आघाडीवर, तर मानोरा तालुका माघारला!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ९१.३१ टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे. मागील वर्षी वाशिम जिल्हा ८५.०२ टक्के निकालासह विभागात चौथ्या क्रमांकावर होता.जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १७ हजार ७४३ नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९१.३१ अशी आहे. उत्तीर्ण १६ हजार १९३ विद्यार्थ्यांमध्ये ९५२८ मुले व ६६६५ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.९० तर मुलींची टक्केवारी ९३.४१ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल रिसोड तालुक्याचा ९४.१९ टक्के लागला आहे. त्याखालोखाल वाशिम तालुका ९२.५१ टक्के, कारंजा तालुका ९२.३० टक्के, मंगरूळपीर तालुका ९१.२१ टक्के, मालेगाव तालुका ८८.३८ टक्के तर मानोरा तालुक्याचा सर्वात कमी अर्थात ८४.९० टक्के निकाल लागला आहे.वाशिम तालुक्यात २४०६ मुले व १६६६ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २१८१ मुले व १६८६ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.६५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.२० अशी आहे. मालेगाव तालुक्यात १५०३ मुले व ८३७ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १३०७ मुले व ७६१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८६.९६ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.९२ अशी आहे. रिसोड तालुक्यात २६७५ मुले व १६०९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २५०६ मुले व १५२९ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९३.६८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.०३ अशी आहे. कारंजा तालुक्यात १४६० मुले व ११७८ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १३१८ मुले व १११७ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.२७ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.८२ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यात १३४७ मुले व १०६६ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १२१० मुले व ९९१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८९.८३ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९२.९६ अशी आहे. मानोरा तालुक्यात १२०८ मुले व ७७९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १००६ मुले व ६८१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८३.२८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८७.४२ अशी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के, कला शाखेचा ८६.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा ९४.९४ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८९.३७ टक्के निकाल लागला आहे. ११ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावर्षी इयत्ता बारावीच्या पुनर्परीक्षार्थींचा निकाल ४३.६९ टक्के लागला आहे. रिसोड तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावरमागील वर्षी जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिसोड तालुक्याने यंदा प्रथम क्रमांकावर येण्याचा मान पटकावला आहे. गतवर्षी क्रमांक एकवर असलेला मंगरूळपीर तालुका यंदा चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. गतवर्षी पाचव्या स्थानावर असलेला मानोरा तालुका यावर्षी सहाव्या स्थानावर गेला आहे. गतवर्षी चौथ्या स्थानावर असलेला मालेगाव तालुका यावर्षी पाचव्या स्थानावर गेला आहे. गतवर्षी तिसऱ्या स्थानावर असलेल्या वाशिम तालुक्याने यावर्षी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. गतवर्षी सहाव्या स्थानावर असलेला कारंजा तालुका यावर्षी तिसऱ्या स्थानावर आला आहे.गतवर्षीप्रमाणेच मुलींनी मारली बाजी! गतवर्षीच्या बारावीच्या निकालात टक्केवारीच्या दृष्टीने मुलींनीच बाजी मारली होती. यावर्षीही टक्केवारीत अव्वल राहण्याची परंपरा कायम ठेवत मुलींनी चारच्या आसपास अधिक टक्केवारी मिळविली आहे. यावर्षी मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.४१ अशी आहे तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.९० अशी आहे. गतवर्षी मुलांची उत्तीर्णची टक्केवारी ८२.९९ तर मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ८७.९१ अशी आहे. २०१५ मध्ये मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.३१ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.२६ अशी होती.प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ! जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा निकालाच्या टक्केवारीत समाधानकारक वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे यंदा जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येतदेखील वाढ झाली असल्याचे दिसून येते. गतवर्षी जिल्ह्यात प्राविण्य श्रेणीत ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा प्राविण्य श्रेणीत तब्बल ११३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी प्रथमश्रेणीत ५२७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा ८९४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी द्वितीय श्रेणीत ५२४४ तर उत्तीर्ण श्रेणीत २१४ विद्यार्थी उर्त्तीर्ण झाले होते. यावर्षी द्वितीय श्रेणीत ५९२१ विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणीत १९० विद्यार्थी आहेत.