शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
6
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
7
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
8
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
9
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
10
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
11
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
12
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
13
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
14
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
15
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
16
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
17
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
18
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
19
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
20
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
Daily Top 2Weekly Top 5

अमरावती विभागात वाशिम अव्वल!

By admin | Updated: May 31, 2017 01:10 IST

वाशिम जिल्ह्याचा इयत्ता बारावीचा ९१.३१ टक्के निकाल : रिसोड तालुका आघाडीवर, तर मानोरा तालुका माघारला!

लोकमत न्यूज नेटवर्कवाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१७ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत वाशिम जिल्ह्याचा निकाल ९१.३१ टक्के लागला असून, अमरावती विभागात वाशिम जिल्हा पहिल्या स्थानावर आला आहे. मागील वर्षी वाशिम जिल्हा ८५.०२ टक्के निकालासह विभागात चौथ्या क्रमांकावर होता.जिल्ह्यात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी १७ हजार ७४३ नियमित विद्यार्थ्यांनी नाव नोंदणी केली होती. त्यापैकी १७ हजार ७३४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. यापैकी १६ हजार १९३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, निकालाची टक्केवारी ९१.३१ अशी आहे. उत्तीर्ण १६ हजार १९३ विद्यार्थ्यांमध्ये ९५२८ मुले व ६६६५ मुली आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.९० तर मुलींची टक्केवारी ९३.४१ अशी आहे. मागील वर्षीप्रमाणे यावर्षीही मुलींनी निकालात मुलांपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित बाजी मारली. जिल्ह्यात सर्वाधिक निकाल रिसोड तालुक्याचा ९४.१९ टक्के लागला आहे. त्याखालोखाल वाशिम तालुका ९२.५१ टक्के, कारंजा तालुका ९२.३० टक्के, मंगरूळपीर तालुका ९१.२१ टक्के, मालेगाव तालुका ८८.३८ टक्के तर मानोरा तालुक्याचा सर्वात कमी अर्थात ८४.९० टक्के निकाल लागला आहे.वाशिम तालुक्यात २४०६ मुले व १६६६ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २१८१ मुले व १६८६ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.६५ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.२० अशी आहे. मालेगाव तालुक्यात १५०३ मुले व ८३७ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १३०७ मुले व ७६१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८६.९६ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९०.९२ अशी आहे. रिसोड तालुक्यात २६७५ मुले व १६०९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी २५०६ मुले व १५२९ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९३.६८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९५.०३ अशी आहे. कारंजा तालुक्यात १४६० मुले व ११७८ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १३१८ मुले व १११७ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ९०.२७ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.८२ अशी आहे. मंगरूळपीर तालुक्यात १३४७ मुले व १०६६ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १२१० मुले व ९९१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८९.८३ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९२.९६ अशी आहे. मानोरा तालुक्यात १२०८ मुले व ७७९ मुलींनी बारावीची परीक्षा दिली होती. यापैकी १००६ मुले व ६८१ मुली उत्तीर्ण झाल्या. येथे उत्तीर्ण मुलांची टक्केवारी ८३.२८ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ८७.४२ अशी आहे. जिल्ह्यात विज्ञान शाखेचा निकाल ९७ टक्के, कला शाखेचा ८६.३३ टक्के, वाणिज्य शाखेचा ९४.९४ टक्के तर व्होकेशनल शाखेचा ८९.३७ टक्के निकाल लागला आहे. ११ शाळांचा निकाल १०० टक्के लागला आहे. यावर्षी इयत्ता बारावीच्या पुनर्परीक्षार्थींचा निकाल ४३.६९ टक्के लागला आहे. रिसोड तालुका जिल्ह्यात प्रथम क्रमांकावरमागील वर्षी जिल्ह्यात दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या रिसोड तालुक्याने यंदा प्रथम क्रमांकावर येण्याचा मान पटकावला आहे. गतवर्षी क्रमांक एकवर असलेला मंगरूळपीर तालुका यंदा चौथ्या क्रमांकावर घसरला आहे. गतवर्षी पाचव्या स्थानावर असलेला मानोरा तालुका यावर्षी सहाव्या स्थानावर गेला आहे. गतवर्षी चौथ्या स्थानावर असलेला मालेगाव तालुका यावर्षी पाचव्या स्थानावर गेला आहे. गतवर्षी तिसऱ्या स्थानावर असलेल्या वाशिम तालुक्याने यावर्षी दुसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे. गतवर्षी सहाव्या स्थानावर असलेला कारंजा तालुका यावर्षी तिसऱ्या स्थानावर आला आहे.गतवर्षीप्रमाणेच मुलींनी मारली बाजी! गतवर्षीच्या बारावीच्या निकालात टक्केवारीच्या दृष्टीने मुलींनीच बाजी मारली होती. यावर्षीही टक्केवारीत अव्वल राहण्याची परंपरा कायम ठेवत मुलींनी चारच्या आसपास अधिक टक्केवारी मिळविली आहे. यावर्षी मुलींची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ९३.४१ अशी आहे तर मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८९.९० अशी आहे. गतवर्षी मुलांची उत्तीर्णची टक्केवारी ८२.९९ तर मुलींची उत्तीर्णची टक्केवारी ८७.९१ अशी आहे. २०१५ मध्ये मुलांच्या निकालाची टक्केवारी ९१.३१ तर मुलींच्या निकालाची टक्केवारी ९४.२६ अशी होती.प्रावीण्य श्रेणीतील विद्यार्थ्यांच्या संख्येत वाढ! जिल्ह्यात गतवर्षीपेक्षा यंदा निकालाच्या टक्केवारीत समाधानकारक वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे यंदा जिल्ह्यात गुणवंत विद्यार्थ्यांच्या संख्येतदेखील वाढ झाली असल्याचे दिसून येते. गतवर्षी जिल्ह्यात प्राविण्य श्रेणीत ५९८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा प्राविण्य श्रेणीत तब्बल ११३३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी प्रथमश्रेणीत ५२७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते. यंदा ८९४९ विद्यार्थी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. गतवर्षी द्वितीय श्रेणीत ५२४४ तर उत्तीर्ण श्रेणीत २१४ विद्यार्थी उर्त्तीर्ण झाले होते. यावर्षी द्वितीय श्रेणीत ५९२१ विद्यार्थी तर उत्तीर्ण श्रेणीत १९० विद्यार्थी आहेत.