शहरं
Join us  
Trending Stories
1
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
2
Monsoon Update : आनंदाची बातमी! वेळेआधीच मान्सून दाखल होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
3
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
4
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
5
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
6
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
7
जिगरबाज...! समुद्रात बुडणाऱ्या महिलेला वाचविण्यासाठी वाहतूक पोलिसाची पाण्यात उडी
8
'हा भारताचा स्पष्ट विजय', जगातील सर्वात प्रतिष्ठित संरक्षण तज्ज्ञाने पाकिस्तानला दाखवला आरसा
9
“इस व्यक्ति को जानते हैं?” WhatsApp वरचा 'हा' मेसेज अन् फोटो करू शकतो बँक खातं रिकामं
10
Recruitment: भारतीय लष्करात भरती होण्याची संधी; नेमकं काम काय? कोण करू शकतं अप्लाय? कधी? आणि कसं?... इथे वाचा!
11
जुन्या भांडणावरुन बाप-लेकाचा चाकू अन् लोखंडी पाईपने खून, बदनापूरमधील धक्कादायक घटना
12
BJP District President: ६ विभागात ५८ जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; भाजपानं दिली नव्या चेहऱ्यांना संधी, वाचा यादी
13
युद्धविरामानंतरही डिफेन्स स्टॉक्स तेजीत; PM मोदींच्या विधानाने बदललं गणित
14
बाबा वेंगा यांची पाकिस्तानबाबत धक्कादायक भविष्यवाणी! ६ वर्षापूर्वी अभ्यासात उल्लेख होता
15
पाकिस्तानला काही सुधरेना! सिंधू जल करारावरून परराष्ट्र मंत्र्यांची दर्पोक्ती; म्हणे, तर युद्धविराम भंग होऊ शकतो!
16
Mumbai Metro 3: तुम्हाला माहित्येय का? सिद्धिविनायक मेट्रो स्टेशनला आहेत एकूण 7 Entry-Exit मार्ग, जाणून घ्या...
17
CBSE बोर्डाचा १०वीचा निकाल जाहीर! गेल्या वर्षींपेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण, मुली मुलांपेक्षा वरचढ
18
Gold Rates 13 May : एका झटक्यात चांदी २२५५ रुपयांनी महागली, सोन्याच्या दरातही मोठी तेजी; खरेदीपूर्वी नवे दर
19
Swapna Shastra: पाण्याशी संबंधित कोणतेही स्वप्नं आगामी सुख दु:खाची देतात चाहूल; कशी ते पहा!
20
Operation Keller: सुरक्षा दलाची मोठी कारवाई; जम्मू-काश्मीरमध्ये लष्कर-ए-तैयबाचे 3 दहशतवादी ठार

वाशिम जिल्ह्यात ४0 टक्के शेत पडीक

By admin | Updated: December 23, 2015 02:33 IST

अल्पवृष्टीचा परिणाम ; उत्पादनावरही होणार परिणाम.

विवेक चांदूरकर / वाशिम: यावर्षी रब्बी हंगामावर अल्पवृष्टीचा भीषण परिणाम झाला असून, सरासरीच्या ६0 टक्केच पेरणी झाली आहे तर ४0 टक्के शेत पडीक आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेती व्यवसायाची दाहकता निदर्शनास येत आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना यावर्षी मोठय़ा नुकसानाचा सामना करावा लागणार आहे.जिल्हय़ात गत तीन वर्षांपासून सातत्याने दुष्काळ पडत आहे. त्यामुळे शेती व्यवसाय पूर्णत: मोडकळीस आला आहे. गतवर्षी जिल्हय़ात सरासरीच्या ६९ टक्केच पाऊस झाला. तसेच यावर्षी सरासरीच्या ८३ टक्के पाऊस झाला. जिल्हय़ाचे सरासरी पर्जन्यमान ७९९ मिमी असून, यावर्षी केवळ ६६४ मिमी पाऊस झाला आहे. गत दोन वर्षात जिल्हय़ात जवळपास ५0 टक्के कमी पाऊस झिरपला. जमिनीमध्ये ओलावा राहिला नाही. यावर्षी खरीप हंगामातच शेतकर्‍यांच्या पदरी निराशा आली. सोयाबीनच्या उत्पादनात ५0 टक्क्यांपेक्षा जास्त घट आली. काही शेतकर्‍यांना एकरी एक ते दोन क्विंटलच उत्पादन झाले. शेतकर्‍यांना रब्बी हंगामाकडून अपेक्षा होती; मात्र यावर्षी परतीच्या पावसाने दगा दिल्यामुळे जमिनीत ओल राहिली नाही. त्यामुळे शेतकर्‍यांनी पेरणी न करण्याचाच निर्णय घेतला असून, डिसेंबर महिना संपत आला तरी जिल्हय़ात केवळ ५१ हजार ७८८ हेक्टरवरच पेरणी करण्यात आली आहे. जिल्हय़ात यावर्षी कृषी विभागाच्या वतीने रब्बी हंगामात ८९२७0 हेक्टरचे नियोजन करण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात ५१७८८ हेक्टरवरच पेरणी करण्यात आली, तर ३७ हजार ४८२ हेक्टर क्षेत्र पडीक आहे. यावरून जिल्हय़ातील कृषी व्यवसायाची झालेली दैना निदर्शनास येते. जिल्हय़ात रब्बी हंगामातील हरभरा हे मुख्य पीक असून, ६५0६0 हेक्टरवर नियोजन करण्यात होते, त्यापैकी केवळ ४0 हजार ५८१ हेक्टरवर पेरणी करण्यात आली आहे. तसेच गव्हाचे २१ हजार ३६0 हेक्टरवर नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ९९९२ हेक्टरवरच पेरणी करण्यात आली.