शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
2
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
3
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
4
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
5
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
6
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
7
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
8
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
9
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
10
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
11
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
12
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
13
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
14
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
15
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर
16
विपिन भाटी खरं बोलतोय? निक्की हत्याकांडात झाला मोठा खुलासा, पोलिसांच्या तपासात नवा ट्विस्ट!
17
Asia Cup : संजूनं भक्कम केली ओपनिंगची दावेदारी! 'खंबीर' खेळीमुळं गंभीरचा प्लॅन फिस्कटणार?
18
रशियाचा पुन्हा एकदा युक्रेनवर मोठा हल्ला; ६२९ मिसाईल आणि ड्रोन डागले, अनेकांचा मृत्यू
19
Amravati: मेहुणाच निघाला अतुल पुरींच्या हत्येचा मास्टरमाईंड; ५ लाखांत दिली खुनाची सुपारी, हत्येसाठी अल्पवयीन मुलांचा वापर
20
समाजसेविका सरिता खानचंदानी यांची सातव्या मजल्यावरून उडी, उपचारादरम्यान मृत्यू; घातपात की आत्महत्या?

‘वार्ड’ पद्धती नगरसेवकांच्या सोयीची

By admin | Updated: December 25, 2014 02:04 IST

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेत बदल : प्रभाग पद्धतीवर शासनाची फुली.

वाशिम : राज्यात सत्तारूढ झालेल्या भारतीय जनता पक्ष व शिवसेना युतीने स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पाय रोवण्याचे प्रयत्न चालविले आहेत. त्याच पृष्ठभूमिवर नगरपालिकांच्या निवडणुकीत सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या प्रभाग पद्धतीवर फुली मारून पुन्हा एकदा वार्ड पद्धत सुरू करण्याची तयारी महायुतीच्या सरकारने चालविली आहे. वार्ड पद्धतीमुळे पालिकांच्या निवडणुकीत होणारा अव्वाच्या सव्वा खर्च थोपविता येणार असून, ही पद्धत राजकारण्यांच्या सोयीची असल्याचा सूर राजकारण्यांमधून निघत आहे. सन २00१ पर्यंत राज्यातील नगरपालिकांच्या निवडणुका वार्ड पद्धतीने घेण्यात येत होत्या; मात्र सन २00१ मध्ये शासनाने प्रभाग पद्धत जन्माला घातली होती. त्यावेळी तीन वार्डांचा मिळून एक प्रभाग निर्माण करण्यात आला होता, त्यामुळे स्वाभाविकच एका प्रभागाचे प्रतिनिधीत्व तीन नगरसेवक करीत होते. राजकारणांमधील स्थित्यंतरातून सन २00६ मध्ये पुन्हा शासनाने प्रभाग पद्धतीला मूठमाती देऊन वार्ड पद्धतीनुसारच पालिकेच्या निवडणुका घेतल्या होत्या; परंतु सन २0११ च्या नगरपालिका निवडणुकीत तत्कालीन कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारने पुन्हा एकदा प्रभाग पद्धत सुरू केली होती. यावेळी एका प्रभागातील मतदारांना चार नगरसेवक निवडण्याचा अधिकार बहाल करण्यात आला होता; मात्र राज्यात नव्यानेच सत्तारूढ झालेल्या भाजप व शिवसेनेच्या महायुती सरकारने पुन्हा एकदा प्रभाग पद्धतीला मूठमाती देऊन वार्ड पद्धत सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. नगरपालिकांच्या आगामी निवडणुका वार्ड पद्धतीनेच होणार असल्याचे जवळपास निश्‍चित मानल्या जात आहे.