शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

८ वी ते १२ वीच्या शाळांसाठी ग्रामपंचायतींच्या प्रस्तावाची प्रतीक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:46 IST

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे ऑफलाईन शिक्षण बंद आहे. आता कोरोना संसर्गावर बऱ्यापेकी नियंत्रण मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील ...

गेल्या दीड वर्षापासून कोरोना संसर्गामुळे ऑफलाईन शिक्षण बंद आहे. आता कोरोना संसर्गावर बऱ्यापेकी नियंत्रण मिळाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्याची तयारी शिक्षण विभागाने केली आहे. यासाठी शासन निर्देशानुसार सरपंचांच्या अध्यक्षतेखालील तलाठी, शाळा समिती अध्यक्ष, केंद्रप्रमुख, वैद्यकीय अधिकारी, मुख्याध्यापक आणि ग्रामसेवकांचा समावेश असलेल्या ग्रामस्तर समितीची स्थापना करण्याचे निर्देशही जि. प. शिक्षण विभागाने दिले आणि शासनाच्या परिपत्रकानुसार १५ जुलैपर्यंत ग्रामपंचायतींनी ग्रामस्तर समितीच्या माध्यमातून पालकांशी चर्चा करून शाळा सुरू करण्याबाबतचा प्रस्ताव पंचायत समिती स्तरावर सादर करण्याच्या सूचना दिल्या; परंतु चार दिवस उलटले असताना जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातून कारखेडा येथील एकाच ग्रामपंचायतीचा प्रस्ताव पंचायत समितीस्तरावर सादर झाला आहे. त्यामुळे कोरोनामुक्त गावातील आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होणार की नाही, अशी शंकाच उपस्थित होत आहे.

--------------

निर्जंतुकीकरणासह लसीकरणाला होणार विलंब

ग्रामीण भागांतील कोरोनामुक्त गावांत शाळा सुरू करण्यासाठी ग्रामस्तर समितीच्या माध्यमातून ग्रामपंचायतीचे प्रस्ताव प्राप्त झाल्यानंतरही संबंधित शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यासह लसीकरण न झालेल्या शिक्षकांचे आरोग्य विभागाच्या सहकार्याने लसीकरण करून घेण्याची प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. शिवाय शाळा सुरू झाल्यानंतरही गाव कोरोनामुक्त ठेवण्यासाठी सातत्याने उपाय योजना कराव्या लागणार आहेत; परंतु ग्रामपंचायतींची प्रस्ताव प्रक्रियाच पूर्ण झाली नसल्याने पुढील प्रक्रियेला विलंब लागणार आहे.

-----------------------

शिक्षकांच्या राहण्याची व्यवस्था कधी करणार

कोरोनामुक्त गावांत पुन्हा कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून या गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यापूर्वी केंद्रप्रमुख, मुख्याध्यापकांना संबंधित शाळेतील शिक्षकांच्या राहण्याची व्यवस्था गावातच करावी लागणार असून, संबंधित शिक्षक सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम ग्रामपंचायतीच्या प्रस्तावाची आवश्यकता आहे; परंतु ही प्रक्रियाच अपूर्ण असल्याने शिक्षकांची गावात राहण्याची व्यवस्था कधी करणार, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

-----------------

कोट : शासनाच्या निर्देशानुसार कोरोनामुक्त गावांत आठवी ते बारावीच्या शाळा सुरू करण्यासाठी सरपंचांच्या अध्यक्षतेखालील ग्रामस्तर समितीचा ठराव आणि ग्रामपंचायतींच्या प्रस्तावाची आवश्यकता आहे. ग्रामपंचायतीअंतर्गत ही प्रक्रिया सुरू असून, पंचायत समितीस्तरावर प्रस्ताव प्राप्त होताच पडताळणी करून शाळा सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

- रमेश तांगडे,

माध्यमिक शिक्षणाधिकारी, वाशिम