शहरं
Join us  
Trending Stories
1
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
2
"लश्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
3
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
4
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
5
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
6
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
7
World Lipstick Day : हे ऐकाच! ओठ एकदम भारी दिसतील पण नंतर वांदे होतील; 'अशी' करा योग्य लिपस्टिकची निवड
8
Surya Grahan 2025: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
9
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग
10
दोन मोर्चांवर वेगळे लढले...! विरूच्या निधनानंतर महिन्याभराने जयनेही प्राण सोडले; गीरचे जंगल आता त्यांच्या मैत्रीच्या गोष्टी सांगणार...
11
Aditya Infotech IPO: इश्यू उघडताच GMP मध्ये तुफान तेजी; गुंतवणुकदारांना मिळू शकतो जबरदस्त नफा
12
महाराष्ट्रासाठी काँग्रेसने रणनीती आखली; रमेश चेन्नीथेला आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर मोठी जबाबदारी
13
"हा माझा नवरा"; इन्स्पेक्टरच्या मृत्यूनंतर हायव्होल्टेज ड्रामा; मृतदेहासाठी २ बायका भिडल्या, अखेर...
14
NSDL IPO: ८०० रुपये प्राईज बँड, १२७ रुपये GMP; LIC नं केली गुंतवणूक, तुमचा विचार काय?
15
सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण
16
रश्मिका मंदानाची कॉपी? छत्रपती संभाजीनगरची लेक, विजय देवरकोंडासोबत करणार रोमान्स
17
'ऑपरेशन महादेव'नंतर आता 'ऑपरेशन शिवशक्ती' सुरू! भारतीय सैन्याने दोन दहशतवाद्यांना घातलं कंठस्नान
18
थंडबस्त्यात गेला अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमा, रेणुका शहाणे म्हणाल्या - "मला धक्काच बसला.."
19
कमाल! स्मार्टफोन App द्वारे आतड्यांतील बॅक्टेरियावर नियंत्रण, आली ओरल कॅप्सूल, कसा होणार फायदा?
20
Kamchatka Earthquake: ५ जुलैचे भविष्य ३० जुलैला खरे होणार? रशियातील भुकंपाच्या उंच लाटा जपानच्या किनाऱ्यावर धडकू लागल्या...

शेतकर्‍यांना कृषीपंपाच्या वीजजोडणीची प्रतीक्षाच

By admin | Updated: July 13, 2014 22:41 IST

दीर्घ प्रतीक्षेनंतरही वीजजोडणी नाही : आणखी किती महिने वाट बघावी?

मालेगाव : शेतकर्‍यांचे हिरवे स्वप्न साकारण्याकरिता मोफत वीजजोडणी देण्यासाठी निघालेल्या तालुका कृषी विभागाला वीज वितरण कंपनीकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची बाब समोर येत आहे. १२५ कृषीपंपाच्या वीजजोडणीच्या शुल्कापोटी दीड वर्षांंपूर्वी आठ लाख ३१ हजार २५0 रुपये वीज वितरण कंपनीच्या खात्यात कृषी विभागाने जमा केल्यानंतरही ३0 टक्के शेतकर्‍यांच्या विहिरीजवळ अद्यापही विद्युत मीटर बसू शकले नाही. दारिद्रय़रेषेखाली जीवन जगणार्‍या अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकर्‍यांचे जीवनमान उंचाविण्याच्या दृष्टिकोनातून १९८२ पासून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये विशेष घटक योजना राबविली जात आहे. या योजनेंतर्गत नवीन विहिरीसह विविध प्रकारच्या १४ ते १६ बाबींवर अनुदान दिले जाते. २0११-१२ मध्ये विविध योजनेंतर्गत घेतलेल्या विहिरींवर वीजपंप बसविणे आणि वीजजोडणी देण्याच्या उपक्रमाचा यामध्ये समावेश करण्यात आला. त्यानुसार वाशिम जिल्ह्यात सुरूवातीला २६५ लाभार्थींंचे उद्दिष्ट मिळाले होते. लाभार्थींंची संख्या लक्षात घेता सदर उद्दिष्ट तोकडे असल्याने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने कृषी विभागाकडे पाठपुरावा करून १३२५ कृषीपंप व वीजजोडणी खेचून आणली. यामध्ये मालेगाव तालुक्यातील १२५ लाभार्थींंचा समावेश आहे. वीज जोडणीसाठी प्रत्येक लाभार्थी ६६५0 रुपये शुल्क आहे. १२५ लाभार्थींंचे एकूण आठ लाख ३१ हजार २५0 रुपये शुल्क कृषी आयुक्तालयाचे विस्तार व प्रशिक्षण संचालकांनी २0१२ च्या मे महिन्यातच महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या खात्यात जमा केले आहे. त्यामुळे वीजजोडणी मिळण्यातील प्रमुख अडथळा दूर झाला आहे. जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने २0१२ च्या मे महिन्यात चार तालुक्यातील पात्र लाभार्थींंची यादी वीज वितरण कंपनीकडे पाठविली आहे. त्यानंतर उर्वरीत दोन तालुक्यातील लाभार्थींंची यादी पाठविली. पात्र लाभार्थींंची यादी आणि शुल्काचा भरणा या दोन्ही बाबींची पुर्तता झालेली असल्याने वीजजोडणी मिळणे अपेक्षीत होते. मात्र, अजूनही जवळपास ३0 टक्के लाभार्थी शेतकर्‍यांना वीजजोडणी मिळाली नाही, ही दुर्दैवाची बाब आहे. थकित बिलापोटी कृषी पंपाच्या वीजजोडण्या कापण्याचा धडक कार्यक्रम राबविणार्‍या वीज वितरण कंपनीने शुल्क भरल्यानंतर दीड वर्षातही वीजजोडणी न देता आपला शेतकरी विरोधी बाणा सोडला नसल्याची जाणीव करून दिली आहे. याकडे वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठांनी लक्ष देणे आवश्यक आहे. शेतकर्‍यांच्या किरकोळ प्रश्नावरून रान उठविणारी मंडळीदेखील कृषीपंप जोडणीबाबत चुप्पी साधून असल्याने साशंकता व्यक्त केली जात आहे.