शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

पावसाचा खंड; शेतकऱ्यांकडून सिंचनाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST

वाशिम जिल्ह्यात जुन ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९.०० मिमी पाऊस अपेक्षित असताना १ जुन ते १४ ऑगस्टच्या कालावधीत ५७२.५ मिमी ...

वाशिम जिल्ह्यात जुन ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९.०० मिमी पाऊस अपेक्षित असताना १ जुन ते १४ ऑगस्टच्या कालावधीत ५७२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ७२.६ टक्के आहे. अर्थात, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३४ लघू मिळून १३७ प्रकल्पांत सरासरी ६३.०८ टक्के जलसाठा आहे. अर्थात, प्रकल्पांची पातळीही समाधानकारक असून, पिकांची स्थिती समाधानकारक आहे. तथापि, काही भागांत १० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी सिंचनाचा आधार घेत आहेत, तर काही शेतकऱ्यांना मात्र पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

----------------------

१) आतापर्यंत अपेक्षित पाऊस - ५०२.४ मिमी

प्रत्यक्ष झालेला पाऊस - ५७२.५ मिमी

-----------------------

२) पिकांना सिंचनाचा आधार

सोयाबीन- ३,०२६९२.४४

तूर - ६००५४.०३

कपाशी - २१३६७.१२

उडीद - ६९९४.४७

-----------------------

३) पाणीसाठा ६३ टक्क्यांवर

लघू - ६०.०५

मध्यम - ७४.४९

मोठे - ००

-----------------------

४) उसनवारी कशी फेडणार?

१) कोट: कारंजा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यात पावसाने १० दिवसांपासून खंड दिल्याने पिके संकटात सापडली आहेत. येत्या तीन-चार दिवसांत दमदार पाऊस न पडल्यास पिके सुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिके हातची गेल्यास उसनवार कशी फेडायची, ही चिंता सतावत आहे.

- नितीन भिंगारे, शेतकरी जानोरी.

--------

२) कोट: दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यात उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे पिके सुकत आहेत. काही शेतकरी नाईलाजास्तव सिंचनाचा आधार घेत आहेत, परंतु पावसाच्या भरवशावरच असलेल्या शेती पिकांची स्थिती वाईट असून, पिके संकटात असल्याने कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- डिगांबर पाटील उपाध्ये, शेतकरी

५) कृषी अधिकाऱ्याचा कोट

१) कोट: जिल्ह्यात पावसाची सरासरी चांगली आहे. बहुतांश भागांत पिकांची स्थिती चांगली असून, पाच-सहा दिवस पिके तग धरण्यासारखीच आहेत. ज्या भागांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्या भागांत शेतकऱ्यांनी पिकांत डवरणीचे फेर द्यावे. पिकांत डवरणी केल्यास पिकांना आधार मिळून स्थिती सुधारेल.

- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी