शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

पावसाचा खंड; शेतकऱ्यांकडून सिंचनाचा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:41 IST

वाशिम जिल्ह्यात जुन ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९.०० मिमी पाऊस अपेक्षित असताना १ जुन ते १४ ऑगस्टच्या कालावधीत ५७२.५ मिमी ...

वाशिम जिल्ह्यात जुन ते सप्टेंबरदरम्यान सरासरी ७८९.०० मिमी पाऊस अपेक्षित असताना १ जुन ते १४ ऑगस्टच्या कालावधीत ५७२.५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. हे प्रमाण वार्षिक सरासरीच्या ७२.६ टक्के आहे. अर्थात, जिल्ह्यात पावसाचे प्रमाण समाधानकारक आहे. जिल्ह्यातील ३ मध्यम आणि १३४ लघू मिळून १३७ प्रकल्पांत सरासरी ६३.०८ टक्के जलसाठा आहे. अर्थात, प्रकल्पांची पातळीही समाधानकारक असून, पिकांची स्थिती समाधानकारक आहे. तथापि, काही भागांत १० दिवसांपासून पावसाचा खंड पडल्याने शेतकरी सिंचनाचा आधार घेत आहेत, तर काही शेतकऱ्यांना मात्र पावसाची प्रतीक्षा लागली आहे.

----------------------

१) आतापर्यंत अपेक्षित पाऊस - ५०२.४ मिमी

प्रत्यक्ष झालेला पाऊस - ५७२.५ मिमी

-----------------------

२) पिकांना सिंचनाचा आधार

सोयाबीन- ३,०२६९२.४४

तूर - ६००५४.०३

कपाशी - २१३६७.१२

उडीद - ६९९४.४७

-----------------------

३) पाणीसाठा ६३ टक्क्यांवर

लघू - ६०.०५

मध्यम - ७४.४९

मोठे - ००

-----------------------

४) उसनवारी कशी फेडणार?

१) कोट: कारंजा तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. त्यात पावसाने १० दिवसांपासून खंड दिल्याने पिके संकटात सापडली आहेत. येत्या तीन-चार दिवसांत दमदार पाऊस न पडल्यास पिके सुकण्याची शक्यता नाकारता येत नाही. पिके हातची गेल्यास उसनवार कशी फेडायची, ही चिंता सतावत आहे.

- नितीन भिंगारे, शेतकरी जानोरी.

--------

२) कोट: दहा दिवसांपासून पावसाने दडी मारली. त्यात उन्हाचा पारा वाढत असल्यामुळे पिके सुकत आहेत. काही शेतकरी नाईलाजास्तव सिंचनाचा आधार घेत आहेत, परंतु पावसाच्या भरवशावरच असलेल्या शेती पिकांची स्थिती वाईट असून, पिके संकटात असल्याने कर्ज फेडायचे कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- डिगांबर पाटील उपाध्ये, शेतकरी

५) कृषी अधिकाऱ्याचा कोट

१) कोट: जिल्ह्यात पावसाची सरासरी चांगली आहे. बहुतांश भागांत पिकांची स्थिती चांगली असून, पाच-सहा दिवस पिके तग धरण्यासारखीच आहेत. ज्या भागांत पावसाचे प्रमाण कमी आहे. त्या भागांत शेतकऱ्यांनी पिकांत डवरणीचे फेर द्यावे. पिकांत डवरणी केल्यास पिकांना आधार मिळून स्थिती सुधारेल.

- शंकर तोटावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी