शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
2
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
3
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
4
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
5
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
6
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
7
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
8
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
9
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
10
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
11
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
12
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
13
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
14
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?
15
मुख्य आरोपीचा 'खास' दोस्त अटकेत; दिल्ली स्फोटप्रकरणात वैद्यकीय क्षेत्रातील सहावी व्यक्ती ताब्यात!
16
एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांच्या तब्येतीची चौकशी केली; भावाला फोन करून प्रकृतीची विचारपूस
17
'सरकारने निर्दोषांना शिक्षा करू नये; पण...', दिल्ली बॉम्बस्फोटांवर अबू आझमींचे मोठे विधान
18
"पाकिस्तान युद्ध स्थितीत..." इस्लामाबादमध्ये आत्मघाती हल्ला, संरक्षण मंत्री संतापले, टार्गेटवर कोण? 
19
Suraj Tiwari : ट्रेन अपघातात एक हात आणि दोन्ही पाय गमावले; पण मानली नाही हार, जिद्दीने झाला अधिकारी
20
बापरे! १ कोटींची लॉटरी लागली, पण विजेता काही केल्या समोर येईना; कंपनीला सुचली 'अशी' आयडिया

नेट कनेक्टिव्हिटी, वीजपुरवठ्याने ग्रामस्थ त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 06:10 IST

किन्हीराजा या ११ हजार लोकसंख्येच्या गावात नामांकित कंपनीची मोबाइल सेवा (रेन्ज) ही मिळत नसल्याने जनतेचा एकमेकांची संपर्क तुटला आहे. ...

किन्हीराजा या ११ हजार लोकसंख्येच्या गावात नामांकित कंपनीची मोबाइल सेवा (रेन्ज) ही मिळत नसल्याने जनतेचा एकमेकांची संपर्क तुटला आहे. तसेच विविध कामांसाठी नेट कनेक्टिव्हिटीमुळे मिळत नसल्याने कामे खाेळंबली आहेत. किन्हीराजा हे जिल्हा परिषदेच्या सर्कलचे गाव असून, गावात नामांकित दोन मोठ्या कंपनीचे कार्ड येथील मोबाइल ग्राहक वापरतात. दोन्ही मोबाइल कार्डला गत १५ दिवसांपासून कनेक्टिव्हिटीच मिळत नाही, त्यामुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. ऐन ग्रामपंचायत निवडणुकीच्या धामधुमीत मोबाइल सेवा ही विस्कळीत राहत असल्याने उमेदवार व कार्यकर्ते बेचैन दिसून येत आहेत. तसेच एखादी अप्रिय घटना घडल्यास संपर्क कसा करावा? हा प्रश्न उपस्थित होत आहे. गावातील वीजपुरवठा हा भारनियमनाच्या नावावर दररोज दुपारी २ वाजेपर्यंत बंद राहत असतो त्यामुळे सदर मोबाइल कंपनीकडून टाॅवरच्या देखभाल दुरुस्तीसाठी डिझेल मिळत नसल्याने हा प्रश्न उपस्थित होत असल्याचे बाेलले जात आहे.

ग्रामपंचायत निवडणुकीच्या आनुषंगाने चांगलेच वातावरण तापत असताना निवडणुकीत उभे असलेले उमेदवार कार्यकर्त्यांशी संपर्क साधताना अनेक अडचणींना सामाेरे जावे लागत आहे. तरी माेबाइल कंपनीने याकडे लक्ष देऊन माेबाइल सेवा सुरळीत करण्याची मागणी तसेच वारंवार खंडित हाेत असलेला वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी किन्हीराजावासीयांतून केली जात आहे. या मागणीची त्वरित दखल न घेतल्यास ग्रामस्थ आंदाेलन करतील, असा इशारा सुद्धा ग्रामस्थांनी दिला आहे.