शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

निकालाच्या सूत्राने उडविली बारावीच्या विद्यार्थ्यांची झोप; दहावी-अकरावीच्या गुणांनी वाढविली चिंता !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:29 IST

वाशिम : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे गुणदान हे दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे ...

वाशिम : राज्य शिक्षण मंडळाकडून घेतल्या जाणाऱ्या बारावी परीक्षेचे गुणदान हे दहावी, अकरावी आणि बारावीच्या अंतर्गत परीक्षा, प्रॅक्टिकलच्या आधारे केले जाणार आहे. दहावी, अकरावीतील गुणांनी विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे.

कोरोनामुळे पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मूल्यमापनानुसार गुणदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या ३६३ शाळा आहेत. बारावी निकालाचा तिढा सोडविताना, राज्य शिक्षण मंडळाने मूल्यमापनासाठी ३०:३०:४० चे सूत्र जाहीर केले आहे. यामध्ये दहावी व अकरावीतील गुणही विचारात घेतले जाणार असल्याने विद्यार्थ्यांची चिंता वाढत आहे. अकरावीला ‘रेस्ट इअर’ समजणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीच्या निकालात फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

०००००००००००००००

विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर फोकस ठेवावा !

कोट बॉक्स

बारावीनंतरच्या जेईई, नीट किंवा इतर परीक्षांवर विद्यार्थ्यांच्या विविध शाखेतील प्रवेश अवलंबून राहणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुढील परीक्षांवर लक्ष केंद्रित करावे.

्र_- प्रा. विजय पोफळे

.......

अंतर्गत मुूल्यमापनाच्या आधारे बारावीचा निकाल लागणार आहे. पुढील प्रवेश हे प्रवेश परीक्षेवर अवलंबून असल्याने विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.

- प्रा. आशीष सोळंके

०००००००००००००

३० टक्के सूत्र गणित बिघडविणार !

बारावीच्या निकालात दहावीचे ३० टक्के आणि अकरावीचे ३० टक्के गुण ग्राह्य धरले जाणार आहेत. यामुळे बारावीच्या निकालाची धाकधूक आहे.

- समाधान देशमुख

....

दहावी आणि अकरावीतील गुण विचारात घेतले जाणार असल्याने याचा फटका विद्यार्थ्यांना बसणार आहे. अकरावीची परीक्षाच झाली नसल्याने गुणदान कसे होणार, हा प्रश्न आहे. या सर्व प्रक्रियेमुळे बारावीत गुण कमी मिळण्याची भीती आहे.

- निकिता मानोरकर, विद्यार्थिनी

००००००००००

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी सीबीएसई

मुले ७२

मुली ५८

....

जिल्ह्यातील बारावीचे विद्यार्थी स्टेट बोर्ड

बारावीतील विद्यार्थी १८,१७५

मुले ९,८१४

मुली ८,३६१