शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

मतदानाच्या टक्केवारीची आकडेमोड; निकालाकडे लक्ष !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2021 04:35 IST

एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरुळपीर २५, कारंजा २८ ...

एप्रिल ते डिसेंबर २०२० या कालावधीत मुदत संपलेल्या वाशिम तालुक्यातील २४, रिसोड ३४, मालेगाव ३०, मंगरुळपीर २५, कारंजा २८ आणि मानोरा तालुक्यातील २२ अशा जिल्ह्यातील एकूण १६३ ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीचा कार्यक्रम घोषित केला होता. दरम्यान, १६३ पैकी ११ ग्रामपंचायती अविरोध झाल्याने १५ जानेवारी रोजी १५२ ग्रामपंचायतींच्या १२३३ जागांसाठी मतदान झाले. सरासरी ७५.८६ टक्के मतदान झाले असून, सर्वाधिक मतदान मालेगाव तालुक्यात ७८.०५ तर सर्वात कमी मतदान मानोरा तालुक्यात ७१.२० टक्के झाले. १८ जानेवारी रोजी निकाल असून, मतदानानंतर टक्केवारीची आकडेमोड करीत विजयाचे गणित जुळविण्यात पॅनल प्रमुख, उमेदवार व्यस्त असल्याचे दिसून येते. ग्रामीण भागातील चावडी आणि पारावर सुद्धा आपल्या वॉर्डातून कोण निवडून येणार याची चर्चा रंगत असल्याचे दिसून येते. कुठे परिवर्तनाच्या तर कुठे विकासाच्या नावाने गप्पा रंगत आहे. काही वाॅर्डात नात्यागोत्यातील मतदानाच्या समीकरणांची आकडेमोड केली जात आहे. सर्वच उमेदवारांच्या कार्यकर्त्यांना आपलाच विजय होईल अशी खात्री वाटत असली तरी क्रॉस व्होटिंगमुळे पराभवाची धाकधूकही कायम आहे. निवडणुकीचा अंतिम निकाल लागेपर्यंत कार्यकर्त्यांमधील दावे-प्रतिदावे सुरूच राहणार असून, १८ जानेवारीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

००००००००००

मतदानाची अंतिम टक्केवारी

तालुकाटक्केवारी

वाशिम ७७.५६

रिसोड ७६.६२

मालेगाव ७८.०५

मं.पीर ७४.९०

कारंजा ७४.७२

मानोरा ७१.२०