शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

११ हजार शेतक-यांच्या कर्जाचे रूपांतरण

By admin | Updated: September 2, 2015 02:23 IST

वाशिम जिल्ह्यात आतापर्यंंत ३२ कोटी रुपयांच्या कर्जाचे रुपांतरण; पहिल्या वर्षाचे संपूर्ण व्याज माफ होणार.

वाशिम : राज्यसहकारी बँकेसह, नाबार्ड आणि राज्य शासनाने ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात निधी उपल्बध करून दिल्यानंतर अकोला-वाशिम जिल्हा सहकारी बँकेने शेतकर्यांच्या कर्ज रुपांतरणास प्रारंभ केला असून, ऑगस्ट अखेर वाशिम जिल्ह्यातील ११ हजार १३४ शेतकर्‍यांना ३२ कोटी ११ लाख रुपयाच्या कर्जाचे रुपांतरण करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या गत वर्षीच्या कर्जाचे रुपांतरण करण्याचे निर्देश राज्यशासनाने दिले होते. त्यानुषंगाने वाशिम जिल्ह्यातील २0 हजार २३८ शेतकर्‍यांचे १0९ कोटी ५६ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज रुपांतरीत करावे लागणार होते. त्यानुषंगाने अकोला-वाशिम जिल्हा सहकारी बँकेने दहा ऑगस्टपासून वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या गतवर्षीच्या पीककर्जाचे रुपांतरण सुरू केले आहे. दरम्यान ऑगस्ट अखेर गत वर्षीचे आणि २0१३-१४ या वर्षाचे फेररुपांतरण मिळून आतापर्यंंत १९ टक्के कर्जाचे रुपांतरण केले आहे. कर्जाचे रुपांतरण करणार्‍या शेतकर्‍यांचे पहिल्या वर्षाचे संपूर्ण व्याज माफ होणार आहे. गतवर्षीची अवर्षण स्थिती पाहता कमी आलेली आणेवारी आणि फेब्रुवारी मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे रब्बीच्या शेतकर्‍यांचे झाले होते. त्यानुषंगाने आपदग्रस्त शेतकर्‍यांना मदत व सवलत देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार २0१४-१५ या वर्षामधील पीककर्जाचे व्याजासह पुढील पाच वर्षासाठी रुपांतरण करण्याचे निर्देश खरीप हंगामाच्या प्रारंभीच देण्यात आले होते. सहकारी व व्यापारी बँकांनी कर्जाचे रुपांतरण केले होते; मात्र वाशिम जिल्ह्यातील बँक कर्जाचे रुपांतरण करीत नसल्याची शेतकर्‍यांची ओरड होती. त्यावर राज्यशासनाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेऊन हमी दिल्याने पीकर्जाच्या रुपांतरणास प्रारंभ झाला होता. त्याचा आतापर्यंंत नऊ हजार ४७६ शेतकर्‍यांना लाभ झाला असून, त्यांच्या २७ कोटी २९ लाख रुपयांच्या कर्जाचे रुपांतरण करण्यात आले आहे. प्रारंभी यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा सहकारी बँकांना उपलब्ध झालेला नव्हता. त्यामुळे या बँकांकडून कर्जाचे रुपांतरण करण्यात विलंब होत होता. प्रकरणी ७ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळून पीककर्जाच्या रुपांतरणाचा प्रश्न निकाली निघाला असला तरी ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. दुसरीकडे पीककर्जाच्या तुलनेत रुपांतरीत कर्जाचा दर अधिक असल्याने या कर्जावरील पुढील पाच वर्षाच्या कर्जावरील सहा टक्के प्रमाणे होणारे व्याज शेतकर्‍यांच्यावतीने शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे.