शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
4
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
5
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
6
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
7
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
8
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
9
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
10
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
11
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
12
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
13
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
14
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
15
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
16
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
17
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
18
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
19
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
20
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
Daily Top 2Weekly Top 5

११ हजार शेतक-यांच्या कर्जाचे रूपांतरण

By admin | Updated: September 2, 2015 02:23 IST

वाशिम जिल्ह्यात आतापर्यंंत ३२ कोटी रुपयांच्या कर्जाचे रुपांतरण; पहिल्या वर्षाचे संपूर्ण व्याज माफ होणार.

वाशिम : राज्यसहकारी बँकेसह, नाबार्ड आणि राज्य शासनाने ऑगस्टच्या दुसर्‍या आठवड्यात निधी उपल्बध करून दिल्यानंतर अकोला-वाशिम जिल्हा सहकारी बँकेने शेतकर्यांच्या कर्ज रुपांतरणास प्रारंभ केला असून, ऑगस्ट अखेर वाशिम जिल्ह्यातील ११ हजार १३४ शेतकर्‍यांना ३२ कोटी ११ लाख रुपयाच्या कर्जाचे रुपांतरण करण्यात आले आहे. शेतकर्‍यांच्या गत वर्षीच्या कर्जाचे रुपांतरण करण्याचे निर्देश राज्यशासनाने दिले होते. त्यानुषंगाने वाशिम जिल्ह्यातील २0 हजार २३८ शेतकर्‍यांचे १0९ कोटी ५६ लाख २५ हजार रुपयांचे कर्ज रुपांतरीत करावे लागणार होते. त्यानुषंगाने अकोला-वाशिम जिल्हा सहकारी बँकेने दहा ऑगस्टपासून वाशिम जिल्ह्यातील शेतकर्‍यांच्या गतवर्षीच्या पीककर्जाचे रुपांतरण सुरू केले आहे. दरम्यान ऑगस्ट अखेर गत वर्षीचे आणि २0१३-१४ या वर्षाचे फेररुपांतरण मिळून आतापर्यंंत १९ टक्के कर्जाचे रुपांतरण केले आहे. कर्जाचे रुपांतरण करणार्‍या शेतकर्‍यांचे पहिल्या वर्षाचे संपूर्ण व्याज माफ होणार आहे. गतवर्षीची अवर्षण स्थिती पाहता कमी आलेली आणेवारी आणि फेब्रुवारी मार्च महिन्यातील अवकाळी पावसामुळे रब्बीच्या शेतकर्‍यांचे झाले होते. त्यानुषंगाने आपदग्रस्त शेतकर्‍यांना मदत व सवलत देण्याचा निर्णय झाला होता. त्यानुसार २0१४-१५ या वर्षामधील पीककर्जाचे व्याजासह पुढील पाच वर्षासाठी रुपांतरण करण्याचे निर्देश खरीप हंगामाच्या प्रारंभीच देण्यात आले होते. सहकारी व व्यापारी बँकांनी कर्जाचे रुपांतरण केले होते; मात्र वाशिम जिल्ह्यातील बँक कर्जाचे रुपांतरण करीत नसल्याची शेतकर्‍यांची ओरड होती. त्यावर राज्यशासनाने ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात निर्णय घेऊन हमी दिल्याने पीकर्जाच्या रुपांतरणास प्रारंभ झाला होता. त्याचा आतापर्यंंत नऊ हजार ४७६ शेतकर्‍यांना लाभ झाला असून, त्यांच्या २७ कोटी २९ लाख रुपयांच्या कर्जाचे रुपांतरण करण्यात आले आहे. प्रारंभी यासाठी आवश्यक असलेला निधी जिल्हा सहकारी बँकांना उपलब्ध झालेला नव्हता. त्यामुळे या बँकांकडून कर्जाचे रुपांतरण करण्यात विलंब होत होता. प्रकरणी ७ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयामुळे शेतकर्‍यांना दिलासा मिळून पीककर्जाच्या रुपांतरणाचा प्रश्न निकाली निघाला असला तरी ही प्रक्रिया संथ गतीने सुरू आहे. दुसरीकडे पीककर्जाच्या तुलनेत रुपांतरीत कर्जाचा दर अधिक असल्याने या कर्जावरील पुढील पाच वर्षाच्या कर्जावरील सहा टक्के प्रमाणे होणारे व्याज शेतकर्‍यांच्यावतीने शासनामार्फत अदा करण्यात येणार आहे.