शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
3
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
5
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
6
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
7
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
8
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
9
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
10
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
11
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
12
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
13
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
14
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
15
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
16
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
17
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
18
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
19
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
20
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
Daily Top 2Weekly Top 5

जलस्रोत शोधण्यात जातोय वेळ; जलजीवन मिशनचा बसेना मेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:45 IST

वाशिम : जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक कुटुंबास नळजोडणी दिली जाणार ...

वाशिम : जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या माध्यमातून गावागावात पाणीपुरवठा योजना कार्यान्वित केली जाणार आहे. याअंतर्गत प्रत्येक कुटुंबास नळजोडणी दिली जाणार असून, त्यासाठी पुरेसे पाणी उपलब्ध असलेले बळकट स्रोत शोधले जात आहेत. मात्र पावसाचा अडथळा आणि इतर तांत्रिक अडचणींमुळे या प्रक्रियेतच अधिक वेळ जात असून, कामे प्रलंबित राहत आहेत.

ग्रामीण भागातील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध व स्वच्छ पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी जलजीवन मिशनच्या माध्यमातून पूर्ण करावी, असे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. त्यानुषंगाने ही कामे पूर्ण करण्यासाठी तांत्रिक व प्रशासकीय मान्यता मिळवून घ्यावी. पंचायत समितीनिहाय कामांचा वेळोवेळी आढावा संबंधित गटविकास अधिकाऱ्यांनी घ्यावा. डिसेंबर २०२१ अखेर बहुतांश योजनांची कामे पूर्ण होतील, या दृष्टीने नियोजन करावे. जिल्ह्याचा समावेश आकांक्षित जिल्ह्यांच्या यादीत असल्याने ग्रामीण भागातील शाळा व अंगणवाड्यांना शुद्ध, स्वच्छ पाणी उपलब्ध करून द्यावे. जलजीवन मिशनअंतर्गत ‘रेट्रो फिटिंग’ची कामे वेळेत पूर्ण करावीत, अशा सूचना जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. यांनी संबंधित यंत्रणेला दिल्या आहेत.

प्रत्यक्षात मात्र जलजीवन मिशनअंतर्गत केली जाणारी कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून, बळकट जलस्रोत शोधण्याच्या प्रक्रियेतच प्रशासकीय कर्मचाऱ्यांचा अधिक वेळ खर्च होत आहे. याशिवाय गेल्या काही दिवसांपासून जिल्हाभरात पावसाने थैमान घातल्याने कामे प्रलंबित राहत असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

...............

जिल्ह्यात २१४ गाव कृती आराखडे

जलजीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात २१४ गाव कृती आराखडे तयार करण्यात आले आहेत. चालूवर्षी प्राप्त ५ कोटींच्या निधीतून प्रगतिपथावरील २३ योजनांवर २ कोटी १५ लाख रुपये खर्च करण्यात आले. २८५ गावांमध्ये रेट्रो फिटिंगच्या माध्यमातून नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट बाळगण्यात आले आहे; मात्र या कामांची गती अत्यंत संथ असल्याने कामे पूर्ण कधी होतील, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.