शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
चीन-पाकिस्तानसोबतच्या 'तिकडी'ला बांगलादेशचा नकार! युनूस सरकारची भारताला मोठी ऑफर
3
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
4
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
5
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
6
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
7
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
8
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
9
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
12
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
13
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
14
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
15
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
16
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
17
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
18
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
19
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
20
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत

हिवाळ्यातच तलावांनी गाठला तळ!

By admin | Updated: December 5, 2015 09:09 IST

रिसोड तालुक्यात सरासरी १५ टक्के जलसाठा.

रिसोड (जि. वाशिम): यावर्षीच्या अल्प पावसाने प्रकल्पांतील जलसाठय़ांची स्थिती भयावह केली. तालुक्यातील तलावांनी हिवाळ्यातच तळ गाठला असून, सरासरी १५.२९ टक्के जलसाठा शिल्लक आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे गेल्या काही वर्षात अल्प पाऊस पडत आहे. परिणामी हिवाळ्यातच नदी-नाल्यांसह पाण्याचे बहुतांश जलाशये कोरडेठण्ण पडत आहेत. जलपातळी खालावत असल्याने आणि जलाशयांमध्ये अ त्यल्प जलसाठा असल्याने रिसोड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आतापासूनच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. रिसोड तालुक्यात नेतंसा, बोरखेडी, कोयाळी, धोडप, गणेशपूर, गौंढाळा, जवळा, करडा, मांडवा, मोरगव्हाण, पाचंबा, वाघी, हराळ व कोयाळी असे एकूण १४ सिंचन प्रकल्प आहेत. या प्रकल्पांत सद्यस्थितीत सरासरी १५.२९ टक्के जलसाठा आहे. नेतंसा २१.५१, बोरखेडी १५.९५, कोयाळी ७.३२, धोडप ८.४८, गणेशपुर ५३.२५, गौंढाळा ५.३७, जवळा ३३.९४, करडा १३.१३, मांडवा ३0.६६, मोरगव्हाण १२.७२, पाचंबा १३.४ आणि वाघी ८.४६ असा प्रकल्पातील जलसाठा आहे, तर हराळ व कोयाळी या प्रकल्पात शून्य जलसाठा आहे. पाणीपुरवठा योजना थकीत वीजबिलापोटी बंद पडल्या आहेत. ग्रामस्थांना पाणीटंचाईशी सामना करण्याची वेळ आली आहे.