शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

सामाजिक समतेसाठी एकजुटीने प्रयत्न करण्याची गरज

By admin | Updated: April 15, 2015 01:10 IST

सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपीय कार्यक्रमात जिल्हाधिकारी कुलकर्णी यांचे प्रतिपादन.

वाशिम : सामाजिक समतेसाठी समाजातील प्रत्येक घटकाची प्रगती होणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रत्येकाने आपली वैयक्तिक प्रगती साधताना इतरांनाही बरोबर घेऊन जाण्याची व एकजुटीने प्रयत्न करण्याची मानसिकता ठेवणे आवश्यक आहे, असे मत जिल्हाधिकारी रामचंद्र कुलकर्णी यांनी व्यक्त केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि सहायक संचालक कार्यालय, समाज कल्याण, वाशिम यांच्या विद्यमाने आयोजित भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहाच्या समारोपप्रसंगी यावेळी डॉ. रवी जाधव, साहित्यिक प्रा. धोंडुजा इंगोले, समाजभूषण पुरस्कार विजेते शिवमंगल राऊत, धेंडुळे, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार विजेते चंद्रकांत पवूळकर, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त एम. जी. वाठ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी ए. एम. यावलीकर आदी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. जिल्हाधिकारी कुलकर्णी पुढे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध थोर महापुरुषांनी समाजाच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण विचारांची मांडणी केली आहे. त्यांचे हे विचार आत्मसात करण्यासाठी प्रत्येकाने उत्साह दाखवला पाहिजे. या महापुरुषांनी लोकांच्या मनात सामाजिक जाणीव जागृत करण्याचे काम केले आहे. या सामाजिक जाणिवांचा वटवृक्ष व्हावा, यासाठी प्रत्येकाने प्रयत्न केले पाहिजेत, असेही जिल्हाधिकारी कुलकर्णी यांनी यावेळी सांगितले.