शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

वाशिमकरांनो आरोग्य सांभाळा, ६ वर्षांनंतर जुलैने वाढविला ‘ताप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:27 IST

वाशिम : शहरात तब्बल ६ वर्षांनंतर जुलै महिन्यात तापमानात वाढ झाली आहे. शहरवासीयांना गेल्या १० दिवसांपासून उकाड्याला सामोरे जावे ...

वाशिम : शहरात तब्बल ६ वर्षांनंतर जुलै महिन्यात तापमानात वाढ झाली आहे. शहरवासीयांना गेल्या १० दिवसांपासून उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. अशा तापदायक वातावरणामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य जपण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. जुलै महिन्यात पावसाळी वातावरण असल्याने शक्यतोवर नागरिकांना घामाघूम होण्याची वेळ येत नसते. यंदा पावसाने दडी मारल्याने वातावरणात गारवा नाही. उन्हाळ्यासारखे तापमान आहे. जिल्ह्यात १ जुलै २०१४ मध्ये ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात ३३ ते ३५ अंशांदरम्यान तापमान राहिले; परंतु तब्बल ६ वर्षांनंतर यंदा जुलै महिन्यात पुन्हा एकदा कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांवर गेला. शहरात १० जुलै रोजी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाअभावी तापमानवाढीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. ढगाळ वातावरणात उकाड्यामुळे घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर ओढावत आहे.

------

असा मोडला ‘जुलै’चा रेकॉर्ड

वर्ष ----कमाल तापमान

२००१ - ३२.०

२००५ - ३४.६

२०१० - ३५.२

२०११ - ३४.५

२०१८ - ३५.४

२०२०-३३.६

२०२१-३७.२

----

सरासरी तापमानात तीन अंशांची वाढ

जुलै महिन्यात यंदा सरासरी तापमानात तीन अंशांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. एप्रिल महिन्याप्रमाणे जुलैमध्ये तापमानाची नोंद होत आहे.

------

आगामी आठवडाभर पावसाचा अंदाज

मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वातावरणात वाढलेला उकाडा कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

------

आरोग्य सांभाळा

गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे. तापमानात वाढ होत असल्याने याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. अशा परिस्थितीत डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे, सकस आहार घ्यावा.

- डॉ. सचिन पवार

------

मान्सून पुन्हा सक्रिय

जुलै महिन्यात शक्यतोवर वातावरणात गारवा असतो. यंदा जुलै महिन्यातही उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे. पुढचे १२ दिवस पावसाचे आहेत. त्यामुळे सध्या होणारी लाहीलाही शांत होईल.

- डॉ. नीलेश हेडा, पर्यावरण तज्ज्ञ