शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

वाशिमकरांनो आरोग्य सांभाळा, ६ वर्षांनंतर जुलैने वाढविला ‘ताप’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:27 IST

वाशिम : शहरात तब्बल ६ वर्षांनंतर जुलै महिन्यात तापमानात वाढ झाली आहे. शहरवासीयांना गेल्या १० दिवसांपासून उकाड्याला सामोरे जावे ...

वाशिम : शहरात तब्बल ६ वर्षांनंतर जुलै महिन्यात तापमानात वाढ झाली आहे. शहरवासीयांना गेल्या १० दिवसांपासून उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. अशा तापदायक वातावरणामुळे आरोग्य बिघडण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आरोग्य जपण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे.

वातावरणातील बदलाचा परिणाम मानवी आरोग्यावर होत आहे. जुलै महिन्यात पावसाळी वातावरण असल्याने शक्यतोवर नागरिकांना घामाघूम होण्याची वेळ येत नसते. यंदा पावसाने दडी मारल्याने वातावरणात गारवा नाही. उन्हाळ्यासारखे तापमान आहे. जिल्ह्यात १ जुलै २०१४ मध्ये ३५.२ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली होती. त्यानंतर पुढील प्रत्येक वर्षी जुलै महिन्यात ३३ ते ३५ अंशांदरम्यान तापमान राहिले; परंतु तब्बल ६ वर्षांनंतर यंदा जुलै महिन्यात पुन्हा एकदा कमाल तापमानाचा पारा ३६ अंशांवर गेला. शहरात १० जुलै रोजी ३७.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. जुलै महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाअभावी तापमानवाढीला नागरिकांना सामोरे जावे लागत आहे. ढगाळ वातावरणात उकाड्यामुळे घामाघूम होण्याची वेळ नागरिकांवर ओढावत आहे.

------

असा मोडला ‘जुलै’चा रेकॉर्ड

वर्ष ----कमाल तापमान

२००१ - ३२.०

२००५ - ३४.६

२०१० - ३५.२

२०११ - ३४.५

२०१८ - ३५.४

२०२०-३३.६

२०२१-३७.२

----

सरासरी तापमानात तीन अंशांची वाढ

जुलै महिन्यात यंदा सरासरी तापमानात तीन अंशांची वाढ झाली आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्याच्या दिवसांत नागरिकांना उकाड्याला सामोरे जावे लागत आहे. एप्रिल महिन्याप्रमाणे जुलैमध्ये तापमानाची नोंद होत आहे.

------

आगामी आठवडाभर पावसाचा अंदाज

मान्सून पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. त्यामुळे आगामी आठवडाभर पावसाचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे वातावरणात वाढलेला उकाडा कमी होईल, अशी अपेक्षा आहे.

------

आरोग्य सांभाळा

गेल्या काही दिवसांपासून उकाडा वाढला आहे. तापमानात वाढ होत असल्याने याचा परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. अशा परिस्थितीत डिहायड्रेशन होऊ शकते. त्यामुळे भरपूर पाणी प्यावे, सकस आहार घ्यावा.

- डॉ. सचिन पवार

------

मान्सून पुन्हा सक्रिय

जुलै महिन्यात शक्यतोवर वातावरणात गारवा असतो. यंदा जुलै महिन्यातही उष्णतेची लाट निर्माण झाली आहे. आता पुन्हा एकदा मान्सून सक्रिय होत आहे. पुढचे १२ दिवस पावसाचे आहेत. त्यामुळे सध्या होणारी लाहीलाही शांत होईल.

- डॉ. नीलेश हेडा, पर्यावरण तज्ज्ञ