शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पाण्यासाठी प्रशासनाला फोडणार घाम

By admin | Updated: August 11, 2014 23:44 IST

नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते.

तळप बु. : येथील पाणीपुरवठा योजना बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. त्यामुळे येथील नागरिकांनी १५ ऑगस्टपासून पाण्यासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर उपोषणास बसण्याचा ईशारा दिला आहे. येथे ग्रामीण पाणीपुरवठा योजना आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजना अशा दोन योजना उभ्या आहेत. पण आजरोजी सदर दोन्ही योजना बंद आहे. गावातील विहिरींना सुद्धा पाणी नसल्यामुळे नागरिकांना गावाबाहेरून दुरवरून पाणी आणावे लागत आहे. त्यामुळे महिला नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. गावात महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचे नळ कनेक्शन घेवून पाणीपुरवठा सुरू करण्याबाबत सभा घेतली. त्यामध्ये ८0 नागरिकांनी नळ कनेक्शन देण्यासाठी डिपॉझिट गोळा केले. परंतु डिपॉझिट जमा करून घेण्यासाठी आणि पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी महाराष्ट्र जीवन टाळाटाळ करीत आहे. गावात पाण्याअभावी नागरिकांचे हाल होत असल्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. वारंवार अर्ज देवूनही संबंधित विभागाकडून कोणतीही हालचाल होत नसल्यामुळे नागरिकांनी उपोषणाचा निर्णय घेतला आहे. येथील नागरिकांना त्वरित नळ कनेक्शन देवून पाणीपुरवठा सुरू न केल्यास नागरिक १५ ऑगस्ट रोजी ग्रा.पं.कार्यालयाजवळ एकदिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसणार आहेत. निवेदनावर श्रीरंग गोदमले, संतोष जाधव, संतोष इंगोले, सुभाष चक्रनारायण, रवि टाले, छगन हगवणे, सुरेश इंगोले, हरिभाऊ टाले, सुभाष गोदमले, काशीनाथ टाले, गणेश खंडारे, बाबाराव लावरे यांची स्वाक्षरी आहे.