शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

विद्यार्थ्यांचा प्रवास भत्ता अडकला लालफितशाहित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:38 IST

प्रामुख्याने ज्या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. अशा २०० शाळांचे इतर शाळांत समायोजन करून विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला ...

प्रामुख्याने ज्या शाळांची पटसंख्या २० पेक्षा कमी आहे. अशा २०० शाळांचे इतर शाळांत समायोजन करून विद्यार्थ्यांना प्रवास भत्ता दिला जाणार होता; परंतु त्या शाळा अद्यापही सुरू असल्यानेसुद्धा प्रवासभत्त्याची अमलबजावणी होऊ शकली नाही. त्यात गतवर्षी एप्रिल महिन्यापासून जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा शिरकाव झाला आणि शासनाने लॉकडाऊन जारी केल्याने शाळा बंदच ठेवाव्या लागल्या. या परिस्थितीत २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करण्याची किंवा त्यांचे इतर शाळांत समायोजन करण्याची प्रक्रियाच पूर्ण होऊ शकली नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रवास भत्त्याचा प्रश्नच उरला नाही.

-------------------------

कोरोना संसर्गामुळे अडचणी

- जिल्ह्यात एप्रिल २०२० पासून कोरोना संसर्गाचा प्रादूर्भाव वाढू लागला. शासनाने २३ मार्च २०२० पासूनच लॉकडाऊन जारी केले. त्यात जवळपास सहा महिने शाळा बंद होत्या. लॉकडाऊन काढल्यानंतरही प्राथमिक शाळा सुरूच होऊ शकल्या नाहीत.

-त्यामुळे ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांनाही आॅनलाईन शिक्षणाचा आधार घ्यावा लागला. परिणामी प्रवास बंद होता. त्यात विद्यार्थ्यांच्या परीक्षाही होऊ शकल्या नाहीत. जानेवारीपासून कोरोना संसर्गाची दुसरी लाट उसळल्याने अडचणी अधिकच वाढल्या.

-वाढत असलेल्या कोरोना संसर्गामुळे शाळा बंद असताना विद्यार्थ्यांच्या प्रवासभत्त्याबाबतचा कोणताही शासन निर्णय शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आला नाही. त्यामुळे प्रवास भत्त्याची योजना लालफितशाहीतच राहिली.

-------------------------

कोट: शासनाने मध्यंतरी ग्रामीण भागांतील विद्यार्थ्यांना प्रवासभत्ता देण्याची योजना आखली होती. तथापि, २० पेक्षा क मी पटसंख्या असलेल्या शाळा बंद करून त्यांचे इतर शाळांत समायोजन झाल्यानंतर ही योजना राबविणे शक्य होणार होते; परंतु विविध तांत्रिक अडचणी आणि कोरोना संसर्गामुळे शाळा बंद ठेवाव्या लागल्याने विद्यार्थ्यांना प्रवासभत्ता देण्याची योजना सुरू होऊ शकली नाही.

-अंबादास मानकर,

शिक्षणाधिकारी, प्राथमिक

-------------------------

तालुका लाभार्थी

वाशिम - ४६७

कारंजा - ३५१

मं.पीर - २९६

रिसोड - ३१०

मालेगाव - २८६

मानोरा -२९०