शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
2
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
3
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
4
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
5
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
6
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
7
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
8
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
9
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
10
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
11
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
12
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
13
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
14
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
15
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
16
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
17
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
18
"मी हरियाणामध्ये हिंदू महिलेचे 'घूंघट' खेचले असते तर...", नीतीश कुमारांच्या हिजाब वादावर काय म्हणाले उमर अब्दुल्ला?
19
७१ व्या वर्षी रेखा यांनी केलं लग्न? भर कार्यक्रमात स्वतःच केला मोठा खुलासा; म्हणाल्या, "प्रेम आहे तर..."
20
प्यारवाली लव्हस्टोरी! ब्रेकअपनंतर शोधला डिजिटल पार्टनर; चक्क AI बॉयफ्रेंडसोबत बांधली लग्नगाठ
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात आता विद्यार्थ्यांचाही सहभाग!

By admin | Updated: November 22, 2014 23:38 IST

केंद्र शासनाचा ‘शिक्षित भारत सक्षम भारत’ उपक्रम.

अकोला: देशातील शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव मिळावा यासाठी शासनाने विद्यार्थ्यांनाच शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचा निश्‍चय केला आहे. ह्यशिक्षित भारत सक्षम भारतह्ण या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांची मते थेट केंद्र शासनाकडे मांडता येणार आहेत. देशाच्या विकासात शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावल्याशिवाय प्रगती अशक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन, केंद्र शासनाने शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या प्रक्रियेत शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक यांच्यासह विद्यार्थ्यांनादेखील समावून घेण्यात येत आहे. आजपर्यंत सर्व शैक्षणिक धोरणे विद्यार्थ्यांना डोळ्यापुढे ठेवून आखल्या गेली असली तरी, स्वत: विद्यार्थी हा घटक मात्र निर्णय प्रक्रियेत दुर्लक्षितच राहत होता. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव मिळत नव्हता; परंतु नव्या सरकारने शैक्षणिक धोरणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचे निश्‍चत केले आहे. केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने १७ नोव्हेंबरला ह्यशिक्षित भारत सक्षम भारतह्ण या उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कल्पनेला वाव देण्याचे शासनाने निश्‍चित केले आहे. त्यासाठी देशातील सर्व विद्यापीठांमधील निवडक विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक विद्यापीठामधून एका विद्यार्थ्यांंची निवड करुन, त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पना मागविण्यात येणार आहेत. या कल्पनांबाबत विद्यार्थ्यांंशी चर्चा करणे, त्यांच्याकडून सादरीकरण करवून घेणे, तसेच सुयोग्य कल्पना केंद्र शासनापर्यंंत पोहोचविण्याचे आवाहन विद्यापीठांना करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने आम्हाला १७ नोव्हेंबरला ह्यशिक्षित भारत सक्षम भारतह्ण या उपक्रमाबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार आम्ही विद्यापीठाच्या कार्याक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांना, त्यांच्या विद्यार्थ्यांंकडून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबाबतच्या शिफारसी व सूचना पाठविण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे. महाविद्यालयांकडून आम्हाला विद्यार्थ्यांंच्या शिफारसी प्राप्त झाल्यानंतर, त्यातून एका विद्यार्थ्याची निवड केली जाईल व त्याचे नाव केंद्र शासनाकडे पाठविले जाणार असल्याचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अजय देशमुख यांनी सांगीतले.