शहरं
Join us  
Trending Stories
1
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
2
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
3
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
4
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
5
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
6
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
7
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
9
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
10
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
11
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
12
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
13
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
14
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
15
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
16
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
17
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
18
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
19
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
20
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप

शिक्षणाचा दर्जा उंचावण्यात आता विद्यार्थ्यांचाही सहभाग!

By admin | Updated: November 22, 2014 23:38 IST

केंद्र शासनाचा ‘शिक्षित भारत सक्षम भारत’ उपक्रम.

अकोला: देशातील शिक्षणाचा दर्जा उंचाविण्यासाठी केंद्र शासनाने पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव मिळावा यासाठी शासनाने विद्यार्थ्यांनाच शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या प्रक्रियेत सामावून घेण्याचा निश्‍चय केला आहे. ह्यशिक्षित भारत सक्षम भारतह्ण या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना त्यांची मते थेट केंद्र शासनाकडे मांडता येणार आहेत. देशाच्या विकासात शिक्षणाचा महत्त्वाचा वाटा आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावल्याशिवाय प्रगती अशक्य आहे. ही बाब लक्षात घेऊन, केंद्र शासनाने शिक्षणाचा दर्जा उंचावण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. शिक्षणाचा दर्जा उंचावण्याच्या प्रक्रियेत शिक्षण तज्ज्ञ, शिक्षक यांच्यासह विद्यार्थ्यांनादेखील समावून घेण्यात येत आहे. आजपर्यंत सर्व शैक्षणिक धोरणे विद्यार्थ्यांना डोळ्यापुढे ठेवून आखल्या गेली असली तरी, स्वत: विद्यार्थी हा घटक मात्र निर्णय प्रक्रियेत दुर्लक्षितच राहत होता. विद्यार्थ्यांच्या कल्पनांना वाव मिळत नव्हता; परंतु नव्या सरकारने शैक्षणिक धोरणाच्या प्रक्रियेत विद्यार्थ्यांना सामावून घेण्याचे निश्‍चत केले आहे. केंद्र शासनाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थी दिनाच्या निमित्ताने १७ नोव्हेंबरला ह्यशिक्षित भारत सक्षम भारतह्ण या उपक्रमाची घोषणा केली. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या कल्पनेला वाव देण्याचे शासनाने निश्‍चित केले आहे. त्यासाठी देशातील सर्व विद्यापीठांमधील निवडक विद्यार्थ्यांना त्यांच्या कल्पना मांडण्याची संधी मिळणार आहे. प्रत्येक विद्यापीठामधून एका विद्यार्थ्यांंची निवड करुन, त्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कल्पना मागविण्यात येणार आहेत. या कल्पनांबाबत विद्यार्थ्यांंशी चर्चा करणे, त्यांच्याकडून सादरीकरण करवून घेणे, तसेच सुयोग्य कल्पना केंद्र शासनापर्यंंत पोहोचविण्याचे आवाहन विद्यापीठांना करण्यात आले आहे. केंद्र शासनाच्या शिक्षण विभागाच्या वतीने आम्हाला १७ नोव्हेंबरला ह्यशिक्षित भारत सक्षम भारतह्ण या उपक्रमाबाबतचे पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार आम्ही विद्यापीठाच्या कार्याक्षेत्रातील सर्व महाविद्यालयांना, त्यांच्या विद्यार्थ्यांंकडून शिक्षणाचा दर्जा उंचावण्याबाबतच्या शिफारसी व सूचना पाठविण्याचे आवाहन पत्राद्वारे केले आहे. महाविद्यालयांकडून आम्हाला विद्यार्थ्यांंच्या शिफारसी प्राप्त झाल्यानंतर, त्यातून एका विद्यार्थ्याची निवड केली जाईल व त्याचे नाव केंद्र शासनाकडे पाठविले जाणार असल्याचे संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अजय देशमुख यांनी सांगीतले.