शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी मांसाहार खालेल्लं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
2
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
3
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
4
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
5
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
6
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
7
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
8
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
9
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
10
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
11
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश
12
'माझ्याकडे मरण्याशिवाय काही पर्याय नाहीये'; उत्तराखंडच्या माजी मुख्यमंत्र्याच्या भाच्याचा व्हिडीओ व्हायरल
13
Duleep Trophy : सिराज-KL राहुलला संघात घ्या! BCCI नं जोर लावला; पण सिलेक्टर्संचा साफ नकार, कारण...
14
Tech: फोनमध्ये कॉल आणि डायलर सेटिंग अचानक बदलण्यामागे नेमके काय कारण? बदल शक्य आहे का?
15
काळजी घ्या! मार्केटमध्ये नवीन स्कॅम आला, व्हॉट्सअ‍ॅपवर लग्नपत्रिका पाठवून बँक खाते रिकामे करतात
16
Viral Video: भटक्या कुत्र्यांना खायला दिलं म्हणून महिलेला भररस्त्यात मारहाण; एका व्यक्तीला अटक
17
वर्धा: पत्नी माधुरीची हत्या करून घराशेजारच्या खड्ड्यात पुरला मृतदेह, पण, सुभाषची एक चुक अन् पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
इथं हिटमॅन रोहित लॅम्बोर्गिनीतून फिरतोय; तिकडं क्रिकेटच्या पंढरीत किंग कोहली प्रॅक्टिसमध्ये मग्न
19
पोस्ट ऑफिसचा मोठा निर्णय, अमेरिकेत जाणाऱ्या पार्सलवर बंदी! फक्त 'या' गोष्टींना सूट मिळणार
20
IB Recruitment: गुप्तचर विभागात ज्युनियर ऑफिसर पदांसाठी भरती, जाणून घ्या पात्रता

कडक निर्बंध कागदावर ; नागरिक रस्त्यांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:41 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून सुरू केली ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून सुरू केली असली तर शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि बाजारपेठेत नेहमीप्रमाणेच नागरिकांची गर्दी गुरूवारी ही दिसून आली. शासनाचे कडक निर्बंध कागदावर तर नागरिक रस्त्यावर अशी अवस्था असल्याने कोरोना संसर्गाचा धोका अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन विस्कळीत होत आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाने कहर केला असून, कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून कडक निर्बंध लागू केले. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणाला बाहेर पडता येणार नाही, एवढेच नव्हे तर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पार्सल आणण्यासाठी सुद्धा जाता येणार नाही, असे निर्देश राज्य शासनाने दिलेले आहेत. वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी देखील १४ एप्रिल रोजी स्वतंत्र आदेश काढत अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी रस्त्यावर आढळून आले तर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. त्यामुळे १५ एप्रिलपासून वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा शहरातील बाजारपेठेत व रस्त्यांवर फारशी गर्दी राहणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली असून, शासनाचे कडक निर्बंध कागदावर तर नागरिक रस्त्यावर असल्याचे गुरूवार, १५ एप्रिल रोजी सर्वत्रच दिसून आले. नागरिकांची बेजबाबदार वृत्ती कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे वारंवार निष्पन्न झाले असतानाही, रस्ते, दुकान, बँका, कार्यालयांमधील नागरिकांची गर्दी कमी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तुटणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाशिम शहरातील पाटणी चौक स्थित बाजारपेठेत तसेच रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच गुरूवारी ही नागरिकांची वर्दळ दिसून आली. रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी देखील हटकले नसल्याचे दुपारच्या सुमारास दिसून आले. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी रस्त्यावर आढळून आले तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार, असा इशारा प्रशासनाने दिल्यानंतरही नागरिक बिनधास्त आहेत. नागरिकांचा बिनधास्तपणा हा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरला तर नवल वाटायला नको.

000

बॉक्स.....

उन्हात सावलीचा आधार !

वाशिम शहरात पाटणी चौकात दुपारी २ वाजताच्या सुमारास अनेक नागरिक बाजारपेठेत तसेच रस्त्यावर फिरताना आढळून आले. काही नागरिक तर उन्हापासून बचाव म्हणून एका दुकानाच्या पायरीवर एका रांगेत बसले होते. यावरून कोरोनाच्या महामारीतही नागरिक किती बिनधास्त वावरत आहेत, याची प्रचिती येते. या नागरिकांना ना पोलिसांनी हटकले; ना अन्य कुण्या विभागाच्या चमूकडून विचारणा झाली नाही. हे चित्र असेच राहिले तर शासनाचे कडक निर्बंध ३० एप्रिलपर्यंत कागदावरच राहतील, यात शंका नाही.

०००

विनाकारण घराबाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात १ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कालावधीत सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे. घरी राहून स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.