शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे एक्शन मोडवर! मनपा निवडणुकीपूर्वी शाखा भेटींवर जोर; २ दिवस मुंबई शहर पिंजून काढणार
2
राज आणि उद्धव ठाकरे मुंबईतील 'या' ११३ जागांवर विशेष लक्ष देणार, जागावाटपात ‘MaMu’ फॉर्म्युला वापरणार  
3
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
4
बाजारात पुन्हा 'बुल्स'चे पुनरागमन! सलग ४ दिवसांच्या घसरणीला ब्रेक; 'हे' शेअर्स ठरले टॉप गेनर्स
5
Viral Video: धैर्य आणि प्रसंगावधान! अचानक केसांनी पेट घेतला तरी शाळकरी मुलगी डगमगली नाही...
6
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
7
Winter Special: १० मिनिटात तयार होणारी तीळ शेंगदाण्याची पौष्टिक आणि रुचकर वडी; पाहा रेसिपी 
8
Jara Hatke: टक्कल पडू नये म्हणून 'या' मंदिरात देवाला अर्पण करतात केसांची बट
9
"चांगली कामगिरी करुनही टीम इंडियात निवड होत नसेल तर..." ईशान किशनने बोलून दाखवली मनातली गोष्ट
10
याला म्हणतात 'धुरंधर'...! या ₹2 च्या शेअरनं गुंतवणूकदारांचं नशीबच बदललं, 5 वर्षांत दिला 19000% चा परतावा
11
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
12
Viral Video: पाच वर्षाच्या चिमुकल्याला फुटबॉलप्रमाणे उडवलं, शेजाऱ्याचं अमानुष कृत्य, घटना कॅमेऱ्यात कैद!
13
Sonam Raghuvanshi : नवा ट्विस्ट! "मी राजाला मारलं नाही, राज माझा भाऊ..."; जामीन अर्जात काय म्हणाली सोनम रघुवंशी?
14
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
15
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
16
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
17
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
18
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
19
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

कडक निर्बंध कागदावर ; नागरिक रस्त्यांवर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:41 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून सुरू केली ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने लागू केलेल्या कडक निर्बंधांची अंमलबजावणी जिल्हा प्रशासनाने गुरूवारपासून सुरू केली असली तर शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि बाजारपेठेत नेहमीप्रमाणेच नागरिकांची गर्दी गुरूवारी ही दिसून आली. शासनाचे कडक निर्बंध कागदावर तर नागरिक रस्त्यावर अशी अवस्था असल्याने कोरोना संसर्गाचा धोका अजून वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जनजीवन विस्कळीत होत आहे. संपूर्ण राज्यात कोरोनाने कहर केला असून, कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तोडण्यासाठी राज्य शासनाने १४ एप्रिलच्या रात्री ८ वाजतापासून कडक निर्बंध लागू केले. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणाला बाहेर पडता येणार नाही, एवढेच नव्हे तर हॉटेल, रेस्टॉरंटमध्ये पार्सल आणण्यासाठी सुद्धा जाता येणार नाही, असे निर्देश राज्य शासनाने दिलेले आहेत. वाशिम जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी देखील १४ एप्रिल रोजी स्वतंत्र आदेश काढत अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी रस्त्यावर आढळून आले तर कारवाई करण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना दिले. त्यामुळे १५ एप्रिलपासून वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरूळपीर, मानोरा शहरातील बाजारपेठेत व रस्त्यांवर फारशी गर्दी राहणार नाही, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, ही अपेक्षा फोल ठरली असून, शासनाचे कडक निर्बंध कागदावर तर नागरिक रस्त्यावर असल्याचे गुरूवार, १५ एप्रिल रोजी सर्वत्रच दिसून आले. नागरिकांची बेजबाबदार वृत्ती कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरत असल्याचे वारंवार निष्पन्न झाले असतानाही, रस्ते, दुकान, बँका, कार्यालयांमधील नागरिकांची गर्दी कमी होत नसल्याचे दिसून येते. त्यामुळे कोरोना विषाणू संसर्गाची साखळी तुटणार तरी कशी? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाशिम शहरातील पाटणी चौक स्थित बाजारपेठेत तसेच रस्त्यांवर नेहमीप्रमाणेच गुरूवारी ही नागरिकांची वर्दळ दिसून आली. रस्त्यांवर विनाकारण फिरणाऱ्यांना पोलिसांनी देखील हटकले नसल्याचे दुपारच्या सुमारास दिसून आले. अत्यावश्यक कारणाशिवाय कुणी रस्त्यावर आढळून आले तर दंडात्मक कारवाईला सामोरे जावे लागणार, असा इशारा प्रशासनाने दिल्यानंतरही नागरिक बिनधास्त आहेत. नागरिकांचा बिनधास्तपणा हा जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढविण्यास कारणीभूत ठरला तर नवल वाटायला नको.

000

बॉक्स.....

उन्हात सावलीचा आधार !

वाशिम शहरात पाटणी चौकात दुपारी २ वाजताच्या सुमारास अनेक नागरिक बाजारपेठेत तसेच रस्त्यावर फिरताना आढळून आले. काही नागरिक तर उन्हापासून बचाव म्हणून एका दुकानाच्या पायरीवर एका रांगेत बसले होते. यावरून कोरोनाच्या महामारीतही नागरिक किती बिनधास्त वावरत आहेत, याची प्रचिती येते. या नागरिकांना ना पोलिसांनी हटकले; ना अन्य कुण्या विभागाच्या चमूकडून विचारणा झाली नाही. हे चित्र असेच राहिले तर शासनाचे कडक निर्बंध ३० एप्रिलपर्यंत कागदावरच राहतील, यात शंका नाही.

०००

विनाकारण घराबाहेर पडल्यास दंडात्मक कारवाई

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्ह्यात १ मे रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या कालावधीत सर्व नागरिकांनी स्वयंशिस्त पाळून प्रशासनाला सहकार्य करावे. अत्यावश्यक कारणाशिवाय कोणीही घराबाहेर पडू नये, प्रशासनाकडून देण्यात येत असलेल्या सूचनांचे पालन करावे. घरी राहून स्वतःच्या व कुटुंबाच्या आरोग्याची काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी केले आहे. तसेच नियमांचे उल्लंघन केल्यास दंडात्मक कारवाईचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.