शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

‘रिचार्ज शाप्ट’मुळे पाणीपातळी ‘स्टेबल’!

By admin | Updated: April 3, 2017 02:09 IST

मार्चमध्ये अडीच ते तीन मीटरची नोंद; भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संकल्पनेचे फलित

वाशिम, दि. २- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने २0१४ आणि २0१५ या दोन वर्षांंंंंत ह्यरिचार्ज शाप्टह्ण संकल्पना वापरून ह्यगॅबियनह्ण पद्धतीचे बंधारे उभारले. यामुळे जमिनीच्या वर पाणी दिसत नसले, तरी जमिनीखालची पाणीपातळी ह्यस्टेबलह्ण राहणे शक्य झाल्याची माहिती येथील वरिष्ठ वैज्ञानिक बलवंत गजभिये यांनी दिली.भौगोलिकदृष्ट्या वाशिम जिल्ह्याचा आकार छत्रीसारखा असून, उत्तर-पूर्व आणि दक्षिणेकडे उतार आहे. यामुळे जिल्ह्यात पावसाळ्यात कोसळणारे ८0 ते ९0 टक्के पाणी वाहून जाते. जिल्ह्यातील अधिकांश भूभाग ह्यबेसाल्टह्ण खडकाने व्यापलेला आहे. परिणामी, जमिनीत मुरणार्‍या पाण्याचे प्रमाणही केवळ ८ ते १0 टक्के आहे. तथापि, लहान नाल्यांवाटे पावसाचे वाहून जाणारे पाणी टप्प्याटप्प्याने साठवून त्याचे पुनर्भरण केले तरच जिल्ह्यात सिंचनाची प्रभावी सोय निर्माण होऊू शकेल. ही बाब लक्षात घेऊन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने ह्यगॅबियनह्ण बंधारे उभारण्याची अभिनव संकल्पना राबविली. यासाठी गाव परिसरातील उंच ठिकाणच्या लहान नाल्यांची निवड करुन त्यात गॅबियन बंधारा (जाळीचा बांध) टाकण्यात आला. उपलब्ध नाल्यांमध्ये २0 मीटर खोलीचा ह्यरिचार्ज शॉप्टह्ण घेऊन खाली २५ ते ३0 मीटर अंतरावर पुनर्भरण चर खोदण्यात आला. त्याची खोली अडीच ते तीन मीटर ठेवण्यात आली. त्यात पुन्हा ह्यरिचार्ज शॉप्टह्ण घेऊन भूमिगत बंधारा घेण्यात आला. यामुळे पुनर्भरण चरामध्ये साठलेले पाणी वाहून जाण्यास प्रतिबंध लागला आहे. सोबतच जिल्ह्यातील ५0 पेक्षा अधिक गावांमध्ये उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे जलस्रोतांची पाणीपातळी टिकवून ठेवण्यास मदत मिळाली आहे.

गॅबियन पद्धतीच्या बंधार्‍यांमुळे मार्च महिन्यातही जमिनीखालची पाणीपातळी अडीच ते तीन मीटर असल्याचे पाहणीत निष्पन्न झाले आहे. ग्रामीण भागातील विहिरी, हातपंपांच्या विद्यमान स्थितीमधील पाणीपातळीची तपासणी करूनच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. - बलवंत गजभियेवरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, वाशिम