शहरं
Join us  
Trending Stories
1
वीजग्राहकांसाठी आनंदाची बातमी! २६ टक्के वीजदर कमी होणार; CM फडणवीस म्हणाले, “इतिहासात प्रथमच…”
2
“मोदी माझे चांगले मित्र, व्यापार निवडला अन्...”; भारत-पाक युद्धविरामावर पुन्हा ट्रम्प बोलले
3
“घोषित-अघोषित आणीबाणीत फरक करण्याची वेळ आली आहे, पुन्हा सावध राहण्याचा काळ”: शरद पवार
4
Malegaon Factory Election Result: माळेगाव सहकारी साखर कारखाना निवडणूक अजित पवारांच्या लाटेत
5
Swargate Case :स्वारगेट बलात्कार प्रकरणी पोलिसांकडून पीडितेला मानसिक त्रास; वकिलांचा आरोप
6
लग्नाआधी सरकारी नोकरी! नववी नापास रिंकू सिंह होणार थेट 'शिक्षण अधिकारी'
7
अमेरिकेच्या हल्ल्यांमुळे अणु-प्रकल्प मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त; इराणने अखेर कबुल केलं!
8
प्रकाश आंबेडकरांना धक्का, ७६ लाख वाढीव मतदान याचिका फेटाळली; कोर्ट म्हणाले, “वेळ वाया गेला”
9
तारीख ठरली! इंडिया चॅम्पियन्स पुन्हा एकदा पाकचा धुव्वा उडवण्यासाठी उतरणार मैदानात
10
अणुबॉम्ब पडला तरी काहीही होणार नाही! कुठे आहे जगातील सर्वात सुरक्षित घर?
11
“पहिलीपासून हिंदी लादण्याचा निर्णय रद्द करण्यास सरकारला भाग पाडू”; काँग्रेसचा निर्धार
12
ENG vs IND : पहिल्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियानं या गोलंदाजाला पाठवलं घरी, कारण...
13
भारतातील ५ सर्वात महागड्या गाड्या, किंमत ऐकून बसेल धक्का; कोण आहेत मालक? जाणून घ्या...
14
आणीबाणीविरोधात केंद्रीय मंत्रिमंडळात प्रस्ताव, PM मोदींसह उपस्थित मंत्र्यांनी दिले अनुमोदन
15
सर्व सरकारी कामात कन्नड भाषेचा वापर अनिवार्य; कर्नाटकतील काँग्रेस सरकारचा मोठा आदेश
16
'पंख तुमचे, पण आकाश सर्वांचे...', काँग्रेस अध्यक्ष खरगेंच्या टीकेला शशी थरुर यांचे प्रत्युत्तर!
17
साडूच्या स्टेटसवर दिसला बायकोचा फोटो; नवऱ्याने जाब विचारताच केली 'अशी' हालत
18
जिथे अमेरिका-इस्रायल पोहचू शकत नाहीत; इराणने 'या' पर्वतात लपवले ४०० किलो युरेनियम
19
पुणेकरांसाठी मोठी बातमी! मेट्रो लाईन २ च्या विस्ताराला मंजुरी, केंद्राचा ३६२६ कोटींचा निधी
20
Viral Video : आजीबाईंनी असा ट्रॅक्टर चालवला की सगळे बघतच राहिले! नेटकरीही म्हणतायत वाह वाह...

‘रिचार्ज शाप्ट’मुळे पाणीपातळी ‘स्टेबल’!

By admin | Updated: April 3, 2017 02:09 IST

मार्चमध्ये अडीच ते तीन मीटरची नोंद; भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेच्या संकल्पनेचे फलित

वाशिम, दि. २- भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने २0१४ आणि २0१५ या दोन वर्षांंंंंत ह्यरिचार्ज शाप्टह्ण संकल्पना वापरून ह्यगॅबियनह्ण पद्धतीचे बंधारे उभारले. यामुळे जमिनीच्या वर पाणी दिसत नसले, तरी जमिनीखालची पाणीपातळी ह्यस्टेबलह्ण राहणे शक्य झाल्याची माहिती येथील वरिष्ठ वैज्ञानिक बलवंत गजभिये यांनी दिली.भौगोलिकदृष्ट्या वाशिम जिल्ह्याचा आकार छत्रीसारखा असून, उत्तर-पूर्व आणि दक्षिणेकडे उतार आहे. यामुळे जिल्ह्यात पावसाळ्यात कोसळणारे ८0 ते ९0 टक्के पाणी वाहून जाते. जिल्ह्यातील अधिकांश भूभाग ह्यबेसाल्टह्ण खडकाने व्यापलेला आहे. परिणामी, जमिनीत मुरणार्‍या पाण्याचे प्रमाणही केवळ ८ ते १0 टक्के आहे. तथापि, लहान नाल्यांवाटे पावसाचे वाहून जाणारे पाणी टप्प्याटप्प्याने साठवून त्याचे पुनर्भरण केले तरच जिल्ह्यात सिंचनाची प्रभावी सोय निर्माण होऊू शकेल. ही बाब लक्षात घेऊन भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेने ह्यगॅबियनह्ण बंधारे उभारण्याची अभिनव संकल्पना राबविली. यासाठी गाव परिसरातील उंच ठिकाणच्या लहान नाल्यांची निवड करुन त्यात गॅबियन बंधारा (जाळीचा बांध) टाकण्यात आला. उपलब्ध नाल्यांमध्ये २0 मीटर खोलीचा ह्यरिचार्ज शॉप्टह्ण घेऊन खाली २५ ते ३0 मीटर अंतरावर पुनर्भरण चर खोदण्यात आला. त्याची खोली अडीच ते तीन मीटर ठेवण्यात आली. त्यात पुन्हा ह्यरिचार्ज शॉप्टह्ण घेऊन भूमिगत बंधारा घेण्यात आला. यामुळे पुनर्भरण चरामध्ये साठलेले पाणी वाहून जाण्यास प्रतिबंध लागला आहे. सोबतच जिल्ह्यातील ५0 पेक्षा अधिक गावांमध्ये उभारण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे जलस्रोतांची पाणीपातळी टिकवून ठेवण्यास मदत मिळाली आहे.

गॅबियन पद्धतीच्या बंधार्‍यांमुळे मार्च महिन्यातही जमिनीखालची पाणीपातळी अडीच ते तीन मीटर असल्याचे पाहणीत निष्पन्न झाले आहे. ग्रामीण भागातील विहिरी, हातपंपांच्या विद्यमान स्थितीमधील पाणीपातळीची तपासणी करूनच हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. - बलवंत गजभियेवरिष्ठ भूवैज्ञानिक, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, वाशिम