शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
9
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
10
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
11
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
12
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
13
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
14
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
15
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
16
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
17
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
18
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
19
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
20
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला

पाणी पुरवठा सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:39 IST

कारंजा- शहरातील गौतम नगर, शांती नगर, वाल्मीक नगर या दलितवस्तीला पाणी पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन ...

कारंजा- शहरातील गौतम नगर, शांती नगर, वाल्मीक नगर या दलितवस्तीला पाणी पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी दिला.

शहरातील गौतम नगर, शांती नगर, वाल्मीक नगर या दलितवस्तीला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा म्हणून गवळीपुरा परिसरात पाण्याची टाकी उभारल्या गेली व शासनाच्या निधीतून पाइपलाइन व इतर असा करोडो रुपयांचा खर्च यावर करण्यात आला. सुमारे चार वर्षांअगोदर करोडो रुपये खर्च करून अजूनही या टाकीचे टेस्टिंग करणे तसेच पाइपलाइन व व्हॉल्व्ह बसविणे ही कामे झाली नाहीत. परिणामी, या परिसराला पाणी पुरवठा होत नाही, याबाबत अनेक निवेदने दिल्या गेलीत; मात्र कारंजा न.प. व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कलगीतुऱ्यात व जबाबदारी एकमेकांवर ढकलल्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. रात्र-रात्र जागूनही पाणी मिळत नाही. तेव्हा हा दलितवस्तीला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याच्या टाकीचे काम व इतर कामे पूर्ण करा, अन्यथा सात दिवसांत परिसरातील नागरिक, महिला तसेच आबाल-वृद्धांसह कोरोना नियम पाळून आंदोलन उभारले जाईल, असा इशारा कारंजा शहर वंचित-बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सचिन खांडेकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी एका निवेदनातून दिला आहे. तहसीलदारांनी निवेदनाची तत्काळ दखल घेत मुख्याधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन अग्रेषित केले आहे.

या निवेदनानुसार कारंजा शहरात गौतम नगर व शांती नगर हा प्रामुख्याने दलित वस्ती असलेला परिसर आहे. या परिसरात मागील काही वर्षांपासून सातत्याने पाण्याची टंचाई राहते आणि मार्च ते जूनपर्यंत याची अधिक झळ या परिसरातील महिला व नागरिकांना व विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही बसते. के.एन.कॉलेज ते गौतम नगर या पाइपलाइनवर व्हॉल्व्ह बसवून देण्यात यावा व त्याची टेस्टिंग करून देण्यात यावी व पूर्ण दाबाने या परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, असे निवेदनात नमूद आहे. न.प.ने दोन वर्षांअगोदर के.एन.कॉलेज परिसरात पाण्याची टाकी उभारली; मात्र गौतम नगर व शांती नगरला पाणी पुरवठा करणाऱ्या या विभागातील पाइपलाइनवर टाकीपासून एअर व्हॉल्व्ह बसविले नाही. शासनाने या योजनेसाठी लाखो रुपये खर्च करूनही हा परिसर सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी अजूनही वंचित आहे. गौतम नगर, शांती नगर, वाल्मीक नगर या परिसरात पाणीटंचाई उद्भवल्यामुळे तत्काळ सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे कोरोना नियम पाळून आंदोलन उभारेल, असा इशारा देण्यात आला. या योजनेंतर्गतच्या कामाची चौकशी करून कारवाई करावी व सात दिवसांच्या आत येथे सुरळीत पाणी पुरवठा द्यावा, अशी मागणी केली. निवेदनावर वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष सचिन खांडेकर, कार्यकर्ते अतुल धनद्रव्ये, शुभम शिरसाट, अभिजित वानखडे, मिथुन गोटे, रितेश खंडारे यांच्यासह अनेक नागरिकांच्या व महिलांच्या स्वाक्षरी आहेत.