शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

पाणी पुरवठा सुरू करा; अन्यथा आंदोलनाचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2021 04:39 IST

कारंजा- शहरातील गौतम नगर, शांती नगर, वाल्मीक नगर या दलितवस्तीला पाणी पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन ...

कारंजा- शहरातील गौतम नगर, शांती नगर, वाल्मीक नगर या दलितवस्तीला पाणी पुरवठा करावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा वंचित बहुजन आघाडीने गुरुवारी दिला.

शहरातील गौतम नगर, शांती नगर, वाल्मीक नगर या दलितवस्तीला सुरळीत पाणी पुरवठा व्हावा म्हणून गवळीपुरा परिसरात पाण्याची टाकी उभारल्या गेली व शासनाच्या निधीतून पाइपलाइन व इतर असा करोडो रुपयांचा खर्च यावर करण्यात आला. सुमारे चार वर्षांअगोदर करोडो रुपये खर्च करून अजूनही या टाकीचे टेस्टिंग करणे तसेच पाइपलाइन व व्हॉल्व्ह बसविणे ही कामे झाली नाहीत. परिणामी, या परिसराला पाणी पुरवठा होत नाही, याबाबत अनेक निवेदने दिल्या गेलीत; मात्र कारंजा न.प. व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्या कलगीतुऱ्यात व जबाबदारी एकमेकांवर ढकलल्यामुळे परिसरातील नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. रात्र-रात्र जागूनही पाणी मिळत नाही. तेव्हा हा दलितवस्तीला सुरळीत पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याच्या टाकीचे काम व इतर कामे पूर्ण करा, अन्यथा सात दिवसांत परिसरातील नागरिक, महिला तसेच आबाल-वृद्धांसह कोरोना नियम पाळून आंदोलन उभारले जाईल, असा इशारा कारंजा शहर वंचित-बहुजन आघाडीचे शहराध्यक्ष सचिन खांडेकर यांच्यासह शेकडो नागरिकांनी एका निवेदनातून दिला आहे. तहसीलदारांनी निवेदनाची तत्काळ दखल घेत मुख्याधिकारी व महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांना निवेदन अग्रेषित केले आहे.

या निवेदनानुसार कारंजा शहरात गौतम नगर व शांती नगर हा प्रामुख्याने दलित वस्ती असलेला परिसर आहे. या परिसरात मागील काही वर्षांपासून सातत्याने पाण्याची टंचाई राहते आणि मार्च ते जूनपर्यंत याची अधिक झळ या परिसरातील महिला व नागरिकांना व विद्यार्थी-विद्यार्थिनींनाही बसते. के.एन.कॉलेज ते गौतम नगर या पाइपलाइनवर व्हॉल्व्ह बसवून देण्यात यावा व त्याची टेस्टिंग करून देण्यात यावी व पूर्ण दाबाने या परिसरात पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा, असे निवेदनात नमूद आहे. न.प.ने दोन वर्षांअगोदर के.एन.कॉलेज परिसरात पाण्याची टाकी उभारली; मात्र गौतम नगर व शांती नगरला पाणी पुरवठा करणाऱ्या या विभागातील पाइपलाइनवर टाकीपासून एअर व्हॉल्व्ह बसविले नाही. शासनाने या योजनेसाठी लाखो रुपये खर्च करूनही हा परिसर सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी अजूनही वंचित आहे. गौतम नगर, शांती नगर, वाल्मीक नगर या परिसरात पाणीटंचाई उद्भवल्यामुळे तत्काळ सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, अन्यथा वंचित बहुजन आघाडीतर्फे कोरोना नियम पाळून आंदोलन उभारेल, असा इशारा देण्यात आला. या योजनेंतर्गतच्या कामाची चौकशी करून कारवाई करावी व सात दिवसांच्या आत येथे सुरळीत पाणी पुरवठा द्यावा, अशी मागणी केली. निवेदनावर वंचित बहुजन आघाडी शहराध्यक्ष सचिन खांडेकर, कार्यकर्ते अतुल धनद्रव्ये, शुभम शिरसाट, अभिजित वानखडे, मिथुन गोटे, रितेश खंडारे यांच्यासह अनेक नागरिकांच्या व महिलांच्या स्वाक्षरी आहेत.