शहरं
Join us  
Trending Stories
1
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
2
Rain Update : ठाणे, रायगड, मुंबईत मुसळधार, ऑरेंज अलर्ट, पालघरसाठी रेड अलर्ट, भरती-ओहोटीबाबतही इशारा
3
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
4
आता सैनिकांसाठी अरबी भाषा आणि इस्लाम शिकणे अनिवार्य, इस्रायलचा मोठा निर्णय! कारण काय?
5
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
6
'मला बुटाने मारा', सिद्धरामय्या अन् शिवकुमार यांच्या विशेष अधिकाऱ्यांमध्ये दिल्लीत हाणामारी; कारण काय?
7
शाहरुख फिटनेससाठी कोणते पदार्थ खात नाही? किती वाजता झोपतो? काय जेवतो? जाणून घ्या एका क्लिकवर
8
पहिल्यांदा नोकरी करणाऱ्यांना सरकार देणार १५ हजार रुपये; फक्त पूर्ण कराव्या लागतील 'या' २ अटी
9
"तुम्हाला आनंद देणाऱ्या गोष्टींवरदेखील खर्च करा..," राधिका गुप्ता यांनी दिला हृदयस्पर्शी सल्ला
10
आमदार रोहित पवारांच्या अडचणीत वाढ; मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीकडून मोठी कारवाई
11
महायुतीत २ मंत्र्यांमध्ये रंगलं मानापमान नाट्य; शिंदेसेनेचे मंत्री नाराज, भाजपा मंत्र्यांचा पलटवार
12
सुनील शेट्टीने 'हेरा फेरी ३'मधील परेश रावलच्या एंट्रीवर दिली प्रतिक्रिया, म्हणाली- "नजर लागते..."
13
२ मुलांना विष पाजलं, पत्नीचा गळा दाबला अन् मग पतीने...; एकाच कुटुंबातील चौघांची जीवनयात्रा संपली
14
धक्कादायक घटना! एक वर्षाच्या मुलाने नागाचा चावा घेतला, कोब्राचा मृत्यू झाला; पण मुलगाही...
15
पाकिस्तानने अमेरिकेसमोर TRF'वर सूर बदलला! म्हणाले, आम्हाला काही हरकत नाही', हुशारीही दाखवली
16
अल्पवयीन मुलीवर गँगरेप, प्रेग्नेंट असल्याचं कळताच जिवंत गाडण्याचा प्रयत्न; २ अटक तर १ आरोपी फरार
17
₹३० वरुन ₹३००० पार गेला हा शेअर; आता कंपनीनं मोठ्या गुंतवणुकीची केली घोषणा, तुमच्याकडे आहे का?
18
बनावट राजदूत मोठा मासा निघाला! दहा वर्षात १६२ वेळा परदेशात गेला, या मुस्लिम देशात बऱ्याच वेळा गेला
19
ना नुकसानीची भीती, ना पैसे बुडण्याची चिंता; 'या' स्कीममध्ये ₹१ लाख गुंतवून बनवू शकता २७ लाख रुपये
20
Video: गुगल मॅपच्या नादात बेलापूर येथे कार पडली खाडीत; सागरी पोलिसांच्या सतर्कतेमुळे महिलेला जीवदान

बचत गटाच्या वस्तू प्रदर्शनाला प्रारंभ

By admin | Updated: March 25, 2017 02:26 IST

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन; जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले मार्गदर्शन.

वाशिम, दि. २४- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी थाटात करण्यात आले. यावेळी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाल्याशिवाय सामाजिक व राजकीय सक्षमीकरण होणे शक्य नाही. त्यामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी बचत गटाची चळवळ व्यापक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख ह्या होत्या. जि. प. चे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, समाजकल्याण सभापती पानुताई जाधव, कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, श्रीमती वानखेडे, वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी महिला सक्षमीकरणावर मार्मिक भाष्य केले. कायद्याच्या बडग्यामुळे महिलांचा राजकीय क्षेत्रात शिरकाव झाला खरा पण, तो केवळ नामधारी स्वरूपाचा. अनेक महिलांचा कारभार त्यांचे पती अथवा वडील पाहताना निदर्शनास येत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त केले. महिलांच्या विकासासाठी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उभारण्यात आलेली दुकाने सध्या बंद पडली आहेत. काही ठिकाणी नादुरुस्त आहेत. ते दुरुस्त करुन महिलांना उपलब्ध करुन दिल्यास महिलांना रोजगाराची संधी निर्माण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. लोणचे, पापड, कुरडई आदि पारंपरिक व्यवसाय सोडून महिलांनी कुक्कुट पालन, बकरीपालन असे नवीन व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले. सभापती विश्‍वनाथ सानप यांनीही यावेळी विचार मांडले. हर्षदा देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला. महिलांनी आर्थिक सूत्रे आपल्या हातात घेतल्यास महिला सक्षमीकरणासह कौटुंबिक समतोलही राखला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधीक्षक मुकुंद नायक यांनी मानले.