शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाच्या वस्तू प्रदर्शनाला प्रारंभ

By admin | Updated: March 25, 2017 02:26 IST

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन; जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले मार्गदर्शन.

वाशिम, दि. २४- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी थाटात करण्यात आले. यावेळी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाल्याशिवाय सामाजिक व राजकीय सक्षमीकरण होणे शक्य नाही. त्यामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी बचत गटाची चळवळ व्यापक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख ह्या होत्या. जि. प. चे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, समाजकल्याण सभापती पानुताई जाधव, कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, श्रीमती वानखेडे, वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी महिला सक्षमीकरणावर मार्मिक भाष्य केले. कायद्याच्या बडग्यामुळे महिलांचा राजकीय क्षेत्रात शिरकाव झाला खरा पण, तो केवळ नामधारी स्वरूपाचा. अनेक महिलांचा कारभार त्यांचे पती अथवा वडील पाहताना निदर्शनास येत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त केले. महिलांच्या विकासासाठी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उभारण्यात आलेली दुकाने सध्या बंद पडली आहेत. काही ठिकाणी नादुरुस्त आहेत. ते दुरुस्त करुन महिलांना उपलब्ध करुन दिल्यास महिलांना रोजगाराची संधी निर्माण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. लोणचे, पापड, कुरडई आदि पारंपरिक व्यवसाय सोडून महिलांनी कुक्कुट पालन, बकरीपालन असे नवीन व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले. सभापती विश्‍वनाथ सानप यांनीही यावेळी विचार मांडले. हर्षदा देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला. महिलांनी आर्थिक सूत्रे आपल्या हातात घेतल्यास महिला सक्षमीकरणासह कौटुंबिक समतोलही राखला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधीक्षक मुकुंद नायक यांनी मानले.