शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

बचत गटाच्या वस्तू प्रदर्शनाला प्रारंभ

By admin | Updated: March 25, 2017 02:26 IST

मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन; जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले मार्गदर्शन.

वाशिम, दि. २४- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्यावतीने आयोजित महिला बचत गटांनी निर्मित केलेल्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन शुक्रवारी थाटात करण्यात आले. यावेळी महिलांचे आर्थिक सक्षमीकरण झाल्याशिवाय सामाजिक व राजकीय सक्षमीकरण होणे शक्य नाही. त्यामुळे महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी बचत गटाची चळवळ व्यापक करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष हर्षदा देशमुख ह्या होत्या. जि. प. चे उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, समाजकल्याण सभापती पानुताई जाधव, कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्‍वनाथ सानप, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे, श्रीमती वानखेडे, वाशिम पंचायत समितीचे गटविकास अधिकारी वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी महिला सक्षमीकरणावर मार्मिक भाष्य केले. कायद्याच्या बडग्यामुळे महिलांचा राजकीय क्षेत्रात शिरकाव झाला खरा पण, तो केवळ नामधारी स्वरूपाचा. अनेक महिलांचा कारभार त्यांचे पती अथवा वडील पाहताना निदर्शनास येत असल्याचे त्यांनी बोलून दाखवले. उपाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांनी उद्घाटनप्रसंगी मनोगत व्यक्त केले. महिलांच्या विकासासाठी त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठी जिल्हा परिषद व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत उभारण्यात आलेली दुकाने सध्या बंद पडली आहेत. काही ठिकाणी नादुरुस्त आहेत. ते दुरुस्त करुन महिलांना उपलब्ध करुन दिल्यास महिलांना रोजगाराची संधी निर्माण होण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले. लोणचे, पापड, कुरडई आदि पारंपरिक व्यवसाय सोडून महिलांनी कुक्कुट पालन, बकरीपालन असे नवीन व्यवसाय सुरु करण्याचे आवाहन त्यांनी केले. सभापती विश्‍वनाथ सानप यांनीही यावेळी विचार मांडले. हर्षदा देशमुख यांनी अध्यक्षीय समारोप केला. महिलांनी आर्थिक सूत्रे आपल्या हातात घेतल्यास महिला सक्षमीकरणासह कौटुंबिक समतोलही राखला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणाचे संचालक तथा अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के. एम. अहमद यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे अधीक्षक मुकुंद नायक यांनी मानले.