शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

सोयाबीनच्या शेतात साचले पाणी; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणेल का कोणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST

वाशिम : गत चार, पाच दिवसांत संततधार पावसाने सोयाबीनला जबर हानी पोहोचविली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आले आहे. ...

वाशिम : गत चार, पाच दिवसांत संततधार पावसाने सोयाबीनला जबर हानी पोहोचविली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आले आहे. सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने शेतमालाची प्रतवारी घसरण्याची दाट शक्यता असून, नुकसानभरपाई मिळेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

गतवर्षातील आर्थिक नुकसान विसरून यंदा नव्या उमेदीने शेतकरी शेतीच्या कामाला लागला. यंदा जिल्ह्यात तीन लाख हेक्टरच्या वर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. बाजारभावात घसरण सुरूच असल्याने अगोदरच शेतकरी चिंतातुर आहेत. त्यातच संततधार पावसाने भर घातल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू असतानाच, गत चार-पाच दिवसांत जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीनच्या शेतात पाणी साचले. सोंगणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या शेंगांना अनेक ठिकाणी कोंब फुटत आहेत, तर काही ठिकाणी सोयाबीनच्या गंजी जागच्या जागीच काळवंडत असल्याचे दिसून येते. यामुळे लागवड खर्च निघतो की नाही? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सोयाबीनच्या एक एकर शेतीत मशागत, पेरणी, फवारणी, मजुरी, सोंगणी व काढणी, असा एकंदर १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास संततधार पावसाने हिरावून घेतल्यामुळे नैसर्गिक आपत्तीसमोर शेतकरी हतबल ठरत आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणा प्रत्यक्ष शेतात येऊन पाहणी करेल का, नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा होईल का, समाधानकारक भरपाई मिळेल का, आदी प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केले जात आहे.

.............

पावसामुळे प्रतवारीला धोका!

पावसामुळे सोयाबीन भिजल्याने प्रतवारी घसरण्याचा धोका आहे. भिजलेली सोयाबीन काळवंडली तर प्रति क्विंटल २२०० ते २८०० रुपयांदरम्यान दर मिळू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लागवड खर्च वसूल होईल की नाही, याची चिंता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लागली आहे.

..................

सोयाबीनचा एकूण पेरा (हेक्टर)- ३०२०००

नुकसान झाल्याचा अंदाज (हेक्टर) - ५२००

..................

पावसामुळे सोयाबीनचे नुकसान; भरपाई मिळावी

कोट

विविध संकटांमुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होत आहे. आता पावसामुळे सोयाबीनला हानी पोहोचली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित आहे.

- सुभाष नानवटे

शेतकरी, दोडकी

.....

गत चार, पाच दिवसांत संततधार पाऊस झाल्याने सोयाबीनच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी.

- श्याम बढे,

शेतकरी, रिधोरा

.....

यंदादेखील शेतकऱ्यांना विविध संकटांतून जावे लागत आहे. अगोदर बाजारभाव कोसळले, आता पावसाने शेतकऱ्यांना झोडपले. त्यामुळे नुकसान भरपाई मिळायला हवी.

- संजयकुमार सरनाईक,

शेतकरी, चिखली