शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या शेतात साचले पाणी; शेतकऱ्यांच्या व्यथा जाणेल का कोणी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:45 IST

वाशिम : गत चार, पाच दिवसांत संततधार पावसाने सोयाबीनला जबर हानी पोहोचविली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आले आहे. ...

वाशिम : गत चार, पाच दिवसांत संततधार पावसाने सोयाबीनला जबर हानी पोहोचविली असून, यामुळे शेतकऱ्यांच्या डोळ्यातही पाणी आले आहे. सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने शेतमालाची प्रतवारी घसरण्याची दाट शक्यता असून, नुकसानभरपाई मिळेल का? असा प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केला जात आहे.

गतवर्षातील आर्थिक नुकसान विसरून यंदा नव्या उमेदीने शेतकरी शेतीच्या कामाला लागला. यंदा जिल्ह्यात तीन लाख हेक्टरच्या वर सोयाबीनचा पेरा झालेला आहे. बाजारभावात घसरण सुरूच असल्याने अगोदरच शेतकरी चिंतातुर आहेत. त्यातच संततधार पावसाने भर घातल्याने शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. सोयाबीन सोंगणीचा हंगाम सुरू असतानाच, गत चार-पाच दिवसांत जिल्ह्यात संततधार पाऊस झाला. त्यामुळे सोयाबीनच्या शेतात पाणी साचले. सोंगणी करून ठेवलेल्या सोयाबीनच्या शेंगांना अनेक ठिकाणी कोंब फुटत आहेत, तर काही ठिकाणी सोयाबीनच्या गंजी जागच्या जागीच काळवंडत असल्याचे दिसून येते. यामुळे लागवड खर्च निघतो की नाही? याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आहे. सोयाबीनच्या एक एकर शेतीत मशागत, पेरणी, फवारणी, मजुरी, सोंगणी व काढणी, असा एकंदर १५ ते २० हजार रुपये खर्च येतो. सोयाबीनचा हातातोंडाशी आलेला घास संततधार पावसाने हिरावून घेतल्यामुळे नैसर्गिक आपत्तीसमोर शेतकरी हतबल ठरत आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी लोकप्रतिनिधींसह प्रशासकीय यंत्रणा प्रत्यक्ष शेतात येऊन पाहणी करेल का, नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी शासनदरबारी पाठपुरावा होईल का, समाधानकारक भरपाई मिळेल का, आदी प्रश्न शेतकऱ्यांमधून उपस्थित केले जात आहे.

.............

पावसामुळे प्रतवारीला धोका!

पावसामुळे सोयाबीन भिजल्याने प्रतवारी घसरण्याचा धोका आहे. भिजलेली सोयाबीन काळवंडली तर प्रति क्विंटल २२०० ते २८०० रुपयांदरम्यान दर मिळू शकतील, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे लागवड खर्च वसूल होईल की नाही, याची चिंता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना लागली आहे.

..................

सोयाबीनचा एकूण पेरा (हेक्टर)- ३०२०००

नुकसान झाल्याचा अंदाज (हेक्टर) - ५२००

..................

पावसामुळे सोयाबीनचे नुकसान; भरपाई मिळावी

कोट

विविध संकटांमुळे शेतकऱ्यांना शेती करणे अवघड होत आहे. आता पावसामुळे सोयाबीनला हानी पोहोचली आहे. त्यामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळणे अपेक्षित आहे.

- सुभाष नानवटे

शेतकरी, दोडकी

.....

गत चार, पाच दिवसांत संततधार पाऊस झाल्याने सोयाबीनच्या शेतात पाणी साचले. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागणार आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी.

- श्याम बढे,

शेतकरी, रिधोरा

.....

यंदादेखील शेतकऱ्यांना विविध संकटांतून जावे लागत आहे. अगोदर बाजारभाव कोसळले, आता पावसाने शेतकऱ्यांना झोडपले. त्यामुळे नुकसान भरपाई मिळायला हवी.

- संजयकुमार सरनाईक,

शेतकरी, चिखली