वाशिम: धडक सिंचन आणि नरेगा अंतर्गत मंजूर योजनेतून रखडलेल्या विहिरींची कामे वेळेत पूर्ण करण्यासंदर्भात १६ फेब्रुवारीला जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत सकारात्मक चर्चा झाली. त्यामुळे या कामांना गती मिळणार आहे. विशेष बाब म्हणजे काही दिवसांपूर्वी अभियंत्यांवर आलेले फौजदारी कारवाईचे गंडांतरही टळल्याची माहिती सूत्रांनी दिली. धडक सिंचन आणि नरेगांतर्गत मंजूर योजनेतील विहिरींचे १00 टक्के उद्दिष्ट पूर्ण करा; अन्यथा भारतीय दंड संहिता कलम १८८ अन्वये फौजदारी कारवाई करू, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिला होता. त्याविरोधात जलसंपदा विभागातील अभियंत्यांनी ह्यएल्गारह्ण पुकारून कारवाई टाळण्यासाठी सक्तीच्या रजेवर जाण्याचा निर्धार केला होता. दरम्यान, यासंदर्भात ह्यलोकमतह्णने १0 फेब्रुवारीच्या अंकात ह्यफौजदारी कारवाईच्या धास्तीने सक्तीच्या रजेचा पवित्राह्ण या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. त्या पृष्ठभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी जिल्ह्यातील सर्व प्रमुख अधिकार्यांची बैठक बोलाविण्यात आली. बैठकीस जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्यासह जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता अजय कोहिरकर, कार्यकारी अभियंता जयंत शिंदे, शिवाजी जाधव, जिल्हा परिषदेच्या लघुसिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता, बांधकाम विभागाचे अभियंता, जिल्ह्यातील सर्व तहसीलदार, गटविकास अधिकार्यांची उपस्थिती होती. बैठक वादळी ठरण्याची शक्यता वर्तविण्यात येत होती; मात्र अत्यंत शांततापूर्ण वातावरणात धडक सिंचन आणि नरेगा अंतर्गत मंजूर विहिरींची कामे सर्वांंच्या सहकार्याने पूर्ण करण्यासंबंधी सर्वंंकष चर्चा होऊन विहिरींची कामे गतीने मार्गी लावण्याचे आवाहन जिल्हाधिकार्यांनी यावेळी केले. ते म्हणाले की, धडक सिंचन विहीर योजनेतील रखडलेल्या तथा सुरूच न झालेल्या विहिरींची कामे वेळेत पूर्ण करण्याचे शासनाचे सक्त निर्देश आहेत. त्यामुळे या कामी प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारी, कर्मचार्यांनी सहकार्य करावे. यासाठी जिल्हा प्रशासनाचे सर्वतोपरी सहकार्य असेल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिल्याची माहिती सूत्रांनी दिली.
धडक सिंचन विहिरींच्या कामांना मिळणार गती!
By admin | Updated: February 17, 2016 02:10 IST