शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

सोयाबीनचा भाव आणखी गडगडला; शेतकरी धास्तावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:42 IST

वाशिम : नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव गडगडत आहेत. यामध्ये आणखी घट येत असून, शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या ...

वाशिम : नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव गडगडत आहेत. यामध्ये आणखी घट येत असून, शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या बाजार समितीत नवीन सोयाबीनला ५५०० ते ७२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जुन्या सोयाबीनचा दरही कोसळला असून, ६०००-७४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांतून जावे लागते. नैसर्गिक आपत्तीपासून बचावलेला शेतमाल चिखलमय रस्त्याने घरी आणताना शेतकऱ्यांची दमछाक होते. शेतमाल घरी आला की बाजारभाव गडगडतात. १५ दिवसांपूर्वी जुन्या सोयाबीनला १० हजारांवर भाव होता. त्यानंतर बाजारभाव गडगडत असल्याचे दिसून येते. नव्या सोयाबीनला तर अल्प भाव मिळत असल्याचे दिसून येते. ४ सप्टेंबरला नव्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ६७०० ते ८२८१ रुपये भाव मिळाला होता. आता बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन येत असल्यामुळे बाजारभावही कोलमडत असल्याचे दिसून येते. शनिवारी वाशिम बाजार समितीत नवीन सोयाबीनची २७७५ क्विंटल आवक होती. या सोयाबीनला प्रतिक्विंटल ५५००-७२०० भाव मिळाला. जुन्या सोयाबीनची आवक ३७९ क्विंटल होती, तर प्रतिक्विंटल भाव ६०००-७४०० होता. यावरून सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड घट येत असल्याचे दिसून येते. बाजारभाव गडगडत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

.....................

भाव आणखी गडगडणार

नवीन सोयाबीन बाजारात येत असल्याने भाव आणखी गडगडण्याची शक्यता व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. एकीकडे रासायनिक खते, बियाणे, मजुरी आदींचा खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे हमीभावात फारशी वाढ होत नसल्याचे दिसून येते. १५ दिवसांनंतर सोयाबीनचा बाजारभाव ३५०० ते ६००० रुपयापर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

..................

सांगा, शेतकऱ्यांनी शेती कशी करावी?

कोट

लागवड खर्चात एकीकडे भरमसाठ वाढ होत आहे, तर दुसरीकडे शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नाहीत. १५ दिवसांपूर्वी सोयाबीन तेजीत होते. आता नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो.

- हरीश चौधरी

शेतकरी, पार्डीटकमोर

...................

भारतात मुबलक प्रमाणात शेतमाल उपलब्ध असताना बाहेरील देशातून शेतमाल आयात करण्याला केंद्र सरकार परवानगी देते. त्यामुळे देशातील शेतमालाला चांगला बाजारभाव कसव मिळेल? सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणांचा फटका कोट्यवधी शेतकऱ्यांना बसत आहे.

- गजानन गोटे,

शेतकरी, तोंडगाव