शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
4
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
5
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
6
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
7
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
8
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
9
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
10
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
11
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
12
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
13
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
14
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
15
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
16
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
17
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
18
तेजस्वी यादवांच्या अन्य तिन्ही बहिणींनी पाटणाचे घर सोडले; मोठ्या बहिणीनंतर...
19
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
20
तेजप्रताप यादवांचा राज्यातील NDA सरकारला पाठिंबा; रोहिणी आचार्य यांना मोठी जबाबदारी देणार
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनचा भाव आणखी गडगडला; शेतकरी धास्तावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:42 IST

वाशिम : नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव गडगडत आहेत. यामध्ये आणखी घट येत असून, शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या ...

वाशिम : नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव गडगडत आहेत. यामध्ये आणखी घट येत असून, शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या बाजार समितीत नवीन सोयाबीनला ५५०० ते ७२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जुन्या सोयाबीनचा दरही कोसळला असून, ६०००-७४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांतून जावे लागते. नैसर्गिक आपत्तीपासून बचावलेला शेतमाल चिखलमय रस्त्याने घरी आणताना शेतकऱ्यांची दमछाक होते. शेतमाल घरी आला की बाजारभाव गडगडतात. १५ दिवसांपूर्वी जुन्या सोयाबीनला १० हजारांवर भाव होता. त्यानंतर बाजारभाव गडगडत असल्याचे दिसून येते. नव्या सोयाबीनला तर अल्प भाव मिळत असल्याचे दिसून येते. ४ सप्टेंबरला नव्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ६७०० ते ८२८१ रुपये भाव मिळाला होता. आता बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन येत असल्यामुळे बाजारभावही कोलमडत असल्याचे दिसून येते. शनिवारी वाशिम बाजार समितीत नवीन सोयाबीनची २७७५ क्विंटल आवक होती. या सोयाबीनला प्रतिक्विंटल ५५००-७२०० भाव मिळाला. जुन्या सोयाबीनची आवक ३७९ क्विंटल होती, तर प्रतिक्विंटल भाव ६०००-७४०० होता. यावरून सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड घट येत असल्याचे दिसून येते. बाजारभाव गडगडत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

.....................

भाव आणखी गडगडणार

नवीन सोयाबीन बाजारात येत असल्याने भाव आणखी गडगडण्याची शक्यता व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. एकीकडे रासायनिक खते, बियाणे, मजुरी आदींचा खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे हमीभावात फारशी वाढ होत नसल्याचे दिसून येते. १५ दिवसांनंतर सोयाबीनचा बाजारभाव ३५०० ते ६००० रुपयापर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

..................

सांगा, शेतकऱ्यांनी शेती कशी करावी?

कोट

लागवड खर्चात एकीकडे भरमसाठ वाढ होत आहे, तर दुसरीकडे शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नाहीत. १५ दिवसांपूर्वी सोयाबीन तेजीत होते. आता नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो.

- हरीश चौधरी

शेतकरी, पार्डीटकमोर

...................

भारतात मुबलक प्रमाणात शेतमाल उपलब्ध असताना बाहेरील देशातून शेतमाल आयात करण्याला केंद्र सरकार परवानगी देते. त्यामुळे देशातील शेतमालाला चांगला बाजारभाव कसव मिळेल? सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणांचा फटका कोट्यवधी शेतकऱ्यांना बसत आहे.

- गजानन गोटे,

शेतकरी, तोंडगाव