शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
2
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
3
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
4
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
5
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
6
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
7
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
8
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
9
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
10
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
11
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
12
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
13
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
14
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
15
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
16
आजचा अग्रलेख: चटका लावणारा चकवा
17
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
18
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
19
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
20
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...

सोयाबीनचा भाव आणखी गडगडला; शेतकरी धास्तावले!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2021 04:42 IST

वाशिम : नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव गडगडत आहेत. यामध्ये आणखी घट येत असून, शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या ...

वाशिम : नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव गडगडत आहेत. यामध्ये आणखी घट येत असून, शनिवार, १८ सप्टेंबर रोजी वाशिमच्या बाजार समितीत नवीन सोयाबीनला ५५०० ते ७२०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला. जुन्या सोयाबीनचा दरही कोसळला असून, ६०००-७४०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला.

शेतकऱ्यांना दरवर्षीच विविध संकटांतून जावे लागते. नैसर्गिक आपत्तीपासून बचावलेला शेतमाल चिखलमय रस्त्याने घरी आणताना शेतकऱ्यांची दमछाक होते. शेतमाल घरी आला की बाजारभाव गडगडतात. १५ दिवसांपूर्वी जुन्या सोयाबीनला १० हजारांवर भाव होता. त्यानंतर बाजारभाव गडगडत असल्याचे दिसून येते. नव्या सोयाबीनला तर अल्प भाव मिळत असल्याचे दिसून येते. ४ सप्टेंबरला नव्या सोयाबीनला प्रतिक्विंटल ६७०० ते ८२८१ रुपये भाव मिळाला होता. आता बहुतांश शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीन येत असल्यामुळे बाजारभावही कोलमडत असल्याचे दिसून येते. शनिवारी वाशिम बाजार समितीत नवीन सोयाबीनची २७७५ क्विंटल आवक होती. या सोयाबीनला प्रतिक्विंटल ५५००-७२०० भाव मिळाला. जुन्या सोयाबीनची आवक ३७९ क्विंटल होती, तर प्रतिक्विंटल भाव ६०००-७४०० होता. यावरून सोयाबीनच्या बाजारभावात प्रचंड घट येत असल्याचे दिसून येते. बाजारभाव गडगडत असल्याने शेतकरी धास्तावले आहेत.

.....................

भाव आणखी गडगडणार

नवीन सोयाबीन बाजारात येत असल्याने भाव आणखी गडगडण्याची शक्यता व्यापाऱ्यांसह शेतकऱ्यांमधून वर्तविण्यात येत आहे. एकीकडे रासायनिक खते, बियाणे, मजुरी आदींचा खर्च वाढत आहे, तर दुसरीकडे हमीभावात फारशी वाढ होत नसल्याचे दिसून येते. १५ दिवसांनंतर सोयाबीनचा बाजारभाव ३५०० ते ६००० रुपयापर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

..................

सांगा, शेतकऱ्यांनी शेती कशी करावी?

कोट

लागवड खर्चात एकीकडे भरमसाठ वाढ होत आहे, तर दुसरीकडे शेतमालाला समाधानकारक भाव मिळत नाहीत. १५ दिवसांपूर्वी सोयाबीन तेजीत होते. आता नवीन सोयाबीन मार्केटमध्ये येताच बाजारभाव कोसळले आहेत. त्यामुळे शेती कशी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो.

- हरीश चौधरी

शेतकरी, पार्डीटकमोर

...................

भारतात मुबलक प्रमाणात शेतमाल उपलब्ध असताना बाहेरील देशातून शेतमाल आयात करण्याला केंद्र सरकार परवानगी देते. त्यामुळे देशातील शेतमालाला चांगला बाजारभाव कसव मिळेल? सरकारच्या चुकीच्या कृषी धोरणांचा फटका कोट्यवधी शेतकऱ्यांना बसत आहे.

- गजानन गोटे,

शेतकरी, तोंडगाव