शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

सोयाबीनने केला घात

By admin | Updated: October 26, 2014 00:38 IST

खर्च ९ हजार, उत्पन्न ६ हजार, वाशिम जिल्ह्यातील शेतक-यांचे नियोजन कोलमडले.

नंदकिशोर नारे / वाशिमजिल्ह्यातील शेतकर्‍यांवर संकटाची मालिका सुरूच असल्याने शेतकरी मेटाकुटीस आला आहे. पेरणीसाठी आवश्यक असलेल्या बियाण्यांपासून तर पीक हाती येईपर्यंत यावर्षी शे तकर्‍यांना संकटाचा सामना करावा लागला. आता अनेक शेतकर्‍यांनी नुकतीच सोयाबीनची काढणी केली यामध्ये सोयाबीनचा उतारा खर्चही निघणारा नसल्याने शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडले आहे. एकरी ९ हजार रुपये खर्च व ६ हजार रुपये उत्पन्नामुळे वर्ष कसे काढावे, असा प्रश्न शेतकर्‍यांसमोर ठाकला आहे. सोयाबीनने यावर्षी घात केल्याच्या प्रतिक्रिया शे तकरी व्यक्त करीत आहेत.खरीप हंगामात जिल्ह्यात पेरणीयोग्य साडेचार लाख हेक्टर क्षेत्रापैकी २ लाख ८८ हजार हे क्टरवर सोयाबीनची पेरणी झाली. अध्र्याअधिक क्षेत्रावर सोयाबीनचा पेरा, तर उर्वरित क्षेत्रात कपाशी, तूर, यासह मूग, उडीद, ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल आदी पिकांची शेतकर्‍यांनी पावसाचा अंदाज घेऊन पेरणी केली होती. मूग, उडिदाचे पीक फार थोड्या प्रमाणात असले तरी या पिकालाही मध्यान्हात पावसाने मारलेल्या दडीचा दणका बसला. आधीच उशिराने झालेली पेरणी, विविध प्रकारच्या किडीतून पिकांना कसेबसे सावरणार्‍या जिल्हाभरातील शे तकर्‍याला सोयाबीन या मुख्य पिकासह इतर पीक वाचण्यासाठी प्रयत्न केले. त्यात काही शे तकरी यशस्वीही झाले; परंतु ज्यावेळी सोयाबीन काढणीची वेळ आली, तेव्हा मात्र जिल्हय़ा तील शेतकर्‍यांच्या हातात निराशा आली. जिल्हय़ातील कोरडवाहू जमिनीत तर काही ठिकाणी एकरी ७0 किलो सोयाबीनचा उतारा झाला. सोयाबीनचा खर्च व उत्पन्न याबाबत जिल्हय़ातील प्रत्येक तालुक्याची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता संपूर्ण जिल्हय़ात उत्पन्न कमी असल्याचे दिसून आले. कारंजा तालुक्यामध्ये सोयाबीनचा पेरा जवळपास ६0 टक्के, तर कापूस २५ टक्के व इतर पिके १0 ते १५ टक्के शेतकर्‍यांनी घेतली. या तालुक्यात सोयाबीनचा पेरा एकरी ३ पोते कमीत-कमी झाला. काहीच शेतकर्‍यांना ४ ते ५ पोत्याचा उतारा झाला. मंगरूळपीर तालुक्यात सोयाबीनचा पेरा जवळपास ७५ टक्के आहे. येथेही परिस्थिती मात्र वेगळी नाही. ज्या शेतकर्‍यांकडे पाण्याची व्यवस्था होती त्यांच्याकडे एकरी ४ ते ५ चा उतारा आहे. कोरडवाहू शेतकर्‍यांचे मात्र मरणच असल्याचे चित्र आहे. एकरी १ पोत्यापासून तर ३ पोत्यापर्यंत उत्पन्न शेतकर्‍यांना झाल्याचे शेतकर्‍यांनी सांगितले.रिसोड तालुक्यामध्ये सर्वाधिक पेरा सोयाबीनचा आहे. ९0 टक्क्याच्या जवळपास शे तकर्‍यांनी यावर्षी सोयाबीनचा पेरा केला. त्याचे संगोपन केले. विविध संकटांना सामोरे जाऊन कसेबसे पीक वाचविले; परंतु ज्यावेळी काढणीची वेळ आली तेव्हा एकरी नगण्य पीक आल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.