शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
2
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
3
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
6
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
7
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
8
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
9
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
10
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
11
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
12
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
13
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
14
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
15
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
16
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
17
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
18
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
19
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
20
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!

अल्प पावसावरच पेरणीला प्रारंभ

By admin | Updated: June 20, 2016 02:09 IST

मालेगाव, वाशिम व रिसोड तालुक्याला दमदार पावसाची प्रतीक्षा.

वाशिम: मृग नक्षत्राच्या सुरुवातीला दांडी मारणार्‍या पावसाने शुक्रवारपासून कमी-अधिक प्रमाणात जिल्हय़ात हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला. पुरेशा प्रमाणात पाऊस झालेला नसतानाही शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केल्याचे दिसून येते. दुबार पेरणी टाळण्यासाठी समाधानकारक पावसानंतरच पेरणी करण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला. गत काही वर्षांंपासून निसर्गाची साथ मिळत नसल्याने, बळीराजाला विविध संकटांचा सामना करण्याची वेळ आली आहे. यावर्षी समाधानकारक पाऊस राहील, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मृग नक्षत्राला सुरुवात झाल्यानंतर, मानोरा तालुक्याचा अपवाद वगळता अन्य तालुक्यात पावसाने दडी मारली. ११ जून रोजी कमी-अधिक प्रमाणात जिल्हय़ात सर्वत्र पाऊस झाला. १७ जूनपासून जिल्हय़ात ढगाळ वातावरण आणि कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडत असल्याने मंगरुळपीर, मानोरा व कारंजा तालुक्यात शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केल्याचे चित्र आहे. दुबार पेरणीचा धोका टाळण्यासाठी, मान्सूनचा ७५ मिमी पाऊस झाल्यावर किंवा जमिनीत १४ ते १५ सेंमी खोलपर्यंंत ओलावा असेल तर पेरणी करणे अधिक फायदेशीर आहे, असा सल्ला कृषी विभागाने दिलेला आहे. जिल्ह्यात एकूण ५ लाख १३ हजार हेक्टर क्षेत्रांपैकी यावर्षी ४.३0 लाख हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणी होण्याचा अंदाज कृषी विभागाने बांधला आहे. मानोरा तालुक्याचा अपवाद वगळता उर्वरित तालुक्यात पावसाने अपेक्षित सरासरी गाठली नाही. रविवारी सायंकाळच्या सुमारास मानोरा, हातना, फुलउमरी व कारखेडा परिसरात जोरदार पाऊस झाला.