शहरं
Join us  
Trending Stories
1
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
2
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
3
इकडे PM मोदींचा सज्जड दम, तिकडे सांबा येथे दिसले संशयित ड्रोन; भारतीय सैन्याकडून कारवाई सुरू
4
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
5
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
6
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
7
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
8
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
9
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानने शरणागती पत्कारल्यानंतर भारताने युद्धविरामाला सहमती दर्शवली- फडणवीस
10
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
11
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
12
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
13
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
14
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
15
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
16
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
17
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
18
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
19
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार
20
Sharad Pawar: तिसरा देश काश्मीरवर बोलू शकत नाही, सिमला कराराबाबत शरद पवारांचे मोठे वक्तव्य

पिकांवर नांगर फिरविणाऱ्यांनी केली दुबार पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:37 IST

शासन धोरणाबाबत रोष: कालावधीच्या अखेरच्या टप्प्यात सोयाबीनवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : पावसाअभावी इरळा येथील उमेश बालकिसन लाहोटी या शेतकऱ्यासह आठ ते दहा शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिके निघालेच नाही. त्यामुळे जवळपास १०० एकर शेतात काही प्रमाणात निघालेली पिके शेतकऱ्यांनी नांगर फिरवून पिक नष्ट केले होते. अखेर यातील तीन शेतकऱ्यांनी सोमवारी शेतात दुबार पेरणी केली, तर इतरांनीही पेरणीला प्रारंभ केला. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मालेगाव तालुक्यातील इरळासह इतर अनेक भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. इरळा येथे यंदा सुरुवातीपासूनच खूपा कमी पाऊस आहे. अनेक शेतकऱ्यांनी वेळ जाऊ नये म्हणून पावसाच्या आशेवर खरिपाची पेरणी केली; परंतु या भागात पाऊसच पडला नसल्याने पिकांची स्थिती अतिशय वाईट झाली. त्यात उमेश बालकिसन लाहोटी यांच्या १० एकर शेतात. पवन नंदकिशोर लाहोटी यांच्या १० व बालविकास लाहोटी यांच्या ५ एकर शेतात पेरणी केलेले सोयाबीन पिक काही ठिकाणी निघाले तर काही ठिकाणी निघालेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपल्या २५ एकर शेतातील पिकेट ट्रॅक्टर चालवून तोडली आहे. अशीच परिस्थिती या गावातील डिगांबर, रामेश्वर अवचार, गुलाब ठाकरे, भगवान सखाराम ठाकरे, सत्य नारायण लाहोटी, विजय लाहोटी, सागर लाहोटी, या शेतकऱ्यांवरही ओढवली होती. या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिक कमी प्रमाणात निघाल्याने मोडल्याशिवाय गत्यावर नाही. पावसाअभावी पेरलेली पिके निघाली नाही. त्यामुळे पावसाची प्रतिक्षा करून निराश झालेल्या या शेतकऱ्यांनी शेतात नांगर फिरवून ही पिके नष्ट करीत जमीन साफ केली. त्यानंतरही दोन चार दिवस पाऊस न पडल्यामुळे पेरणीची वेळ निघून जात असल्याने हे शेतकरी चिंताग्रस्त होते. पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या पेरणीच्या वेळ निघून जाण्याची स्थिती आली असताना शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पडिक राहण्याची भिती निर्माण झाली होती. या शेतकऱ्यांनी निराशेने पिकांवर नांगर फि रविल्यानंतर उमेश लाहोटीसह काही शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन आपल्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटाची माहिती शेतकऱ्यांना देत नांगरलेलया पिकांची नोंद करण्याची मागणी केली असता अशा स्थितीचा सर्व्हे करण्याचा शासनाचा आदेश नसल्याचे तहसीलदारांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे. अशा स्थितीत हरळा येथील अनेक शेतकरी हे पावसाअभावी आर्थिक संकटात सापडले आणि या नुकसानीचा शासनाने सर्वे करुन मदत करावी अशी मागणी उमेश लाहोटीसह इतर शेतकऱ्यांनी केली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. शासन, प्रशासनाकडून पूर्णपणे निराश झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसानंतर सोमवारी आपल्या शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली. प्रशासनाकडून दिलासा मिळालाच नाही! अपुऱ्या पावसामुळे पेरलेले निम्म्याहून अधिक बियाणे उगवले नसल्याने उत्पादन होण्याची सूतराम शक्यता नसल्याने इरळा परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांची नांगराने मोडणी करून, या संदर्भात तहसीलदारांकडे पाहणी करण्याची आणि नोंद घेण्यासह आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली; परंतु त्यांच्या मागणीचा कोणताही परिणाम झाला नाही. नैसर्गिक आपत्तीचे निकष पुढे करून अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीला फेटाळून लावले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाच नाही.