शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

पिकांवर नांगर फिरविणाऱ्यांनी केली दुबार पेरणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2017 00:37 IST

शासन धोरणाबाबत रोष: कालावधीच्या अखेरच्या टप्प्यात सोयाबीनवर भर

लोकमत न्यूज नेटवर्कमालेगाव : पावसाअभावी इरळा येथील उमेश बालकिसन लाहोटी या शेतकऱ्यासह आठ ते दहा शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिके निघालेच नाही. त्यामुळे जवळपास १०० एकर शेतात काही प्रमाणात निघालेली पिके शेतकऱ्यांनी नांगर फिरवून पिक नष्ट केले होते. अखेर यातील तीन शेतकऱ्यांनी सोमवारी शेतात दुबार पेरणी केली, तर इतरांनीही पेरणीला प्रारंभ केला. निसर्गाच्या लहरीपणाचा फटका मालेगाव तालुक्यातील इरळासह इतर अनेक भागातील शेतकऱ्यांना बसला आहे. इरळा येथे यंदा सुरुवातीपासूनच खूपा कमी पाऊस आहे. अनेक शेतकऱ्यांनी वेळ जाऊ नये म्हणून पावसाच्या आशेवर खरिपाची पेरणी केली; परंतु या भागात पाऊसच पडला नसल्याने पिकांची स्थिती अतिशय वाईट झाली. त्यात उमेश बालकिसन लाहोटी यांच्या १० एकर शेतात. पवन नंदकिशोर लाहोटी यांच्या १० व बालविकास लाहोटी यांच्या ५ एकर शेतात पेरणी केलेले सोयाबीन पिक काही ठिकाणी निघाले तर काही ठिकाणी निघालेले नाही. त्यामुळे या शेतकऱ्यांनी आपल्या २५ एकर शेतातील पिकेट ट्रॅक्टर चालवून तोडली आहे. अशीच परिस्थिती या गावातील डिगांबर, रामेश्वर अवचार, गुलाब ठाकरे, भगवान सखाराम ठाकरे, सत्य नारायण लाहोटी, विजय लाहोटी, सागर लाहोटी, या शेतकऱ्यांवरही ओढवली होती. या शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन पिक कमी प्रमाणात निघाल्याने मोडल्याशिवाय गत्यावर नाही. पावसाअभावी पेरलेली पिके निघाली नाही. त्यामुळे पावसाची प्रतिक्षा करून निराश झालेल्या या शेतकऱ्यांनी शेतात नांगर फिरवून ही पिके नष्ट करीत जमीन साफ केली. त्यानंतरही दोन चार दिवस पाऊस न पडल्यामुळे पेरणीची वेळ निघून जात असल्याने हे शेतकरी चिंताग्रस्त होते. पावसाचा पत्ताच नाही. त्यामुळे सोयाबीन पिकाच्या पेरणीच्या वेळ निघून जाण्याची स्थिती आली असताना शेतकऱ्यांच्या शेतजमिनी पडिक राहण्याची भिती निर्माण झाली होती. या शेतकऱ्यांनी निराशेने पिकांवर नांगर फि रविल्यानंतर उमेश लाहोटीसह काही शेतकऱ्यांनी तहसीलदारांची भेट घेऊन आपल्यावर ओढवलेल्या आर्थिक संकटाची माहिती शेतकऱ्यांना देत नांगरलेलया पिकांची नोंद करण्याची मागणी केली असता अशा स्थितीचा सर्व्हे करण्याचा शासनाचा आदेश नसल्याचे तहसीलदारांनी शेतकऱ्यांना सांगितले आहे. अशा स्थितीत हरळा येथील अनेक शेतकरी हे पावसाअभावी आर्थिक संकटात सापडले आणि या नुकसानीचा शासनाने सर्वे करुन मदत करावी अशी मागणी उमेश लाहोटीसह इतर शेतकऱ्यांनी केली; परंतु त्याची दखल घेण्यात आली नाही. शासन, प्रशासनाकडून पूर्णपणे निराश झालेल्या शेतकऱ्यांनी अखेर दोन दिवसांपूर्वी पडलेल्या पावसानंतर सोमवारी आपल्या शेतात सोयाबीन पिकाची पेरणी केली. प्रशासनाकडून दिलासा मिळालाच नाही! अपुऱ्या पावसामुळे पेरलेले निम्म्याहून अधिक बियाणे उगवले नसल्याने उत्पादन होण्याची सूतराम शक्यता नसल्याने इरळा परिसरातील शेतकऱ्यांनी पिकांची नांगराने मोडणी करून, या संदर्भात तहसीलदारांकडे पाहणी करण्याची आणि नोंद घेण्यासह आर्थिक मदतीसाठी पाठपुरावा करण्याची मागणी केली; परंतु त्यांच्या मागणीचा कोणताही परिणाम झाला नाही. नैसर्गिक आपत्तीचे निकष पुढे करून अधिकाऱ्यांनी त्यांच्या मागणीला फेटाळून लावले. त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळालाच नाही.