शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही इन्कम टॅक्सकडून आलोय…’’, सांगलीत वॉरंट दाखवत डॉक्टरच्या घरातील कोट्यवधीचा ऐवज लुटला 
2
"हा तर 'पोपटवाडी' संघ..."; IND vs PAK सामन्यानंतर सुनील गावसकरांनी उडवली पाकिस्तानची खिल्ली
3
निसर्गाचा प्रकोप! डेहरादूनमध्ये ढगफुटीमुळे विध्वंस; सहस्त्रधारा, तपकेश्वरचे धडकी भरवणारे Video
4
वारंवार हल्ले करणाऱ्या कुत्र्यांना जन्मठेप होणार! उत्तर प्रदेश सरकारने घेतला मोठा निर्णय
5
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी आमदार निर्मला ठोकळ यांचे निधन 
6
जळगाव जिल्ह्यात ढगफुटी? गावांमध्ये शिरले पुराचे पाणी; लोकांनी रात्र काढली जागून, शाळांना सुट्टी
7
Pitru Paksha 2025: पितृपक्षात कसे केले जाते दशमी श्राद्ध? वाचा महत्त्व, मुहूर्त आणि श्राद्धविधी!
8
दुकानं-बस वाहून गेल्या, सगळीकडे पाणीच पाणी! हिमाचलच्या मंडीमध्ये पावसामुळे हाहाकार; ३ जणांचा मृत्यू
9
१७ वर्षाच्या मुलीला अजूनही मासिक पाळी आली नाही; तपासणी करताच वेगळेच सत्य उघड, डॉक्टरही हैराण
10
Post Office च्या ५ जबरदस्त स्कीम्स; छोट्या बचतीत मोठा फायदा, यापैकी दोन महिलांसाठी खास
11
अभिनेत्री हुमा कुरेशीने गुपचूप उरकला साखरपुडा, खाजगी समारंभातील फोटो आला समोर
12
आता कॅश काढण्यासाठी ATM ची गरज नाही! स्मार्टफोनने काढता येणार १०००० रुपये; कुठे मिळणार सुविधा?
13
Nashik: नाशिकमधील एका खाजगी शाळेला बॉम्बने उडवण्याची धमकी!
14
यूपीआयवरून रोज करा दहा लाखांचे पेमेंट; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी फायदा
15
पितृपक्ष २०२५: एखादी व्यक्ती हरवली आणि अनेक वर्षं सापडलीच नाही तर तिचेही श्राद्ध करतात का?
16
शेअर बाजारात पुन्हा तेजी, Sensex ८१,८२० च्या जवळ; निफ्टीही ग्रीन झोनमध्ये, 'या' स्टॉक्समध्ये तेजी
17
गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी! सेन्सेक्सला मागे टाकत सोन्याने दिला तब्बल ५०.१ टक्के परतावा
18
Dashavatar: 'दशावतार'च्या टीमकडून खास सरप्राइज, फक्त ९९ रुपये केलं सिनेमाचं तिकीट, प्रेक्षक म्हणाले- "तिकीट कमी करू नका..."
19
पश्चात्ताप! निळ्या रंगाच्या 'ड्रम'कांडमुळे जेलमध्ये गेलेल्या आरोपी साहिलच्या आयुष्याला नवी कलाटणी
20
Siddharth Shinde: सर्वोच्च न्यायालयातील वकील सिद्धार्थ शिंदे यांचे ह्रदयविकाराने निधन, दिल्लीत घेतला अखेरचा श्वास

वाशिम जिल्ह्यात दीड लाख हेक्टरवर पेरणी

By admin | Updated: July 19, 2014 01:06 IST

अपेक्षीत ४ लाख हेक्टर क्षेत्रापैकी केवळ १ लाख ५५ हजार हेक्टरवर क्षेत्रावर खरीपाची पेरणी आटोपली आहे.

संतोष मुंढे / वाशिम

चालू खरीप हंगामात अपेक्षीत ४ लाख २६ हजार ५९0 हेक्टर क्षेत्रापैकी १७ जूलैपर्यंत केवळ १ लाख ५५ हजार ४७२ हेक्टरवर अर्थात ३६ टक्के क्षेत्रावर खरी पाची पेरणी आटोपली आहे. दरदिवशी ढगांची आकाशात गर्दी दिसत असली तरी जिल्ह्याच्या बहूतांश भागात पेरणीयोग्य पाउसच झाला नसल्याने पेरणीतील गतीरोध कायम आहे. जिल्हाभरातील शेतकर्‍यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. चालू वर्षी अर्थात २0१४-१५ मध्ये पेरणीच्या अपेक्षीत नियोजनानुसार कृषी विभागाला ४ लाख २६ हजार ५९0 हेक्टरवर खरीपाची पेरणी होणे अपेक्षीत होते. आजतागायत १ लाख ५५ हजार ४७२ हेक्टर क्षेत्रावर म्हणजे अपेक्षीत क्षेत्राच्या सरासरी जवळपास ३६ टक्केच पेरण्या आजतागायत आटोपल्या आहेत. पेरणी झालेल्या क्षेत्रामध्ये वाशिम तालूक्यातील २१ हजार ९६ हेक्टर, मानोरा तालूक्या तील १८ हजार ४८३, रिसोड तालूक्यातील ५६ हजार १६४ हेक्टर, मंगरुळपीर तालूक्यातील १९ हजार ५१0 हेक्टर, मालेगाव तालूक्यातील २९ हजार ९३ हेक्टर तर कारंजा तालूक्यातील ११ हजार १२६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. आजवर झालेल्या पेरणीत शेतकर्‍यांनी ज्वारी, बाजरी, मका, इतर तृणधाण्य, तूर, मुग, उडीद, इतर कडधान्य, तीळ, सोयाबीन, इतर गळीतधान्य, कपाशी व उस आदी पिकांना कमी अधिक प्रमाणात प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात सर्वाधीक पेरा अर्थात सोयाबीनचा झाला असून अपेक्षीत २ लाख तेरा हजार ९९0 हेक्टर क्षेत्रापैकी अध्र्याअधिक क्षेत्रावर १ लाख २0 हजार ६८९ हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली आहे. त्यापाठोपाठ तूरीचा १९ हजार ३९ हेक्टरवर तर कपाशिचा १0 हजार ६६५ हेक्टरवर पेरा झाला आहे. १७ जूलैपर्यंतची ही आकडेवारी पेरणी झाल्याचे दर्शवित असले तरी पिकासाठी व राहिलेल्या पेरणीसाठी आवश्यक असलेला पाउस मात्र कमालीचा रुसुन बसला आहे. गत २४ तासात जिल्ह्यातील सहा तालूक्यांपैकी केवळ कारंजाच्या २.८ मिलीमिटर पावसाची नोंद वगळता इतर पाच तालूके कोरडेच आहेत. गतवर्षी १८ जूलैपर्यंत जिल्ह्यात ३ हजार ७७७ मिलिमिटर पावसाची नोंद झाली होती. यावेळचा पाउस मात्र कमालीचा दडी मारुन बसला असून जिल्ह्यात आजतागायत केवळ ६७६.९0 मिलिमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यातही कोण त्याही तालूक्याची पावासाची सरासरी १२७ मिलीमिटरच्या पूढे सरकली नसून सर्वात कमी ८१.७0 मिलीमिटर पावसाची नोंद मानोरा तालूक्यात झाली आहे. वाशीम १२५ मिमी, मालेगाव १२५ मिमी, रिसोड १२६ मिमी तर कारंजा तालूक्यात आजतागायत १२७.८0 मिलीमिटर पावसाची नोंद करण्यात आली आहे.