शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

चार किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर माती, खड्डे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 04:33 IST

मानोरा तालुक्यातील म्हसणी या गावाला कारंजा-मानोरा या मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी इंझोरी-म्हसणीदरम्यान चार किलोमीटर अंतराच्या डांबरी रस्त्याची निर्मिती करण्यात आली ...

मानोरा तालुक्यातील म्हसणी या गावाला कारंजा-मानोरा या मुख्य रस्त्याशी जोडण्यासाठी इंझोरी-म्हसणीदरम्यान चार किलोमीटर अंतराच्या डांबरी रस्त्याची निर्मिती करण्यात आली आहे. या रस्त्यामुळे इंझोरी आणि म्हसणी येथील ग्रामस्थांनाही दळणवळणाची चांगली सुविधा उपलब्ध झाली. या मार्गावरून दुचाकी, ऑटोरिक्षा, ट्रॅक्टरसह मालवाहू वाहनांची वर्दळ नेहमीच सुरू असते. प्रामुख्याने ग्रामीण भागातून शहरात विविध कामानिमित्त येणारे ग्रामस्थ आणि शेतमालाची बाजारात विक्री करण्यासाठी शेतक-यांची अनेक वाहने धावतात. या रस्त्याशिवाय म्हसणी गावाला कारंजा-मानोरा रस्त्याशी जोडणारा दुसरा कुठलाही रस्ता नाही. त्यामुळे या रस्त्याची स्थिती चांगली असणे आवश्यक असताना सद्यस्थितीत या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे नाहीसे झाले असून, जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांना वाहन चालविण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. खड्डे चुकवून वाहन पुढे न्यावे लागते. त्यात रस्त्यावर पसरलेल्या मातीमुळे धुळीचे लोट हवेत पसरून चालक, प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागतो.

---------------

तीन वर्षांपूर्वीच झाली होती दुरुस्ती

साधारण २० वर्षांपूर्वी इंझोरी-म्हसणी रस्त्याचे नूतनीकरण करण्यात आले होते. त्यानंतर गेल्या काही वर्षांपूर्वी या रस्त्याची दुर्दशा झाल्याने बांधकाम विभागाकडून तीन वर्षांपूर्वी पुन्हा या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. तथापि, अवघ्या तीन वर्षांच्या काळातच या रस्त्यावरील डांबर नाहीसे होऊन खड्डे पडले आहेत. त्यामुळे चालकांसह, प्रवाशांना त्रास सहन करावा लागत असल्याने या रस्ता कामाच्या दर्जाबाबतही प्रश्न उपस्थित होत आहे.

===Photopath===

080121\08wsm_3_08012021_35.jpg

===Caption===

चार किलोमीटर अंतराच्या रस्त्यावर माती, खड्डे