शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

दमदार पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीत किंचित वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:28 IST

जवळपास ४० वर्षांपूर्वी काजळेश्वरनजीक मोऱ्हळ येथे उभारलेल्या प्रकल्पावर उकर्डा, पानगव्हाण, काजळेश्वरसह इतर काही गावांतील शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेतीचे सिंचन ...

जवळपास ४० वर्षांपूर्वी काजळेश्वरनजीक मोऱ्हळ येथे उभारलेल्या प्रकल्पावर उकर्डा, पानगव्हाण, काजळेश्वरसह इतर काही गावांतील शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेतीचे सिंचन अवलंबून आहे. गत काही वर्षांत पावसाच्या अनियमिततेमुळे मोऱ्हळ प्रकल्प पूर्णपणे भरू शकला नाही, परंतु मागील दोन वर्षांत या प्रकल्पांत चांगला जलसाठा झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा आधार मिळाला होता. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या प्रमुख पिकांसह मका आणि भाजीपाला पिकांचेही उत्पादन या प्रकल्पाच्या आधारे शेतकऱ्यांनी घेतले. काही शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या भरवशावर फळपिकांचेही उत्पादन घेतले आहे, तर पावसाचा खंड पडल्यानंतर खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठीही शेतकरी या प्रकल्पातील पाण्याचा आधार घेतात. आता यंदाही दमदार पावसामुळे पहिल्याच प्रकल्पाची पातळी वाढली आहे. त्यामुळे हा प्रकल्प शंभर टक्के भरण्याची आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळेच शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस पडल्यास पावसाळा संपण्यापूर्वीच हा प्रकल्प काठोकाठ भरण्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.