शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

दमदार पावसामुळे प्रकल्पांच्या पातळीत किंचित वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:28 IST

जवळपास ४० वर्षांपूर्वी काजळेश्वरनजीक मोऱ्हळ येथे उभारलेल्या प्रकल्पावर उकर्डा, पानगव्हाण, काजळेश्वरसह इतर काही गावांतील शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेतीचे सिंचन ...

जवळपास ४० वर्षांपूर्वी काजळेश्वरनजीक मोऱ्हळ येथे उभारलेल्या प्रकल्पावर उकर्डा, पानगव्हाण, काजळेश्वरसह इतर काही गावांतील शेकडो हेक्टर क्षेत्रातील शेतीचे सिंचन अवलंबून आहे. गत काही वर्षांत पावसाच्या अनियमिततेमुळे मोऱ्हळ प्रकल्प पूर्णपणे भरू शकला नाही, परंतु मागील दोन वर्षांत या प्रकल्पांत चांगला जलसाठा झाल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी मोठा आधार मिळाला होता. रब्बी हंगामातील गहू, हरभरा या प्रमुख पिकांसह मका आणि भाजीपाला पिकांचेही उत्पादन या प्रकल्पाच्या आधारे शेतकऱ्यांनी घेतले. काही शेतकऱ्यांनी या प्रकल्पाच्या भरवशावर फळपिकांचेही उत्पादन घेतले आहे, तर पावसाचा खंड पडल्यानंतर खरीप हंगामातील पिके वाचविण्यासाठीही शेतकरी या प्रकल्पातील पाण्याचा आधार घेतात. आता यंदाही दमदार पावसामुळे पहिल्याच प्रकल्पाची पातळी वाढली आहे. त्यामुळे हा प्रकल्प शंभर टक्के भरण्याची आणि शेतकऱ्यांना सिंचनासाठी मुबलक पाणी उपलब्ध होण्याची आशा निर्माण झाली आहे. त्यामुळेच शेतकरीवर्गात समाधानाचे वातावरण आहे. येत्या काही दिवसांत दमदार पाऊस पडल्यास पावसाळा संपण्यापूर्वीच हा प्रकल्प काठोकाठ भरण्याचा विश्वास शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे.