शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

साहेब, रुग्णालयात जातोय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 04:39 IST

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवार व रविवार अशा दोन दिवसांत वीकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. या ...

वाशिम : कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवार व रविवार अशा दोन दिवसांत वीकेंड लॉकडाऊनची अंमलबजावणी करण्यात आली. या दोन दिवसांत रुग्णालयात जातोय, मेडिकलला जातोय, अशी तीच ती कारणे देऊन वाहनचालक रस्त्यावर आल्याचे दिसून आले. गत दोन दिवसांत ४५० जणांना दोन लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

राज्यात कोरोनाचा कहर सुरूच असल्याने सर्वांचीच चिंता वाढली आहे. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने निर्बंध कठोर केले आहेत. अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित दुकाने बंद ठेवण्यात आली, तर शनिवार व रविवार असा दोन दिवस वीकेंड लॉकडाऊन लागू करण्यात आला. अत्यावश्यक कामाशिवाय कुणीही घराबाहेर पडू नये, असे आवाहन जिल्हा प्रशासन व पोलीस विभागाने केलेले असतानाही, अनेकजण घराबाहेर पडले. वाशिम शहरासह रिसोड, मानोरा, कारंजा, मंगरूळपीर, मालेगाव येथे विनाकारण घराबाहेर पडणाºया वाहनचालकांना पोलिसांनी अडविले. यावेळी साहेब, रुग्णालयात जातोय, मेडिकलला जातोय, अशी तीच ती कारणे वाहनचालकांनी सांगितली. अनेकजण चुकीची कारणे सांगत असल्याचे लक्षात आल्याने जवळपास ४५० जणांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

०००

बॉक्स

शनिवारी २७६ जणांवर कारवाई

शुक्रवारी रात्री ८ वाजतापासून वीकेंड लॉकडाऊनला सुरुवात झाली. शनिवारी अत्यावश्यक सेवेची दुकाने वगळता उर्वरित बाजारपेठ बंद होती. दरम्यान, अत्यावश्यक काम नसतानाही अनेकजण घराबाहेर पडले. वाशिम शहरात स्थानिक पाटणी चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, पुसद नाका येथे विनाकारण फिरणाऱ्या वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. जिल्ह्यात २७६ जणांवर कारवाई झाली.

०००

रविवारी १७४ जणांवर कारवाई

वीकेंड लॉकडाऊनच्या शेवटच्यादिवशी अर्थात रविवारीदेखील दिवसभर कारवाईची मोहीम राबविण्यात आली. वाशिम शहरासह रिसोड, कारंजा, मानोरा, मंगरूळपीर, मालेगाव येथे विनाकारण दुचाकीने फिरणाऱ्या जवळपास १७४ जणांवर दंडात्मक कारवाई केली.

०००

बाहेर येणाऱ्यांची कारणे सारखीच

घराबाहेर पडताना सर्वांनीच नातेवाईक रुग्णालयात आहेत, त्यांना भेटण्यासाठी व औषधे घेऊन जात आहे, रुग्णालयात जात आहे, मेडिकलमध्ये जात आहे, अशी तीच ती कारणे सांगितली. या कारणांची खात्री पोलिसांनी केली. जे खरोखरच मेडिकल किंवा रुग्णालयात जात होते, त्यांना सोडून देण्यात आले, तर ज्यांनी चुकीचे कारण सांगितले त्यांना कारवाईला सामोरे जावे लागले.

००००