शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

श्रावणातला ‘उपवास’ जैसे थे; शेंगदाणे, साबुदाणा किंमतीत वाढ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:45 IST

वाशिम : पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून, या काळात शक्यतोवर उपवासाच्या पदार्थांना मागणी असल्याने किमतीत वाढ होते. ...

वाशिम : पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून, या काळात शक्यतोवर उपवासाच्या पदार्थांना मागणी असल्याने किमतीत वाढ होते. यंदा मागणी वाढली असली तरी शेंगदाणा, साबुदाण्याच्या किमती मात्र स्थिर असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.

श्रावण महिन्यात श्रद्धेपोटी मोठ्या संख्येने भाविक उपवास ठेवतात. ऐन सणासुदीच्या काळात महागाई डोके वर काढते. उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढताच, किमतीचा भडका उडतो. यंदा सर्वच पदार्थांच्या किमतींत वाढ झाली. श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वीच शेंगदाणा, साबुदाणा, भगर आदींच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे श्रावण महिन्यात या पदार्थांच्या किमतीत आणखी वाढ झाली नसल्याचे किराणा व्यावसायिकांनी सांगितले. उपवासाचे पदार्थ म्हणून साबुदाणा, शेंगदाणा, भगर, आदी पदार्थांना मागणी वाढली आहे. श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वी साबुदाणा प्रतिकिलो ५५ रुपये, तर शेंगदाणा प्रतिकिलो १०५ रुपये असे दर होते. तिसरा श्रावण सोमवार उलटल्यानंतरही या किमतीत कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे.

००००००००००००००००

असे आहेत दर (प्रतिकिलो)

श्रावणाआधीचे दर आताचे दर

साबुदाणा ५५ ५५

शेंगदाणा १०५ १०५

००००००००००००००००

मागणी वाढली, किमती स्थिर

साबुदाणा

उपवासाच्या पदार्थांत साबुदाणाला विशेष महत्त्व आहे. साबुदाण्यात शरीरासाठी आवश्यक असणारे पोषणमूल्य अतिशय कमी आहे. साबुदाण्यात मोठ्या प्रमाणात कर्बोदकं असतात; तर अतिशय अल्प प्रमाणात प्रथिने असतात. असे असले तरी उपवासात आताही साबुदाण्याला सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येते. मागणी वाढली असली तरी दर मात्र स्थिर आहेत.

००००

शेंगदाणा

उपवासाच्या पदार्थात शेंगदाण्याचादेखील वापर केला जातो. शेंगदाण्यालादेखील मागणी आहे. मागणी वाढल्याने काही प्रमाणात आवक जरी घटली असली तरी किमतीत मात्र काही फरक पडला नाही. श्रावणाआधी असलेले दर आताही तेच कायम आहेत. मात्र भाविकांना दिलासा मिळत आहे.

००००००००००००

भगरीचे दरही स्थिर

श्रावण महिन्यात उपवासाच्या पदार्थांत भगरीलादेखील पसंती असते. श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वी भगरीचे दर प्रतिकिलो १०५ रुपये असे होते. श्रावण महिन्याला सुरुवात होऊन १७ दिवसांचा कालावधी उलटला आहे. तथापि, भगरीचे दर वाढले नाहीत. मागणी वाढलेली असतानाही श्रावणात भगरीचे दर प्रतिकिलो १०५ असेच आहेत.

००००००००००००००

मागणी वाढली

कोट

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढते. श्रावणात शक्यतोवर उपवासाच्या पदार्थांच्या किमतींत वाढ होते. यंदा श्रावणाआधी आणि आता असलेल्या उपवासाच्या पदार्थांच्या किमतींत वाढ झाली नसल्याचे दिसून येते. शेंगदाणा, साबुदाणा, भगरीचे दर जैसे थे आहेत.

- निशांत राठी, किराणा व्यापारी