शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

श्रावणातला ‘उपवास’ जैसे थे; शेंगदाणे, साबुदाणा किंमतीत वाढ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:45 IST

वाशिम : पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून, या काळात शक्यतोवर उपवासाच्या पदार्थांना मागणी असल्याने किमतीत वाढ होते. ...

वाशिम : पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून, या काळात शक्यतोवर उपवासाच्या पदार्थांना मागणी असल्याने किमतीत वाढ होते. यंदा मागणी वाढली असली तरी शेंगदाणा, साबुदाण्याच्या किमती मात्र स्थिर असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.

श्रावण महिन्यात श्रद्धेपोटी मोठ्या संख्येने भाविक उपवास ठेवतात. ऐन सणासुदीच्या काळात महागाई डोके वर काढते. उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढताच, किमतीचा भडका उडतो. यंदा सर्वच पदार्थांच्या किमतींत वाढ झाली. श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वीच शेंगदाणा, साबुदाणा, भगर आदींच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे श्रावण महिन्यात या पदार्थांच्या किमतीत आणखी वाढ झाली नसल्याचे किराणा व्यावसायिकांनी सांगितले. उपवासाचे पदार्थ म्हणून साबुदाणा, शेंगदाणा, भगर, आदी पदार्थांना मागणी वाढली आहे. श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वी साबुदाणा प्रतिकिलो ५५ रुपये, तर शेंगदाणा प्रतिकिलो १०५ रुपये असे दर होते. तिसरा श्रावण सोमवार उलटल्यानंतरही या किमतीत कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे.

००००००००००००००००

असे आहेत दर (प्रतिकिलो)

श्रावणाआधीचे दर आताचे दर

साबुदाणा ५५ ५५

शेंगदाणा १०५ १०५

००००००००००००००००

मागणी वाढली, किमती स्थिर

साबुदाणा

उपवासाच्या पदार्थांत साबुदाणाला विशेष महत्त्व आहे. साबुदाण्यात शरीरासाठी आवश्यक असणारे पोषणमूल्य अतिशय कमी आहे. साबुदाण्यात मोठ्या प्रमाणात कर्बोदकं असतात; तर अतिशय अल्प प्रमाणात प्रथिने असतात. असे असले तरी उपवासात आताही साबुदाण्याला सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येते. मागणी वाढली असली तरी दर मात्र स्थिर आहेत.

००००

शेंगदाणा

उपवासाच्या पदार्थात शेंगदाण्याचादेखील वापर केला जातो. शेंगदाण्यालादेखील मागणी आहे. मागणी वाढल्याने काही प्रमाणात आवक जरी घटली असली तरी किमतीत मात्र काही फरक पडला नाही. श्रावणाआधी असलेले दर आताही तेच कायम आहेत. मात्र भाविकांना दिलासा मिळत आहे.

००००००००००००

भगरीचे दरही स्थिर

श्रावण महिन्यात उपवासाच्या पदार्थांत भगरीलादेखील पसंती असते. श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वी भगरीचे दर प्रतिकिलो १०५ रुपये असे होते. श्रावण महिन्याला सुरुवात होऊन १७ दिवसांचा कालावधी उलटला आहे. तथापि, भगरीचे दर वाढले नाहीत. मागणी वाढलेली असतानाही श्रावणात भगरीचे दर प्रतिकिलो १०५ असेच आहेत.

००००००००००००००

मागणी वाढली

कोट

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढते. श्रावणात शक्यतोवर उपवासाच्या पदार्थांच्या किमतींत वाढ होते. यंदा श्रावणाआधी आणि आता असलेल्या उपवासाच्या पदार्थांच्या किमतींत वाढ झाली नसल्याचे दिसून येते. शेंगदाणा, साबुदाणा, भगरीचे दर जैसे थे आहेत.

- निशांत राठी, किराणा व्यापारी