शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

श्रावणातला ‘उपवास’ जैसे थे; शेंगदाणे, साबुदाणा किंमतीत वाढ नाही!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:45 IST

वाशिम : पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून, या काळात शक्यतोवर उपवासाच्या पदार्थांना मागणी असल्याने किमतीत वाढ होते. ...

वाशिम : पवित्र अशा श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून, या काळात शक्यतोवर उपवासाच्या पदार्थांना मागणी असल्याने किमतीत वाढ होते. यंदा मागणी वाढली असली तरी शेंगदाणा, साबुदाण्याच्या किमती मात्र स्थिर असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे.

श्रावण महिन्यात श्रद्धेपोटी मोठ्या संख्येने भाविक उपवास ठेवतात. ऐन सणासुदीच्या काळात महागाई डोके वर काढते. उपवासाच्या पदार्थांना मागणी वाढताच, किमतीचा भडका उडतो. यंदा सर्वच पदार्थांच्या किमतींत वाढ झाली. श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वीच शेंगदाणा, साबुदाणा, भगर आदींच्या किमतींत वाढ झाली होती. त्यामुळे श्रावण महिन्यात या पदार्थांच्या किमतीत आणखी वाढ झाली नसल्याचे किराणा व्यावसायिकांनी सांगितले. उपवासाचे पदार्थ म्हणून साबुदाणा, शेंगदाणा, भगर, आदी पदार्थांना मागणी वाढली आहे. श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वी साबुदाणा प्रतिकिलो ५५ रुपये, तर शेंगदाणा प्रतिकिलो १०५ रुपये असे दर होते. तिसरा श्रावण सोमवार उलटल्यानंतरही या किमतीत कोणतीही वाढ झाली नाही. त्यामुळे भाविकांसह सर्वसामान्य नागरिकांना दिलासा मिळत आहे.

००००००००००००००००

असे आहेत दर (प्रतिकिलो)

श्रावणाआधीचे दर आताचे दर

साबुदाणा ५५ ५५

शेंगदाणा १०५ १०५

००००००००००००००००

मागणी वाढली, किमती स्थिर

साबुदाणा

उपवासाच्या पदार्थांत साबुदाणाला विशेष महत्त्व आहे. साबुदाण्यात शरीरासाठी आवश्यक असणारे पोषणमूल्य अतिशय कमी आहे. साबुदाण्यात मोठ्या प्रमाणात कर्बोदकं असतात; तर अतिशय अल्प प्रमाणात प्रथिने असतात. असे असले तरी उपवासात आताही साबुदाण्याला सर्वाधिक पसंती असल्याचे दिसून येते. मागणी वाढली असली तरी दर मात्र स्थिर आहेत.

००००

शेंगदाणा

उपवासाच्या पदार्थात शेंगदाण्याचादेखील वापर केला जातो. शेंगदाण्यालादेखील मागणी आहे. मागणी वाढल्याने काही प्रमाणात आवक जरी घटली असली तरी किमतीत मात्र काही फरक पडला नाही. श्रावणाआधी असलेले दर आताही तेच कायम आहेत. मात्र भाविकांना दिलासा मिळत आहे.

००००००००००००

भगरीचे दरही स्थिर

श्रावण महिन्यात उपवासाच्या पदार्थांत भगरीलादेखील पसंती असते. श्रावण महिन्याला सुरुवात होण्यापूर्वी भगरीचे दर प्रतिकिलो १०५ रुपये असे होते. श्रावण महिन्याला सुरुवात होऊन १७ दिवसांचा कालावधी उलटला आहे. तथापि, भगरीचे दर वाढले नाहीत. मागणी वाढलेली असतानाही श्रावणात भगरीचे दर प्रतिकिलो १०५ असेच आहेत.

००००००००००००००

मागणी वाढली

कोट

श्रावण महिन्याला सुरुवात झाल्यानंतर उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढते. श्रावणात शक्यतोवर उपवासाच्या पदार्थांच्या किमतींत वाढ होते. यंदा श्रावणाआधी आणि आता असलेल्या उपवासाच्या पदार्थांच्या किमतींत वाढ झाली नसल्याचे दिसून येते. शेंगदाणा, साबुदाणा, भगरीचे दर जैसे थे आहेत.

- निशांत राठी, किराणा व्यापारी