शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

टंचाईग्रस्त ११ गावांना मिळाली जलसंजीवनी

By admin | Updated: April 7, 2015 02:08 IST

कमी खर्चात शाश्‍वत जलसंधारणाची सोय; भूजल सर्वेक्षण यंत्रणेचे यश.

सुनील काकडे / वाशिम: जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी अडविण्याकरिता भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सन २0१३-१४ मध्ये महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविला. याअंतर्गत पहिल्या टप्प्यात जिल्हय़ातील ११ गावे पाण्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण झाली आहेत. ह्यआपलं गाव आपलं पाणीह्ण, या नावाने भूजल सर्वेक्षण यंत्रणेने हाती घेतलेल्या या योजनेमुळे नेहमी टंचाईग्रस्त म्हणून गणल्या जाणार्‍या या गावांना नवसंजीवनी मिळाली आहे. वाशिम जिल्हय़ाची भूरचना दख्खनच्या पठारापासून तयार झालेली आहे. जिल्हय़ात पैनगंगा, पूस, अरुणावती, अडाण, बेंबळा या नद्या आहेत. असे असले तरी पैनगंगा ही मुख्य नदी बुलडाणा जिल्हय़ातून उगम पावून वाशिम जिल्हय़ातून पुढे वाहत जाते. उर्वरित नद्यांचा उगम येथून आहे; मात्र त्याचा जिल्हय़ातील सिंचनासाठी फारसा उपयोग होत नाही. जमिनीवर पडणारे पावसाचे पाणी साठविण्याकरिता जिल्हय़ात तुलनेने मोठे सिंचन प्रकल्प नाहीत. बेसाल्ट खडकाचे प्रमाण अधिक असल्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी पुढे वाहून जाते. या सर्व प्रतिकूल बाबींमुळेच जिल्हय़ातील शेकडो गावांमध्ये दरवर्षी पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य जाणवण्यासोबतच सिंचनाचाही गंभीर प्रश्न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन भूजल सर्वेक्षण यंत्रणेने सन २0१३-१४ मध्ये ह्यआपलं गाव आपलं पाणीह्ण ही नावीन्यपूर्ण योजना आखून सुदी, भोयता, कवठा खुर्द, सावरगाव फॉरेस्ट, गोंडेगाव, पिंपळशेंडा, साखरा, सावंगा, चिंचोली, चकवा, मसलापेन या ११ गावांमध्ये ह्यगॅबियनह्ण बंधारे तयार केले. यासाठी मानव विकास मिशनमधून १ कोटी, जिल्हा वार्षिक विकास निधीतून १ कोटी आणि विदर्भ वैधानिक विकास महामंडळाकडून ३0 लाख रुपये मंजूर झाले होते. प्रती बंधारा २0 लाख रुपये खचरून हे काम करण्यात आले. याअंतर्गत संबंधित गावांमध्ये उपलब्ध जागेवर एक ते दीड किलोमीटर अंतरावर ८ मीटर रुंद आणि ३ मीटर खोल ह्यगॅबियनह्ण पद्धतीचे बंधारे खोदण्यात आले. ठरावीक अंतरावर ३0 फूट, ६0 फूट आणि १00 फुटाचे बोअर खोदून जमिनीखालच्या खडकाला ब्लास्ट करण्यात आले. जमिनीच्या पोटातील खडकाच्या सांध्यात साठलेल्या पाण्याचे बाष्पीभवन होत नसल्याने ते जमिनीत अधिक काळ टिकून राहावे आणि परिसरातील विहिरींची पाणीपातळी वाढावी, या यामागील उद्देश होय. भूजल सर्वेक्षण यंत्रणेचा हा प्रयोग अकराही गावांमध्ये यशस्वी झाला आहे. यामुळे सदर गावांमधील विहिरी हातपंपांची पाणीपातळी वाढली असून, बंधार्‍यात साठलेल्या पाण्याचा सिंचनासाठीदेखील उपयोग झाला. सुदी या गावात सुमारे १00 ते १५0 एकर जमिनीला या बंधार्‍यामुळे पाणी मिळाले.