शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीवरून राजकीय रणकंदन, व्यावसायिक सुशील केडिया यांच्या ट्विटने वातावरण तापले
2
साेमनाथ सूर्यवंशीप्रकरणी पोलिसांवर गुन्हे दाखल करा; परभणीत कोठडीतील मृत्यू; खंडपीठाचे अंतरिम आदेश
3
कर्मचाऱ्यांना मिळणार ‘एनपीएस’प्रमाणे कर लाभ, ‘एकीकृत पेन्शन योजने’ला प्रोत्साहन देण्यासाठी निर्णय
4
मेडिकल कॉलेजांच्या भ्रष्टाचारातील दलालांचा सीबीआयकडून पर्दाफाश; एफआयआरमध्ये बड्या अधिकाऱ्यांसह ३४ नावे
5
सरकारी वकील बदलल्याबाबत प्रतिज्ञापत्र द्या, पायल तडवी आत्महत्या : हायकोर्टाचे सरकारला निर्देश
6
बारसे आटोपून निघाले, ‘समृद्धी’वर ४ ठार; सर्व मृत एकाच कुटुंबातील; चालकाची डुलकी जीवघेणी
7
वाहतूकदारांचा संप मागे; ८० टक्के मागण्या मान्य, ई-चलानचा दंड तसेच ९० दिवसांपेक्षा जास्त जुने चलानही रद्द
8
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
9
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
10
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
11
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
12
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
13
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
14
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
15
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
16
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
17
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
18
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
19
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
20
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र

४00 गावात बालसंरक्षण समित्यांचे गठण

By admin | Updated: August 28, 2015 00:12 IST

बालकांची सुरक्षा; ग्रामपंचायत अर्थसंकल्पात करावी लागणार ५ टक्के तरतूद.

वाशिम : महिलांसोबतच बालकांवरही वाढते अत्याचार रोखण्यासोबतच कायदेशीरदृष्ट्या बालकांच्या ह क्कांचे हनन होऊ नये यासाठी जिल्ह्यातील ४९३ पैकी ४00 ग्रामपंचायतीमध्ये ग्राम बालसंरक्षण समित्या (व्हीलेज चाईल्ड प्रोटेक्शन कमिटी) गठीत करण्यात आल्या आहेत.बालकांचे वाढते लैंगिक शोषण, बालविवाह, भिक्षेकरी मुलांचे वाढते प्रमाण आणि बालमजुरीचा गंभीर बनू पाहणारा प्रश्न पाहता ग्रामपातळी अशी समिती गठीत करून बालकांच्या नैसर्गिक हक्कांचे हनन टळावे यासाठी या ग्राम बालसंरक्षण समित्या कार्यरत राहणार आहेत.इंटिग्रेटेड चाईल्ड प्रोटेक्शन स्कीमतंर्गत केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने शून्य ते १८ वयोगटातील बालकांची सुरक्षा व संवर्धन करण्याच्या दृष्टीकोणातून केंद्र सरकारने आखलेल्या धोरणाचा एक भाग म्हणून या समित्यांना ग्रामपातळीवर महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. जुलै २0१३ मध्ये काढण्यात आलेल्या परिपत्रकानुसार या समित्या गठीत करणे अनिवार्य होते. त्यासाठी तीन दिवसांचा कालावधी ठरवून दिला होता. मात्र बाल संरक्षण अधिकारी विभागाकडून स्मरणपत्रे देऊनही या समित्या स्थापन होण्यास बराच कालावधी लागला. दरम्यान, या ग्राम बालसंरक्षण समित्या आता ४00 गावात गठीत झाल्या मुळे जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत १५ टक्के असलेल्या शून्य ते १८ वयोगटातील मुलांच्या संरक्षणाच्या दृष्टीने एक महत्त्वाचे पाऊल उचलल्या गेले आहे. परिणामस्वरुप जिल्ह्यातील बालकांच्या नैसर्गिक न्याय हक्काचे तत्व तथा कायदेशीर मिळालेल्या हक्काचे हनन रोखण्यास जिल्हा प्रशासनास मोठी कसरत करावी लागणार आहे.अशी आहे ग्राम बाल संरक्षण समितीगावपातळीवर या समितीमध्ये शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ता, बचतगटातील महिला, १२ ते १८ वयोगटातील एक मुलगा, एक मुलगी, सरपंच, पोलिस पाटील, अंगणवाडी सेविका, अनुदानीत शाळेचे मुख्याध्यापक यांचा या समितीमध्ये समावेश आहे. सदस्य सचिव म्हणून समितीमध्ये अंगणवाडी सेविकेला स्थान आहे. वरील ग्राम बाल संरक्षण समिती बालकांची माहिती संकलीत करुन त्यांची काळजी घेणार आहेत.विकास पूनर्वसनाला महत्त्वया समितीच्या माध्यमातून बालकांच्या सर्वांंगिण विकासासोबतच पीडित, अन्यायग्रस्त बालकाचे त्याच्याच कुटूंबामध्ये योग्यपद्धतीने पूनर्वसन करणे, बालकांच्या विकासाचा आराखडा तयार करणे, दत्तक प्रावधान, बालगृहात ठेवणे किंवा एखाद्या ठिकाणी त्यांचे पूनर्वसन करून त्यांचे मुल्यमापन करण्याच्या दृष्टीने यामाध्यमातून शासनाने पुढाकार घेतला आहे. ६0 मुले अन्यायग्रस्त वाशिम जिल्यात शून्य ते १८ वयोगटातील ६0 मुलांना समस्या असल्याचे सध्याच्या पाहणीत आढळून आले आहे. यात काहींच्या पूनर्वसनाचा, संरक्षणाचा किंवा शिक्षण, अन्न, वस्त्रनिवार्‍याची समस्या आहे. त्यांच्या योग्य सुविधेसाठी सध्या बालसंरक्षण अधिकारी कक्षातर्फे प्रयत्न केले जात आहे.