शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

इंझोरी परिसरातील पाणंद रस्त्यांच्या कामाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:35 IST

इंझोरी: परिसरातील पाणंद रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने शेती वहिती करणे शेतकºयांसाठी कठीण झाले आहे. ही समस्या लक्षात घेत ...

इंझोरी: परिसरातील पाणंद रस्त्यांची अवस्था बिकट असल्याने शेती वहिती करणे शेतकºयांसाठी कठीण झाले आहे. ही समस्या लक्षात घेत जि.प. सदस्य विनादेवी जयस्वाल यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांच्यामार्फत शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे परिसरातील २४ पाणंद रस्त्यांच्या कामांना पालकमंत्री पाणंद रस्ता योजनेतून मंजुरी मिळाली आहे.

कुठल्याही शेतकऱ्यासाठी आणि कोणत्याही शिवारात वहिवाटीसाठी अतिशय महत्त्वाचा असतो तो पाणंद रस्ता. हा रस्ता चांगला नसला तर शेतीच्या कामांवर परिणाम होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होते. इंझोरी परिसरातील शेतकऱ्यांना याच समस्येचा सामना करावा लागत आहे. त्यात पावसाळ्याच्या दिवसांत, तर या रस्त्यांवर चिखल तयार होऊन दलदलसदृश स्थिती निर्माण होते. त्यामुळे गुडघाभर चिखलातून शेतकºयांना शेतात साहित्याचे नेआण करावी लागते. लोकमतने या संदर्भात वृत्त प्रकाशित करून प्रशासनासह लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधले. त्याची दखल घेत जि. प. सदस्य विनादेवी अजय जयस्वाल यांनी आमदार राजेंद्र पाटणी यांच्याकडे मागणी केल्याने पाटणी यांनी शासनाचे पालकमंत्री योजनेतून परिसरातील २४ या पाणंद रस्त्यांच्या कामांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे इंझोरी, अजनी, उंबर्डा लहान, म्हसणी, जामदरा, घोटी, दापुरा (खु), दापुरा ( बू), धानोरा भुसे, चौसाळा, मोहगव्हान, भोयणी, पारधी तांडा, चोंढी, पारवा आदी गावांतील पाणंद रस्ते आता मोकळा श्वास घेणार असून, शेतकऱ्यांची वहिवाट सुरळीत होणार आहे.

इंझोरी येथून उंबर्डा लहान गावाकडील शेतशिवारात जाण्यासाठी असलेल्या पाणंद रस्त्यावर सततच्या पावसामुळे दलदल तयार होते, शिवाय इतर दिवसांत माती निघून दगड उघडे पडतात. त्यामुळे शेती वहिवाट कठीण होते. याच रस्त्यावर शेकडो शेतकऱ्यांची शेती आहे. आता या रस्त्याच्या कामाला मंजुरी मिळाली असून, हे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी आहे.

-गजानन लाहोरे,

शेतकरी, उंबर्डा

गावातील स्मशानभूमीपासून पुढे घोटीकडील शिवारात जाण्यासाठी असलेल्या जुन्या शेतरस्त्यावर केवळ चिखलच चिखल साचतो. त्यामुळे वाहने नेणे अशक्यच होऊन शेतीकामे खोळंबतात आणि आम्हाला नुकसान सहन करावे लागते. आता. या रस्त्याच्या कामाला पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेतून मंजुरी मिळाल्यामुळे आमची समस्या दूर होईल; परंतु हे काम तातडीने पूर्ण करावे.

-सुनीता मोरकर शेतकरी, इंझोरी