शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

लसीकरणासाठी झुंबड; कोरोना साखळी कशी तुटणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:42 IST

वाशिम : केंद्र सरकारकडून १० मे रोजी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसीचे डोस देण्याला ११ मेपासून सुरुवात होताच, लसीकरण केंद्र ...

वाशिम : केंद्र सरकारकडून १० मे रोजी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या लसीचे डोस देण्याला ११ मेपासून सुरुवात होताच, लसीकरण केंद्र परिसरात दुसरा डोस घेण्यासाठी नागरिकांची एकच झुंबड केली. लस ही महत्त्वाची आहेच; पण त्याचबरोबर लसीकरण केंद्रातील गर्दीतून कोरोना विषाणू संसर्गाचा फैलाव तर होणार नाही ना, याची दक्षताही घेणे आवश्यक ठरत आहे. दरम्यान, पहिला डोस घेतल्यानंतर ३८ ते ४५ दिवसांचा कालावधी होत असलेल्या ४५ वर्षांवरील नागरिकांना प्राधान्यक्रमाने दुसरा डोस देण्यात येणार असल्याने १२ मेपासून पुढील आदेशापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात आले आहे.

देशात गतवर्षी मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढला. वाशिम जिल्ह्यात कोरोनाचा पहिला रुग्ण ३ एप्रिल २०२० रोजी आढळून आला होता. दुसऱ्या लाटेत कोरोनामुळे जनजीवन प्रभावित होत आहे. कोरोनावर प्रभावी उपाय म्हणून लसीकरणाकडे पाहिले जाते. लसीकरणाबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती झाल्याने आणि लस घेतल्यानंतर कोरोनाची गंभीर लक्षणे आढळून येत नसल्याचे समोर येत असल्याने लस घेण्यासाठी आता नागरिकांची एकच धावपळ सुरू असल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. १६ जानेवारीपासून फ्रंटलाइन वर्कर्स, १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील आणि १ मेपासून १८ वर्षांवरील सर्वांना लस दिली जात आहे. दरम्यान, गत एका महिन्यापासून कोरोना प्रतिबंधक लसीचा तुटवडा निर्माण होत असल्याने लसीकरण मोहीमही प्रभावित होत आहे. लसीअभावी अर्धेअधिक केंद्र प्रभावित झाले आहेत. १० मे रोजी जिल्ह्याला बारा हजार २०० कोविशिल्ड आणि ३६६० कोव्हॅक्सिन लसीचे डोस प्राप्त झाले. ११ मेपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना कोव्हॅक्सिन लसीचा दुसरा डोस देण्याला सुरुवात होताच, जिल्हा सामान्य रुग्णालयासह ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रात नागरिकांची एकच झुंबड उडाली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लस ही महत्त्वाची आहेच; पण त्याचबरोबर केंद्रातील गर्दीतून कोरोनाचा प्रसार होणार नाही याची दक्षताही नागरिक, प्रशासनाने घेणे आवश्यक ठरत आहे.

०००

बॉक्स

१८-४४ वयोगटाचे लसीकरण लांबणीवर

जिल्ह्यात ४५ वर्षांवरील नागरिकांनी पहिला डोस घेतल्यानंतर ४५ ते ५० दिवसांच्या आत त्यांना दुसरा डोस मिळणे आवश्यक आहे. अनेक नागरिकांना पहिला डोस घेऊन ४० दिवसांचा कालावधी होत आहे. त्यामुळे या नागरिकांना दुसरा डोस देण्यासाठी आरोग्य विभागाने १२ मेपासून पुढील आदेशापर्यंत १८-४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्याचा निर्णय ११ मे रोजी घेतला. मागणीच्या तुलनेत लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने १८-४४ वयोगटाचे लसीकरण लांबणीवर पडले आहे. यामुळे या गटातील नागरिकांमधून नाराजीचा सूर उमटत आहे.

००००००

बॉक्स

वाशिम येथील केंद्रात धक्काबुक्की

जिल्हा सामान्य रुग्णालय परिसरात असलेल्या केंद्रात लस घेण्यासाठी मंगळवारी सकाळी ७ वाजेपासूनच नागरिक रांगेत उभे राहिले. लसीकरण सुरू झाल्यानंतर ११ वाजेच्या सुमारास ऊन असल्याने रांगेतील नागरिकांनी सावलीचा आधार घेण्यासाठी केंद्र परिसरात एकच गर्दी केली. यामध्ये काही नागरिकांमघ्ये धक्काबुक्कीदेखील झाल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. हा प्रकार पाहून काही ज्येष्ठ नागरिकांनी घरचा रस्ता धरल्याचे दिसून आले.

०००००००

बॉक्स

लसीचे १६ हजार डोस मिळाले

१० मे रोजी जिल्ह्यात लसीचे १६ हजार डोस मिळाले आहेत. यामध्ये कोविशिल्डचे १२,२०० आणि कोव्हॅक्सिनच्या ३६६० डोसचा समावेश आहे. यापैकी काही डोस ११ मे रोजी १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांनादेखील देण्यात आले. १२ मेपासून केवळ ४५ वर्षांवरील नागरिकांनाच लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे.

००००

कोट बॉक्स

जिल्ह्यात ११ मे रोजी ४५ वर्षांवरील नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला. दुसरा डोस आवश्यक असल्याने १२ मेपासून पुढील आदेशापर्यंत १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण थांबविण्यात येत आहे. १२ मेपासून ४५ वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस देण्यात येणार आहे.

- डॉ. अविनाश आहेर

जिल्हा आरोग्य अधिकारी, वाशिम