शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामीण भागात ‘राजकारण’ तापले

By admin | Updated: July 18, 2015 02:17 IST

निवडणूक अविरोध करण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न.

वाशिम : नामांकन अर्ज भरण्याला अवघा एक दिवस शिल्लक असताना आता खर्‍या अर्थाने ग्रामीण भागात राजकारण शिजत आहे. ग्रामपंचायत निवडणुकीने ग्रामीण भाग ढवळून निघत आहे. ऑगस्ट-सप्टेंबर २0१५ मध्ये मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने २३ जूनला जाहीर केला असून, त्या-त्या ग्रामपंचायत क्षेत्नात निवडणूक आचारसंहिताही २३ जून मध्यरात्नीपासून लागू झालेली आहे. जिल्ह्यातील ४९३ पैकी १६३ ग्रामपंचायतींची सार्वत्निक निवडणूक होत आहे. १३ जुलैपासून नामांकन अर्ज भरण्याला प्रारंभ झाला आहे. वाशिम तालुक्यात २३ ग्रामपंचायत, मालेगाव तालुक्यात ३0, मंगरूळपीर तालुक्यात २५, रिसोड तालुक्यात ३४, कारंजा तालुक्यात २८, मानोरा तालुक्यातील २३ ग्रामपंचायतचा यामध्ये समावेश आहे. नामनिर्देशनपत्र दाखल करण्याला आता केवळ सोमवार (दि.२0) हा एक दिवस शिल्लक असल्याने खर्‍या अर्थाने मोर्चेबांधणीने वेग पकडला आहे. विधानसभा निवडणुकीनंतर आता १६३ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका होत असल्याने ग्रामीण भागात इलेक्शन फिवर चढला आहे. ग्रामपंचायत निवडणुक राजकीय पक्षांच्या बॅनरखाली लढविली जात नसली तरी किती ग्रामपंचायतवर आपली सत्ता आहे, हे दाखविण्याचा प्रयत्न प्रत्येक राजकीय पक्षांकडून होत आहे. यामुळे ग्रामपंचायत निवडणूक अतितटीच्या वळणावर येऊन ठेपली आहे. खासदार भावना गवळी, माजी खासदार अनंतराव देशमुख, माजी राज्यमंत्री सुभाषराव ठाकरे, आमदार राजेंद्र पाटणी, अमित झनक व लखन मलिक, माजी आमदार प्रकाश डहाके, अँड. विजयराव जाधव ऐनवेळी काय पत्ते फेकतात, यावर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल अवलंबून राहणार आहे.